शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

चिंता वाढली! पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही पाणी साठवण प्रकल्प कोरडेठाक

By संदीप शिंदे | Updated: August 12, 2023 17:44 IST

दमदार पावसाची अजूनही शेतकऱ्यांना प्रतीक्षाच

अहमदपूर : पावसाळा सुरु होऊन दोन महिन्यांचा कालावधी होत आला असला तरी तालुक्यातील बहुतांश भागात अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे १० प्रकल्प कोरडेठाक पडले असून, उर्वरित प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणीसाठा आहे. त्यामुळे लघु, मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी तालुक्यातील नागरिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

अहमदपूर तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पाणलोट क्षेत्रातील लहान, मोठे प्रकल्प तहानलेले आहेत. पावसाअभावी तालुक्यातील १० प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे अनेक गावांना भर पावसाळ्यात पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. तालुक्यातील मोघा ८.८७ टक्के, थोडगा ५.७० टक्के, सावरगाव थोट ०.९२, तांबटसांगवी १. ७३ टक्के, मावलगाव ००, खंडाळी ०.३२, हगदळ / गुगदळ २.८५, नागझरी ३.५८, सोनखेड १९.४१, धसवाडी ५.९३, अंधोरी ०० टक्के, ढाळेगाव ५.२८, येस्तार ४.६७, मोळवण १९.१४,

कावळवाडी १६.४६, हंगेवाडी ९.०५, येलदरी १०.७७, कोपरा, भुतेकरवाडी ०० टक्के, नागठाणा १३.८, उगीलेवाडी ००, पाटोदा ४५.७, गोताळा ००, काळेगाव १०.५८, अहमदपूर साठवण तलाव, वाकी तलाव, तेलगाव आणि कौडगाव साठवण तलावात शून्य टक्के पाणीसाठा आहे. तालुक्यात २८ लघु, मध्यम प्रकल्प व साठवण तलाव असून, प्रकल्पात चांगला पाणीसाठा होण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

मागील वर्षी अनेक प्रकल्पातून विसर्ग...मागीलवर्षी प्रकल्पाच्या क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्यामुळे सर्वच प्रकल्प तुडुंब भरले होते. अनेक प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. प्रकल्पांत मुबलक पाणीसाठा असल्याने रब्बीच्या क्षेत्रातदेखील वाढ झाली होती. परंतु, यावर्षी जून, जुलै व अर्धा ऑगस्ट महिना असूनही पावसाने अहमदपूर तालुक्यात अद्याप हजेरी लावलेली नाही. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला नाही. रब्बीसाठी तालुक्यातील प्रकल्प भरणे आवश्यक आहे. लघु, मध्यम प्रकल्पात पाणीसाठा झाला तरच रब्बी हंगामासाठी मदत होणार आहे.

तालुक्यातील नद्या, नाले अद्यापही कोरडेठाक...सध्या तालुक्यातील नद्या-नाले कोरडेठाक असून, या पावसामुळे त्यांची तहान भागलेली नाही. सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, मका व इतर पिकांवर शेतकऱ्यांची मदार असताना यावर्षी मृग नक्षत्रात पावसाचे आगमन झाले. मात्र, आतापर्यंत हा पाऊस रिमझिम पडत असल्याने नदी-नाले कोरडेठाक आहेत. दोन महिने संपले तरी परिसरात मुसळधार पावसाचे आगमन झाले नाही. त्यामुळे परिसरातील नद्या ,नाले अजून एकदाही वाहिले नाहीत. परिणामी, विहिरी अजूनही कोरड्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात काम करायला जाताना घरून पाणी घेऊन जावे लागत आहे.

टॅग्स :WaterपाणीlaturलातूरFarmerशेतकरी