शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

चिंता वाढली! पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही पाणी साठवण प्रकल्प कोरडेठाक

By संदीप शिंदे | Updated: August 12, 2023 17:44 IST

दमदार पावसाची अजूनही शेतकऱ्यांना प्रतीक्षाच

अहमदपूर : पावसाळा सुरु होऊन दोन महिन्यांचा कालावधी होत आला असला तरी तालुक्यातील बहुतांश भागात अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे १० प्रकल्प कोरडेठाक पडले असून, उर्वरित प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणीसाठा आहे. त्यामुळे लघु, मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी तालुक्यातील नागरिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

अहमदपूर तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पाणलोट क्षेत्रातील लहान, मोठे प्रकल्प तहानलेले आहेत. पावसाअभावी तालुक्यातील १० प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे अनेक गावांना भर पावसाळ्यात पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. तालुक्यातील मोघा ८.८७ टक्के, थोडगा ५.७० टक्के, सावरगाव थोट ०.९२, तांबटसांगवी १. ७३ टक्के, मावलगाव ००, खंडाळी ०.३२, हगदळ / गुगदळ २.८५, नागझरी ३.५८, सोनखेड १९.४१, धसवाडी ५.९३, अंधोरी ०० टक्के, ढाळेगाव ५.२८, येस्तार ४.६७, मोळवण १९.१४,

कावळवाडी १६.४६, हंगेवाडी ९.०५, येलदरी १०.७७, कोपरा, भुतेकरवाडी ०० टक्के, नागठाणा १३.८, उगीलेवाडी ००, पाटोदा ४५.७, गोताळा ००, काळेगाव १०.५८, अहमदपूर साठवण तलाव, वाकी तलाव, तेलगाव आणि कौडगाव साठवण तलावात शून्य टक्के पाणीसाठा आहे. तालुक्यात २८ लघु, मध्यम प्रकल्प व साठवण तलाव असून, प्रकल्पात चांगला पाणीसाठा होण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

मागील वर्षी अनेक प्रकल्पातून विसर्ग...मागीलवर्षी प्रकल्पाच्या क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्यामुळे सर्वच प्रकल्प तुडुंब भरले होते. अनेक प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. प्रकल्पांत मुबलक पाणीसाठा असल्याने रब्बीच्या क्षेत्रातदेखील वाढ झाली होती. परंतु, यावर्षी जून, जुलै व अर्धा ऑगस्ट महिना असूनही पावसाने अहमदपूर तालुक्यात अद्याप हजेरी लावलेली नाही. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला नाही. रब्बीसाठी तालुक्यातील प्रकल्प भरणे आवश्यक आहे. लघु, मध्यम प्रकल्पात पाणीसाठा झाला तरच रब्बी हंगामासाठी मदत होणार आहे.

तालुक्यातील नद्या, नाले अद्यापही कोरडेठाक...सध्या तालुक्यातील नद्या-नाले कोरडेठाक असून, या पावसामुळे त्यांची तहान भागलेली नाही. सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, मका व इतर पिकांवर शेतकऱ्यांची मदार असताना यावर्षी मृग नक्षत्रात पावसाचे आगमन झाले. मात्र, आतापर्यंत हा पाऊस रिमझिम पडत असल्याने नदी-नाले कोरडेठाक आहेत. दोन महिने संपले तरी परिसरात मुसळधार पावसाचे आगमन झाले नाही. त्यामुळे परिसरातील नद्या ,नाले अजून एकदाही वाहिले नाहीत. परिणामी, विहिरी अजूनही कोरड्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात काम करायला जाताना घरून पाणी घेऊन जावे लागत आहे.

टॅग्स :WaterपाणीlaturलातूरFarmerशेतकरी