शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कर्जमुक्तीसाठी साडेतीन वर्षांपासून १ हजार ३११ शेतकरी सापडेनात !

By हरी मोकाशे | Updated: September 8, 2023 19:02 IST

शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना डिसेंबर २०१९ पासून राबविण्यात येत आहे.

लातूर : नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि कर्जमुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात येत आहे. मोहिमेंतर्गत कर्जमुक्त करण्यासाठी प्रशासन व बँकांकडून गेल्या साडेतीन वर्षांपासून १ हजार ३११ शेतकऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, त्यांचा अद्यापही पत्ताच लागला नसल्याचे दिसून येत आहे.

कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतीपिकांचे नुकसान होते. त्यामुळे शेतकरी संकटात सापडतो. सततच्या नुकसानीमुळे आणि शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना नेहमी कर्ज काढावे लागते. परिणामी, बळीराजा कर्जबाजारी होतो. नैराश्य आणि आर्थिक ताणतणावामुळे काही वेळेस शेतकरी आपली जीवनयात्रा संपविण्याचा मार्ग अवलंबतात. या परिस्थितीचा विचार करुन शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना डिसेंबर २०१९ पासून राबविण्यात येत आहे. योजनेसाठी १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ कालावधीत अल्प मुदत पीककर्ज आणि पुनर्गठित दोन लाखांपर्यंत पीककर्ज माफ करण्यास सुरुवात झाली. योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील ६५ हजार ५५२ शेतकऱ्यांचे प्रस्ताव ऑनलाइन सादर झाले. आतापर्यंत ५८ हजार ४२६ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे.

५८ हजार ५२६ शेतकऱ्यांना लाभ...कर्जमुक्ती योजनेसाठी जिल्ह्यातील ६५ हजार ५५२ शेतकऱ्यांचे प्रस्ताव ऑनलाइन सादर करण्यात आले होते. राज्य शासनाने आतापर्यंत कर्जमाफीसाठी एकूण ७ याद्या जाहीर केल्या आहेत. त्यात ६० हजार १९६ शेतकऱ्यांची नावे आहेत. त्यापैकी ५८ हजार ८८५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. त्यातील ५८ हजार ५२६ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३४५.१९ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत.

बँकांकडे सातत्याने पाठपुरावा...

जिल्ह्यातील ६० हजार १९६ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असले तरी प्रत्यक्षात ५८ हजार ८८५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. जवळपास साडेतीन वर्षांपासून १ हजार ३११ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नाही. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून बँका, सहायक निबंधक कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, या शेतकऱ्यांचा अद्यापही ठावठिकाणा लागला नाही.

काहींचा अंगठा जुळेना...कर्जमाफीच्या लाभासाठी काही शेतकऱ्यांना अंगठा जुळत नसल्याने अडचण होत आहे. शिवाय, काही शेतकरी मयत झाले आहेत. तर काहींचे स्थलांतर झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १ हजार ३११ शेतकऱ्यांचा शोध लागत नाही. योजनेचा लाभ देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येत आहे.

योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न...

कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील ६० हजार १९६ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ५८ हजार ८८५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. त्यातील ५८ हजार ५२६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शासनाकडून ३४५.१९ कोटींची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. उर्वरित १३११ शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून सांगण्यात आले.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर