शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

लातूर जिल्ह्यातील 142 प्रकल्पांत 16 टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 10:50 PM

मांजरा प्रकल्पात 3.4 टक्के तर जिल्ह्यातील 8 मध्यम प्रकल्पांत जेमतेम पाणीसाठा 

हणमंत गायकवाडलातूर - यंदाच्या पावसाळ्यात 455.3 मि़मी़ पाऊस झाला असला तरी प्रकल्पांतील पाणीसाठा तळालाच आहे़ दोन मोठ्या, आठ मध्यम आणि 132 लघु प्रकल्पांत केवळ 16 टक्के उपयुक्त पाणीसाठी आहे़ लातूर शहराला पाणीपुरवठा करणाºया मांजरा प्रकल्पात तर केवळ 3.4 टक्केच पाणी आहे. त्यामुळे परतीच्या पावसाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लातूर जिल्ह्यात सप्टेंबर अखेरपर्यंत सरासरी पाऊसमान 725 मिमी आहे. आतापर्यंत 455.3 मिमी पाऊस झाला असला तरी महसूल मंडळनिहाय सारखा पाऊस झाला नाही. त्यामुळे प्रकल्पांत पाण्याचा संचय झालेला नाही़ मांजरा प्रकल्प क्षेत्रात तर केवळ 277 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे लातूर, अंबाजोगाई, धारूर, केज, कळंब या शहरांना पाणीपुरवठा करणाºया मांजरा प्रकल्पात 3.4 टक्के पाणी आहे़ परतीच्या पावसावरच आता आशा आहे़ लातूर जिल्ह्यातील तावरजा मध्यम प्रकल्पात उपयुक्त पाणीच नाही़ 3.504 दलघमीचा मृतसाठा आहे. रेणा प्रकल्पात 2.638 दलघमी उपयुक्त पाणी आहे़ व्हटी मध्यम प्रकल्पातही मृत म्हणजे 1.060 दलघमी पाणी आहे़ तिरू मध्यम प्रकल्पातही 0.050 दलघमी उपयुक्त पाणी संचित झाले आह़े़ देवर्जन प्रकल्पात मात्र बऱ्यापैकी उपयुक्त पाणीसाठा असून, हा प्रकल्प 41.78 टक्के भरला आहे़ साकोळ प्रकल्पातही 60.44 टक्के तसेच घरणी मध्यम प्रकल्पात 95.18 टक्के आहे़ मसलगा प्रकल्पात 45.5 टक्के पाण्याचा संचय झाला आहे़ लघु आणि मध्यम असे एकूण 140 आणि 2 मोठ्या प्रकल्पांत 16.79 टक्के पाणीसाठा आहे़ परतीचा पाऊस नाही झाला तर या पाण्यावरच 24 लाख लोकसंख्येला आपली तहान भागवावी लागणार आहे. 

असे आहे पर्जन्यमानलातूर जिल्ह्यात आतापर्यंत 455.3 मिमी पाऊस झाला असून, लातूर तालुक्यात 4.2.1, औसा 361.2 अहमदपूर 516.9 निलंगा 473.7, उदगीर 435.8, चाकूर 552.2, रेणापूर 480.9, देवणी 432.9, शिरूर अनंतपाळ 514.1 आणि जळकोट तालुक्यात 477.7 मि़मी पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा हा पाऊस कमी असला तरी गतवर्षी सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील सर्व मध्यम प्रकल्प भरले होते. शिवाय मांजरा प्रकल्पातही 80 टक्क्यांपुढे पाणीसाठा होता़ यंदा मात्र 3.4 टक्के पाणी आहे़ 

10 दिवसाआड शहराला पाणीपुरवठा.पावसाने ताण दिल्यामुळे लातूर महानगरपालिकेने पाणीपुरवठा 8 ऐवजी 10 दिवसांआड सुरू केला आहे़ मांजरा प्रकल्प तसेच साई, नागझरीत पाणी नसल्यामुळे महानगपालिकेने आतापासुनच पाणी जपून वापरण्यासाठी ही खबरदारी घेतली आहे.

टॅग्स :Waterपाणीlaturलातूर