शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

शेतमाल तारण योजनेचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार; पैशासाठीची होणारी धावाधाव थांबली

By हरी मोकाशे | Updated: February 2, 2024 19:02 IST

लातूर जिल्ह्यात या योजनेअंतर्गत आतापर्यंत ४१३ शेतकऱ्यांना ५ कोटी ४९ लाख ४९ हजार ७२ रुपयांचे कर्ज वितरण

लातूर : पैशासाठी शेतकऱ्यांची होणारी धावाधाव थांबावी आणि आर्थिक गरज तत्काळ भागावी म्हणून जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतमाल तारण योजना राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत आतापर्यंत ४१३ शेतकऱ्यांना ५ कोटी ४९ लाख ४९ हजार ७२ रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात दहा तालुके असून एकूण ११ कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. त्यापैकी लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यातील प्रमुख बाजारपेठांपैकी आहे. जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाची बाजारपेठ म्हणून उदगीरची ओळखली जाते. त्यापाठोपाठ महाराष्ट्र- कर्नाटक सीमावर्ती भागातील निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील बाजार समिती आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची आवक वाढली आहे. परिणामी, सोयाबीनचे दर उतरले आहेत. हमीभाव ४ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल आहे. मात्र, सध्या सर्वसाधारण भाव ४ हजार ४५० रुपये, कमाल ४ हजार ५८१ तर किमान ३ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल दर आहेत. हमीभावापेक्षाही कमी दर मिळत असल्याने शेतकरी शेतमाल तारण योजनेचा आधार घेत आहेत.

साडेपाच कोटींचे कर्ज वितरण...बाजार समिती - कर्ज रक्कमलातूर - ३ कोटी ४३ लाखऔसा - ६ लाख ९३ हजारउदगीर - १ कोटी ७५ लाखचाकूर - २४ लाख १० हजारएकूण - ५ कोटी ४९ लाख

तीन बाजार समित्यांची आर्थिक स्थिती नाजूक...शेतकऱ्यांना आर्थिक गरजेवेळी मदत व्हावी म्हणून शासनाने गेल्या काही वर्षांपासून शेतमाल तारण योजना सुरू केली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ११ पैकी तीन बाजार समित्यांची आर्थिक स्थिती नाजूक असून गोदामाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ या तीन बाजार समित्यांनी ही योजना राबविली नाही.

निधी उपलब्ध परंतु, प्रस्ताव दाखल नाहीत...जिल्ह्यातील निलंगा, रेणापूर, अहमदपूर आणि औराद शहाजानी येथील बाजार समित्यांनी शेतमाल तारण योजना राबविण्यासाठी निधीची तरतूद करून ठेवली आहे. मात्र, अद्याप एकाही शेतकऱ्याचा प्रस्ताव कर्जासाठी दाखल झाला नाही. त्यामुळे एक रुपयाचेही कर्ज वितरण झाले नाही.

लातूर बाजार समितीकडून सर्वाधिक कर्ज पुरवठा...लातूर बाजार समितीने २२० शेतकऱ्यांना ९ हजार ९४४ क्विंटल शेतमालापाेटी ३ कोटी ४३ लाख ८ हजार ७२ रुपयांचे वाटप झाले. औसा बाजार समितीकडून ५० शेतकऱ्यांना २ हजार २१० क्विंटल सोयाबीनपोटी ६ लाख ९३ हजार ६०० रुपये, उदगीरात १२८ शेतकऱ्यांना ५ हजार ८५ क्विंटल शेतमालापोटी १ कोटी ७५ लाख ३६ हजार ९०० रुपये, तर चाकूर बाजार समितीने १५ शेतकऱ्यांना ७११ क्विंटल सोयाबीनपोटी २४ लाख १० हजार ५०० रुपयांचे वितरण केले आहे.

शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण उपयुक्त...शेतमाल तारण योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. जिल्ह्यातील ११ पैकी ८ बाजार समित्यांकडून ही योजना राबविण्यात येत आहे. आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना पतपुरवठा होत आहे. चार बाजार समित्यांकडून जवळपास साडेपाच कोटींचे कर्ज वितरण झाले आहे.- संगमेश्वर बदनाळे, जिल्हा उपनिबंधक.

टॅग्स :FarmerशेतकरीlaturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्र