शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
4
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
5
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
6
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
7
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
8
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
9
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
11
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
12
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
13
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
14
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
15
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
19
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
20
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
Daily Top 2Weekly Top 5

अहमदपूर उपविभागात नियमांचे उल्लंघन केल्याने १३ लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:28 IST

अहमदपूर : कोरोनाच्या कालावधीत लॉकडाऊन करण्यात येऊन कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अहमदपूर ...

अहमदपूर : कोरोनाच्या कालावधीत लॉकडाऊन करण्यात येऊन कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अहमदपूर उपविभागीय पोलीस कार्यालय व पालिकेच्यावतीने कारवाई करण्यात येऊन १३ लाख २६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. यात विनामास्क आढळलेल्या २ हजार १७४ जणांवर तसेच २ हजार ८४४ वाहनांवर कारवाई करण्यात आली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले होते. याशिवाय, लॉकडाऊन करण्यात आले होते. या कालावधीत अहमदपूर उपविभागीय पोलीस कार्यालयांतर्गत २ हजार ८४४ वाहनांवर कारवाई करण्यात येऊन ६ लाख ८१ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता, तसेच संसर्गजन्य आजार प्रतिबंधक कायद्यांतर्गत १८८ अन्वये ६४ केसेस दाखल करण्यात आल्या, तसेच दंडही आकारण्यात आला.

अहमदपूर पालिकेने विनाकरण, विनामास्क फिरणाऱ्या २ हजार १७४ जणांवर कारवाई करीत ४ लाख ७४ हजार १०० रुपये तर नियमबाह्य अस्थापना चालू ठेवलेल्या १३३ दुकानदारांवर कारवाई करीत १ लाख ७१ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला. पालिकेने एकूण २ हजार ३०७ जणांवर कारवाई करीत एकूण ६ लाख ४५ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला.

अहमदपूर पोलीस उपविभाग व पालिकेने मिळून १३ लाख २६ हजारांचा दंड वसूल केला आहे. पोलीस, महसूल व पालिकेने केलेल्या कारवाईमुळे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत झाली आहे. सध्या तालुक्यात केवळ १० बाधित रुग्ण आहेत. त्यामुळे तालुक्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

दंड आकारणे हा पर्याय नाही...

दंड वसूल करणे हे पोलिसांचे काम नसून, केवळ शिस्त लावणे व त्यासाठी नागरिकांत जागृती करणे महत्त्वाचे आहे. दंड आकारणे हा त्यातील एक पर्याय आहे; मात्र नागरिकांनी स्वतःहून कोविड नियमांचे पालन करावे. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या अडचणीला सामोरे जाता येईल, असे उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिले यांनी सांगितले.

दंडाची रक्कम कोरोना कामासाठी...

कोविड काळात पालिकेच्यावतीने २०० पेक्षा अधिक कंटेनमेन्ट झोन तयार केले होते, तसेच २५ मयत व्यक्तींवर अंत्यसंस्कार, प्रत्येक ठिकाणी निर्जंतुकीकरण, जनजागृती करण्यात आली. त्यासाठी दंडाची रक्कम वापरण्यात आली आहे. यापुढेही ती वापरण्यात येणार असल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी त्रंबक कांबळे यांनी सांगितले.

प्रशासनाचा समन्वय, नागरिकांची मदत...

तालुक्यातील पोलीस, पालिका, महसूल व आरोग्य यंत्रणेच्या समन्वयामुळे आणि जागरूक नागरिकांमुळे अहमदपूर तालुक्यातील कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे. आगामी काळात प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नागरिकांनी कोविड नियम पाळावेत, असे आवाहन तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी केले आहे.