शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

लातूरात बियाणे, खतांचे ३० नमुने अप्रमाणित; कृषी सेवा केंद्र चालकांना ताकीद !

By हरी मोकाशे | Updated: August 7, 2024 18:23 IST

कृषी सेवा केंद्रांची पाहणी : संंशयित ८४३ नमुन्यांची तपासणी

लातूर : खरीप हंगामात कुठल्याही शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागाच्या वतीने चार महिन्यांत जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली. तेव्हा संशयास्पद असलेले बियाणे, खत, किटकनाशकांचे ८४३ नमुने घेतले. त्याची प्रयोगशाळेमार्फत तपासणी करण्यात आली असता ३० नमुने अप्रमाणित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कृषी केंद्रांना ताकीद देण्यात आली आहे.

खरीप हंगाम हुकुमी मानला जातो. वेळेवर दमदार पाऊस झाल्याने जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ९ हजार ८३१ हेक्टरवर खरीपाचा पेरा झाला आहे. १०१.७३ टक्के पेरणी झाली आहे. सोयाबीनचा सर्वाधिक ४ लाख ९९ हजार २०० हेक्टरवर पेरा झाला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना दर्जेदार बी- बियाणे, खते आणि किटकनाशके मिळावीत. तसेच फसवणूक होऊ नये म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून अचानक भेटी देऊन तपासणी करण्यात आली.

जिल्ह्यात ११७५ कृषी सेवा केंद्र...जिल्ह्यात बियाणे विक्रीचे १ हजार १७५ कृषी सेवा केंद्र आहेत. तसेच खत विक्रीचे १ हजार ९२ तर किटकनाशक विक्रीचे ९६० परवाने आहेत. दरम्यान, एप्रिल ते जुलैअखेरपर्यंत जिल्हा, तालुकास्तरीय पथकामार्फत कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे.

प्रयोगशाळेत ११ घटकांची तपासणी...जिल्हा कृषी विभागाकडून घेण्यात आलेल्या संशयास्पद बियाणे नमुन्यांची तपासणी परभणी, खतांची छत्रपती संभाजीनगर आणि किटकनाशकांची अमरावती येथील प्रयोगशाळेत करण्यात येते. तिथे जवळपास ११ घटकांची तपासणी करण्यात येते. त्यानंतर ३० दिवसांपर्यंत अप्रमाणित नमुन्यांचा अहवाल कृषी विभागाकडे पाठविण्यात येतो. त्यानंतर कार्यवाही करण्यात येते.

एकूण ८४६ नमुन्यांचे उद्दिष्ट...प्रकार - उद्दिष्ट - साध्य - अप्रमाणितबियाणे - ४६८ - ५१४ - १०रासायनिक खते - २५१ - २३४ - १५किटकनाशके - १२७ - ९५ - ०५एकूण - ८४६ - ८४३ - ३०

निकृष्ट बियाणांचा सर्वाधिक धोका...शेतकरी महागामोलाची बी- बियाणे खरेदी करुन पेरणी करतात. निष्कृष्ट बियाणे लागल्यास शेती उत्पन्नावर पाणी फिरते. शिवाय, लागवडीचा खर्चही निष्फळ ठरतो. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून बियाणांवर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्यात येत असल्याचे जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक संतोष लाळगे यांनी सांगितले.

नियमानुसार तात्काळ कार्यवाही...बी- बियाणे, खते, किटकनाशकांच्या गुणवत्तेसंदर्भात शंका आल्यास तात्काळ नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येतात. जिल्ह्यात बियाणांचे १०, रासायनिक खतांचे १५ आणि किटकनाशकांचे ५ नमुने अप्रमाणित आल्याने नियमानुसार काही कृषी सेवा केंद्र चालकांना सुधारण्यासाठी ताकीद देण्यात आली. तसेच काहींवर न्यायालयीन खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.- मिलिंद बिडबाग, प्रभारी कृषी विकास अधिकारी.

टॅग्स :laturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्र