शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सोयाबीन खरेदीत शेतकऱ्यांना कंपनीचा ८५ लाखांचा गंडा, ३७ जणांना फसवले

By राजकुमार जोंधळे | Updated: August 28, 2022 20:12 IST

३७ शेतकऱ्यांची फसवणूक: अधिक भाव देण्याचे आमिष

लातूर : जिल्ह्यातील एकूण ३७ शेतकऱ्यांना बाजारभावपेक्षा अधिकचा भाव देण्याचे आमिष दाखवत साेयाबीन खरेदीतून एका खाजगी कंपनीने तब्बल ८५ लाखांला गंडविल्याचा प्रकार समाेर आला आहे. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात तिघांविराेधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पाेलिसांनी सांगितले, शेतकरी जगदीश नरहरी साेमवंशी (रा. माटेगाव ता. रेणापूर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

एमआयडीसी परिसरात असलेल्या गाेल्डस्टार अॅग्राे इंडिया लिमिटेड या खाजगी कंपनीकडून साेयाबीन, तूर खरेदी करण्यात येत असल्याची माहिती तक्रारदार शेतकऱ्यास मिळाली. त्यांनी ११ जुलै २०२२ राेजी तक्रारदार आणि त्यांचा शेतकरी मित्र श्रीधर रावसाहेब जाधव यांनी आपले साेयाबीन विक्री केले. त्यामध्ये जगदीश साेमवंशी आणि श्रीधर जाधव यांनीही सोयाबीनची विक्री केली आहे. दरम्यान, बाजार भावापेक्षा अधिकचा भाव देण्याचे सांगितले होते. तर विक्री केलेल्या साेयाबीनला प्रतिक्विंटल ८ हजार रुपयांचा भाव देणार असे सांगण्यात आले. त्यानुसार त्यांना एका बॅकेचा धनादेशही देण्यात आला होता. तर अतिक युसूफ शेख यांच्यासह यांच्यासह अन्य दाेघे तक्रारदारांच्या गावामध्ये आले हाेते. जिल्ह्यातील ३७ शेतकऱ्यांचे पैसे दिले नसल्याचे समाेर आले. चाैकशी केले असता एमआयडीसी परिसरातील गाेदाम बंद हाेते. विविध गावातील अनेक शेतकऱ्यांनी अधिक भाव मिळणार असल्याच्या आमिषाला बळी पडत आपले साेयाबीन विक्री केलेले हाेते. मात्र, पैशासाठी संबंधितांचा शाेध घेतला असता, ते आढळून आले नाहीत. अखेर आपली फसवणूक झाली आहे, असे त्यांच्या निदर्शनास आले. या कंपनीने एकूण ३७ शेतकऱ्यांना तब्बल ८५ लाख १५ हजार ३४५ रुपयांना गंडा घातला आहे. याबाबत शेतकऱ्याच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पाेलीस ठाण्यात अतिक युसूफ शेख याच्यासह अन्य दाेघाविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस उपनिरीक्षक डाके करत आहेत.

फसवणुकीची व्याप्ती वाढेल

गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पाेलिसांनी आराेपींचा शाेध सुरु केला आहे. अधिकचा भाव देताे म्हणून शेतकऱ्यांना फसवल्याचा प्रकार घडला आहे. या फसवणुकीच्या घटनेची व्याप्ती वाढण्याची शक्यता पाेलिसांनी वर्तविली आहे. आराेपी ताब्यात घेतल्यानंतरच गुन्ह्याची इतर माहिती हाती लाणार आहे, असे पाेलीस निरीक्षक संजीवन मिरकले म्हणाले. 

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीPoliceपोलिस