शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

लातूर जिल्ह्यातील सर्व प्रकल्प कोरडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:32 PM

लघु प्रकल्पांत केवळ ६़९५२ द.ल.घ.मी. साठा

ठळक मुद्देमांजरा पट्ट्यात भीषण पाणीटंचाई

लातूर : लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ४६२ मि.मी. पाऊस झाला असला तरी पाणीसाठ्यात मात्र वाढ नाही़ त्यामुळे शहरासह जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई आहे़ ३२५ गावांना ४८५ अधिग्रहणाद्वारे तर ४६ गावांना ५३ टँकरद्वारे पाणीपुरवठा आहे़ पावसाळा संपत आला तरी मध्यम प्रकल्पांसह लघु प्रकल्पांत ६़९५२ द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे़

लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात केवळ ४़५० द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे़ आॅक्टोबर अखेरपर्यंत पुरेल एवढेच पाणी या प्रकल्पात आहे़ जिल्ह्यातील रेणापूर - ०़००, तीरू  -१़९८, देवर्जन - १़७३, व्हटी - ०़२२०, साकोळ -१़६५७, तावरजा-०़००, घरणी - १़३५४, मसलगा प्रकल्पात ०़०० एवढा पाणीसाठा आहे़ मध्यम ८ आणि लघू १३२ प्रकल्पात मिळून ६़९५२ द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे़ निलंगा शहरासह औसा तालुक्यातील काही गावांना पाणीपुरवठा होणाऱ्या निम्न तेरणा प्रकल्पात बऱ्यापैकी म्हणजे १३़३३२ द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे़ पावसाची वार्षिक सरासरी ८०२ आहे़ सरासरीच्या ५८ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली असली तरी प्रकल्प मात्र कोरडेच आहेत़ त्यामुळे जिल्ह्यात भीषण टंचाईचे संकट आहे़ 

मांजरा पट्ट्यात भीषण पाणीटंचाईमांजरा पट्ट्यातील गाधवड, तांदुळजा, सारसा, वांजरखेडा, कानडी बोरगाव, टाकळगाव, जोडजवळा, जेवळी आदी गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे़ जिल्ह्यातील लातूर, रेणापूर, अहमदपूर, जळकोट, उदगीर, शिरूर अनंतपाळ, चाकूर, देवणी, औसा या तालुक्यामध्ये पाणीटंचाई आहे़, तर निलंगा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माकणी प्रकल्पामध्ये पाणीसाठा असल्यामुळे या तालुक्याला तूर्त दिलासा आहे़.

टॅग्स :Rainपाऊसlaturलातूर