शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

पावसाळ्याचा एक महिना उलटला; मध्यम प्रकल्पांत जेमतेम जलसाठा!

By हरी मोकाशे | Updated: July 10, 2024 18:49 IST

यंदा जिल्ह्यात मृगाच्या प्रारंभी दमदार पाऊस झाल्याने उन्हाच्या दाहकतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.

लातूर : पावसाळा सुरु होऊन एक महिना उलटला आहे. दमदार पावसामुळे खरीप पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या असल्या तरी अद्यापही मध्यम प्रकल्पांत जेमतेम पाणीसाठा झाला आहे. आठपैकी पाच मध्यम प्रकल्पांमध्ये १०.७९ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागून असून पुनर्वसूवर आशा वाढली आहे.

यंदा जिल्ह्यात मृगाच्या प्रारंभी दमदार पाऊस झाल्याने उन्हाच्या दाहकतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे खरीप पेरण्यांना वेगही आला. त्याचबरोबर प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक येण्यास सुरुवात झाली. तद्नंतरच्या आर्द्रा नक्षत्रातील पहिल्या आठवड्यात पावसाने उघडीप दिली. त्यामुळे शेतकऱ्यांची धास्ती वाढण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान, रिमझिम पाऊस झाल्याने कोवळ्या पिकांना जीवदान मिळाले. पाच दिवसांपासून पुनर्वसू नक्षत्रास प्रारंभ झाला आहे. सुरुवातीपासून कमी- जास्त प्रमाणात पाऊस होत असल्याने आशा वाढल्या आहेत.

मसलगा प्रकल्पात सर्वाधिक पाणीसाठा...प्रकल्प - उपयुक्त पाणी (टक्के)तावरजा - ००रेणापूर - २३.१५व्हटी - ००तिरु - ००देवर्जन - २.८९साकोळ - ३.११घरणी - ३.४६मसलगा - ५१.४७एकूण - १०.७९

जळकोट तालुक्यात सर्वात कमी पाऊस...तालुका - आतापर्यंतचा पाऊस (मिमी)लातूर - ३३७.२औसा - ३३५.४अहमदपूर - २७४.०निलंगा - २९८.३उदगीर - १९६.४चाकूर - २९३.१रेणापूर - ३५४.०देवणी - २०२.५शिरुर अनं. - २२३.८जळकोट - १६६.५एकूण - २८४.१

प्रकल्पांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा...जिल्ह्यातील आठपैकी पाच मध्यम प्रकल्पांमध्ये १३.१८४ दलघमी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तावरजा, व्हटी, तिरु प्रकल्पांत अद्यापही उपयुक्त जलसाठा झाला नाही. रेणापूर प्रकल्पात ४.७५९, देवर्जन- ०.३०९, साकोळ- ०.३४०, घरणी- ०.७७६, मसलगा- ६.९९९ दलघमी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. एकूण १३.१८४ दलघमी जलसाठा झाला आहे.

लघु प्रकल्पांमध्ये ८.९७ टक्के जलसाठा...जिल्ह्यात एकूण १३४ लघु प्रकल्प आहेत. त्यात उपयुक्त पाणीसाठी २६.६१२ दलघमी आहे. तो साठा ८.९७ टक्के आहे. दरम्यान, प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ होण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागून आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २८४.१ मिमी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी १४०.७ मिमी पाऊस झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट पाऊस झाला आहे.

असमान पावसामुळे पाणीटंचाई सुरुच...पावसाळा सुरु होऊन एक महिना उलटला आहे. दमदार पाऊस झाला असला तरी तो असमान आहे. त्यामुळे काही तालुक्यातील गावांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सर्वाधिक पाऊस रेणापूर तालुक्यात झाला आहे तर सर्वात कमी पाऊस जळकोट तालुक्यात झाला असून १६६.५ मिमी अशी नोंद आहे.

टॅग्स :RainपाऊसlaturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्रWaterपाणी