शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

सोयाबीनच्या भाववाढीसाठी श्रीरामचंद्रांना साकडे; शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 18:27 IST

आंदोलकांनी शेतकऱ्यांच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रभू श्रीरामाची महाआरती करण्यात आली.

निलंगा : सन २०१४ मध्ये सोयाबीनला ५ हजारांपेक्षा अधिक भाव होता. मात्र, सध्या हा भाव ४ हजारांवर आला आहे. दहा वर्षांत सोयाबीन लागवडीचा खर्च दुप्पट झाला अन् भाव कमी अशी स्थिती झाली आहे. सोयाबीनला चांगला भाव मिळाला आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांची आरती करुन काँग्रेसने सोमवारी साकडे घातले आहे.

निलंगा विधानसभा मतदारसंघातील २०३ गावांतील शेतकऱ्यांच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रभू श्रीरामाची महाआरती करण्यात आली. ही पूजा नंदाबाई व तानाजी डोके आणि राजेश्री व उमाकांत भंडारे या दाम्पत्यांनी केली. पौरोहित्य मन्मथ स्वामी व काशिनाथ स्वामी यांनी केले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके, तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, शिरुर अनंतपाळचे तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर, देवणीचे तालुकाध्यक्ष ॲड. अजित बेळकोणे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. अरविंद्र भातांब्रे, पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने, पं.स. चे माजी सदस्य महेश देशमुख, लाला पटेल, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, अजित निंबाळकर, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, तालुका कार्याध्यक्ष ॲड. नारायणराव सोमवंशी, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष किशोर टोंपे, तालुकाध्यक्ष तानाजी डोके, कार्याध्यक्ष उमाकांत भंडारे, गिरीश पात्रे, धनाजी चांदुरे, अपरिजित मरगणे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

यावेळी अभय साळुंके म्हणाले, सध्या बाजारपेठेत केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या आधारभूत किंमतीपेक्षाही कमी दराने सोयाबीनची विक्री होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात नैराश्य येत आहे. त्यातून बाहेर पडावे म्हणून ही महाआरती करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीagitationआंदोलन