संचित रजेवरील फरार आराेपीला पुण्यातून तीन वर्षांनंतर उचलले
By राजकुमार जोंधळे | Updated: July 30, 2023 17:10 IST2023-07-30T17:08:43+5:302023-07-30T17:10:18+5:30
लातुरातील विवेकानंद चाैक ठाण्याच्या पथकाने पुण्यातून अटक केली आहे.

संचित रजेवरील फरार आराेपीला पुण्यातून तीन वर्षांनंतर उचलले
लातूर : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भाेगत असलेला संचित रजेवरील आराेपी हा फरार झाला हाेता. दरम्यान, त्याला लातुरातील विवेकानंद चाैक ठाण्याच्या पथकाने पुण्यातून अटक केली आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील शिवाजीनगर ठाण्यात २०१४ मध्ये दाखल खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी परमेश्वर शंकर जाधव (३७, रा. एलआयसी कॉलनी, सहयोगनगर, लातूर) हा २०२० मध्ये चार आठवड्यांच्या संचित रजेवर हर्सूल कारागृहातून बाहेर पडला होता. दरम्यान, संचित रजा संपल्यावर तो कारागृहात दाखल न होता फरार झाला होता.
याबाबत कारागृह पोलिसांच्या फिर्यादवरून विवेकानंद चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. ताे पुण्यात असल्याची माहिती पाेलिस पथकाला खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे पाेलिस पथक पुण्यात दाखल झाले. त्यांनी आराेपीचा माग काढत तीन वर्षांनंतर अटक केली. लातूर न्यायालयात हजर करून, पुन्हा त्याला पाेलिसांनी हर्सूल कारागृहात पाठविले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, डीवायएसपी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विवेकानंद चाैक ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलिस उपनिरीक्षक कांबळे, सहायक फौजदार विलास फुलारी, दिनेश हवा, नलवाड यांच्या पथकाने केली आहे.