शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

चिंता वाढली! पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही पाणी साठवण प्रकल्प कोरडेठाक

By संदीप शिंदे | Updated: August 12, 2023 17:44 IST

दमदार पावसाची अजूनही शेतकऱ्यांना प्रतीक्षाच

अहमदपूर : पावसाळा सुरु होऊन दोन महिन्यांचा कालावधी होत आला असला तरी तालुक्यातील बहुतांश भागात अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे १० प्रकल्प कोरडेठाक पडले असून, उर्वरित प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणीसाठा आहे. त्यामुळे लघु, मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी तालुक्यातील नागरिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

अहमदपूर तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पाणलोट क्षेत्रातील लहान, मोठे प्रकल्प तहानलेले आहेत. पावसाअभावी तालुक्यातील १० प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे अनेक गावांना भर पावसाळ्यात पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. तालुक्यातील मोघा ८.८७ टक्के, थोडगा ५.७० टक्के, सावरगाव थोट ०.९२, तांबटसांगवी १. ७३ टक्के, मावलगाव ००, खंडाळी ०.३२, हगदळ / गुगदळ २.८५, नागझरी ३.५८, सोनखेड १९.४१, धसवाडी ५.९३, अंधोरी ०० टक्के, ढाळेगाव ५.२८, येस्तार ४.६७, मोळवण १९.१४,

कावळवाडी १६.४६, हंगेवाडी ९.०५, येलदरी १०.७७, कोपरा, भुतेकरवाडी ०० टक्के, नागठाणा १३.८, उगीलेवाडी ००, पाटोदा ४५.७, गोताळा ००, काळेगाव १०.५८, अहमदपूर साठवण तलाव, वाकी तलाव, तेलगाव आणि कौडगाव साठवण तलावात शून्य टक्के पाणीसाठा आहे. तालुक्यात २८ लघु, मध्यम प्रकल्प व साठवण तलाव असून, प्रकल्पात चांगला पाणीसाठा होण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

मागील वर्षी अनेक प्रकल्पातून विसर्ग...मागीलवर्षी प्रकल्पाच्या क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्यामुळे सर्वच प्रकल्प तुडुंब भरले होते. अनेक प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. प्रकल्पांत मुबलक पाणीसाठा असल्याने रब्बीच्या क्षेत्रातदेखील वाढ झाली होती. परंतु, यावर्षी जून, जुलै व अर्धा ऑगस्ट महिना असूनही पावसाने अहमदपूर तालुक्यात अद्याप हजेरी लावलेली नाही. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला नाही. रब्बीसाठी तालुक्यातील प्रकल्प भरणे आवश्यक आहे. लघु, मध्यम प्रकल्पात पाणीसाठा झाला तरच रब्बी हंगामासाठी मदत होणार आहे.

तालुक्यातील नद्या, नाले अद्यापही कोरडेठाक...सध्या तालुक्यातील नद्या-नाले कोरडेठाक असून, या पावसामुळे त्यांची तहान भागलेली नाही. सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, मका व इतर पिकांवर शेतकऱ्यांची मदार असताना यावर्षी मृग नक्षत्रात पावसाचे आगमन झाले. मात्र, आतापर्यंत हा पाऊस रिमझिम पडत असल्याने नदी-नाले कोरडेठाक आहेत. दोन महिने संपले तरी परिसरात मुसळधार पावसाचे आगमन झाले नाही. त्यामुळे परिसरातील नद्या ,नाले अजून एकदाही वाहिले नाहीत. परिणामी, विहिरी अजूनही कोरड्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात काम करायला जाताना घरून पाणी घेऊन जावे लागत आहे.

टॅग्स :WaterपाणीlaturलातूरFarmerशेतकरी