शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

शेतमाल तारण योजनेचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार; पैशासाठीची होणारी धावाधाव थांबली

By हरी मोकाशे | Updated: February 2, 2024 19:02 IST

लातूर जिल्ह्यात या योजनेअंतर्गत आतापर्यंत ४१३ शेतकऱ्यांना ५ कोटी ४९ लाख ४९ हजार ७२ रुपयांचे कर्ज वितरण

लातूर : पैशासाठी शेतकऱ्यांची होणारी धावाधाव थांबावी आणि आर्थिक गरज तत्काळ भागावी म्हणून जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतमाल तारण योजना राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत आतापर्यंत ४१३ शेतकऱ्यांना ५ कोटी ४९ लाख ४९ हजार ७२ रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात दहा तालुके असून एकूण ११ कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. त्यापैकी लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यातील प्रमुख बाजारपेठांपैकी आहे. जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाची बाजारपेठ म्हणून उदगीरची ओळखली जाते. त्यापाठोपाठ महाराष्ट्र- कर्नाटक सीमावर्ती भागातील निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील बाजार समिती आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची आवक वाढली आहे. परिणामी, सोयाबीनचे दर उतरले आहेत. हमीभाव ४ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल आहे. मात्र, सध्या सर्वसाधारण भाव ४ हजार ४५० रुपये, कमाल ४ हजार ५८१ तर किमान ३ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल दर आहेत. हमीभावापेक्षाही कमी दर मिळत असल्याने शेतकरी शेतमाल तारण योजनेचा आधार घेत आहेत.

साडेपाच कोटींचे कर्ज वितरण...बाजार समिती - कर्ज रक्कमलातूर - ३ कोटी ४३ लाखऔसा - ६ लाख ९३ हजारउदगीर - १ कोटी ७५ लाखचाकूर - २४ लाख १० हजारएकूण - ५ कोटी ४९ लाख

तीन बाजार समित्यांची आर्थिक स्थिती नाजूक...शेतकऱ्यांना आर्थिक गरजेवेळी मदत व्हावी म्हणून शासनाने गेल्या काही वर्षांपासून शेतमाल तारण योजना सुरू केली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ११ पैकी तीन बाजार समित्यांची आर्थिक स्थिती नाजूक असून गोदामाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ या तीन बाजार समित्यांनी ही योजना राबविली नाही.

निधी उपलब्ध परंतु, प्रस्ताव दाखल नाहीत...जिल्ह्यातील निलंगा, रेणापूर, अहमदपूर आणि औराद शहाजानी येथील बाजार समित्यांनी शेतमाल तारण योजना राबविण्यासाठी निधीची तरतूद करून ठेवली आहे. मात्र, अद्याप एकाही शेतकऱ्याचा प्रस्ताव कर्जासाठी दाखल झाला नाही. त्यामुळे एक रुपयाचेही कर्ज वितरण झाले नाही.

लातूर बाजार समितीकडून सर्वाधिक कर्ज पुरवठा...लातूर बाजार समितीने २२० शेतकऱ्यांना ९ हजार ९४४ क्विंटल शेतमालापाेटी ३ कोटी ४३ लाख ८ हजार ७२ रुपयांचे वाटप झाले. औसा बाजार समितीकडून ५० शेतकऱ्यांना २ हजार २१० क्विंटल सोयाबीनपोटी ६ लाख ९३ हजार ६०० रुपये, उदगीरात १२८ शेतकऱ्यांना ५ हजार ८५ क्विंटल शेतमालापोटी १ कोटी ७५ लाख ३६ हजार ९०० रुपये, तर चाकूर बाजार समितीने १५ शेतकऱ्यांना ७११ क्विंटल सोयाबीनपोटी २४ लाख १० हजार ५०० रुपयांचे वितरण केले आहे.

शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण उपयुक्त...शेतमाल तारण योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. जिल्ह्यातील ११ पैकी ८ बाजार समित्यांकडून ही योजना राबविण्यात येत आहे. आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना पतपुरवठा होत आहे. चार बाजार समित्यांकडून जवळपास साडेपाच कोटींचे कर्ज वितरण झाले आहे.- संगमेश्वर बदनाळे, जिल्हा उपनिबंधक.

टॅग्स :FarmerशेतकरीlaturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्र