शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
3
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
4
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
5
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
6
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
7
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
8
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
9
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
10
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
11
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
12
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
13
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
14
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
15
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
16
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
17
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
18
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
19
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
20
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

शेतीचा बांध फुटला अन् लातुरातील माळेगाव शाळेत पाणीच पाणी; शैक्षणिक साहित्यही पाण्यात

By राजकुमार जोंधळे | Updated: June 10, 2025 16:58 IST

शालेय पोषण आहाराचे साहित्यही भिजले

गोविंद इंगळे / निलंगा (जि. लातूर) : तालुक्यातील माळेगाव (जे) परिसरात सोमवारी पहाटे जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतशिवारात पाणीचपाणी झाले. शेतातील बांध फुटला आणि नियमितपणे वाहणारा पाण्याचा प्रवाह अचानकपणे बदलून जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात पाणी शिरले. शाळेच्या वर्गखोल्यांमध्येही पाणी शिरल्याने शैक्षणिक साहित्य पाण्यावर तरंगत होते. शिवाय, शालेय पोषण आहार, नवीन पुस्तकेही भिजली आहेत. सकाळी ११ वाजता ग्रामस्थांच्या उपस्थितीत केंद्र प्रमुखांनी पंचनामा केला.

माळेगाव प्राथमिक शाळेत पहिली ते आठवीचे १०५ विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेत तीन शिक्षक कार्यरत आहेत. उन्हाळी सुट्या असल्यामुळे शाळा बंद आहे. रविवारी मध्यरात्री व सोमवारी पहाटेच्या दरम्यान या भागात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने आजूबाजूच्या शेतातील बांध फुटले आणि पाणी शाळेत शिरले. सर्वच वर्गखोल्यांसह मैदानात जवळपास तीन ते चार फूट पाणी थांबल्याचे सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. यावेळी ग्रामस्थ, विद्यार्थ्यांनी शाळेकडे धाव घेतली. संरक्षक भिंतीला छिद्र पाडले असता काही वेळातच मैदानातील पाणी बाहेर निघाले. यात वर्गखोल्यांत असलेले शालेय साहित्य, कागदपत्रे, शालेय पोषण आहाराचे तांदूळ भिजले.

नवीन पुस्तकांची पोतेही भिजली...

शाळा सुरू झाल्यावर पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके देण्यासाठी आणून ठेवण्यात आली होती. मात्र पावसाचे पाणी वर्गात शिरल्याने नवीन पुस्तकेही पूर्णत: भिजली आहेत. सोमवारी सकाळी केंद्र प्रमुख डी.एम. शेख, मुख्याध्यापक विष्णुकांत कोलेवाड, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष अनिता जाधव, उपाध्यक्ष बाळू जाधव, सदस्य ज्योती पुठ्ठे, दिनकर कंठमणी, उपसरपंच राजेंद्र आरीकर, रमेश जाधव, नागनाथ जाधव, गणेश पाटील, राजेश जाधव, भगवान जाधव यांच्या उपस्थितीत नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. सदरील अहवाल पंचायत समितीकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

शाळा वाचवा म्हणत...विद्यार्थ्यांची ओरड...सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शाळेत पाणी शिरल्याचे लक्षात आल्यावर परिसरातील विद्यार्थ्यांनी आमच्या शाळेत पाणी शिरले, शाळा वाचवा, अशी ओरड करीत ग्रामस्थांना गोळा केले. काही वेळात पाण्याला मार्ग काढण्यात आला. त्यानंतर वर्गखोल्यांमध्ये गाळमिश्रित पाणी होते, तेही स्वच्छ करण्यात आले. तिसरीचा विद्यार्थी देवांश जाधव, चौथीचा संभाजी कंठमणी, पाचवीचा शिवाजी पोतदार, कार्तिक गायकवाड, इयत्ता आठवीचे दीपक जाधव, संदीप बनसोडे, रोहित जाधव या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेसाठी मदत केली.

टॅग्स :laturलातूरSchoolशाळाWaterपाणी