शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

पंचांगकर्त्यांचा मोठा अंदाज; यंदा पाऊसमान सरासरी गाठेल, मात्र...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 13:48 IST

मनुष्याच्या निसर्गचक्राशी विसंगत वागणूकीने ग्रहस्थितीनुसार पर्जन्ययोग असूनही प्रत्यक्षात पाण्याची नक्षत्रे कोरडी जात असल्याचे मत पंचांगकर्त्यांनी नोंदवले आहे

- व्ही. एस. कुलकर्णीउदगीर: यंदा पाऊस नेहमीपेक्षा उशिरा सुरू होईल, काही भागांत पावसाचा जोर राहील तर काही भागांत कमी राहील. पाऊसमान सरासरी गाठेल, मात्र पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागेल. पडलेल्या पावसाचे पुनर्भरण करावे लागेल.यासाठी सरकारी नियोजन कमी पडणार असल्याचा अंदाज पंचांगकर्त्यांनी वर्तवला आहे.

यंदा रोहिणी, मृग नक्षत्रात वारे व वादळ होवून पावसाचे आगमन होईल. नियमित पाऊस २० जून नंतर सुरू होईल.आर्द्रा नक्षत्रात थोडा फार पाऊस होईल. मघा, पूर्वा, उत्तरा, ही नक्षत्रे चांगली वृष्टीकारक असून, हस्त नक्षत्राचे पूर्वार्धात चांगली वृष्टी होईल. पावसाचे मान हे नेहमीच लहरी व खंडवृष्टीकारक झाले आहे. त्यामुळे जेवढा पाऊस पडतो , त्या पाण्याची साठवणूक , पाणी जिरवण्याची योग्य व्यवस्था  याद्वारे पाण्याचे नियोजन जनतेने अवश्य करावे ही काळाची गरज आहे. बेसुमार वृक्षतोड, वाढलेले तापमान, निसर्गचक्राशी विसंगत वागणूक यामुळे ग्रहस्थितीनुसार पर्जन्ययोग असूनही प्रत्यक्षात पाण्याची नक्षत्रे कोरडी जात असल्याचा अनुभव  पहायला मिळत आहे. तर कांही वेळा अनपेक्षितपणे अतिवृष्टी होवून  शेतीचे नुकसान होत असल्याचा अंदाज एका पंचांगकर्त्यांनी वर्तवला आहे.

३ वर्षांत ५०० मिमी पेक्षा कमी पाऊस१९८६, १९९२, १९९४ सालीही उदगीर तालुक्यात ५०० मि. मी. पेक्षा कमी पाऊस झाला होता. या कालावधीत पर्यावरणाचा विनाश कमी असल्यामुळे लोकांना पिण्याचे पाणी मिळत होते. अन्नधान्याचा तुटवडा व रोजगारासाठी भटकंती करण्याची वेळ आली होती. आजघडीला ही परिस्थिती बदलली आहे. अन्नधान्याचा मुबलक साठा असला तरी एक दोन वर्षे झाली की, पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावीच लागते. त्यामुळे पडलेल्या पावसाचे नियोजन करून पुनर्भरण करणे काळाची गरज असल्यामुळे हे बंधनकारक करण्याची वेळ आता आली आहे. हे अंदाजही वेगवेगळ्या पंचांगकर्त्यांनी वर्तवले आहेत.

पुनर्भरण बंधनकारक असावेउदगीर तालुक्यात गेल्या ३५ वर्षात केवळ पाच सहा वेळा जलयुक्त व जलपुनर्भरणाची कामे झाली .तेंव्हाच पाणी पातळीत वाढ होऊन तालुका टँकरमुक्त झालेला होता. पाण्याची ओरडही कमी झाली होती. पर्यावरणाच्या विनाशामुळे उदगीरचे सरासरी पर्जन्यमान इतिहासजमा होण्याची चिन्हे दिसत आहेत. मागच्या ५८ वर्षाच्या पर्जन्यमानाचा आढावा घेतला असता उदगीर तालुक्यात तब्बल ४३ वर्षे सरासरी इतका पाऊस झालेला नाही. उदगीर तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ८५० ते ९०० मि. मी. एवढे आहे.१९६५ पासून केवळ १३ वर्षच एक हजार मि. मी. च्या वर पाऊस होऊन  तालुक्याने पावसाची सरासरी ओलांडली होती. १९७१ साली ३८९ मि. मी. व १९७२ साली केवळ १७९ मि. मी. एवढाच पाऊस झाला होता. हे दोन्ही वर्ष दुष्काळी वर्ष म्हणून प्रसिद्ध होते. 

टॅग्स :RainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रlaturलातूर