शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्तीसाठी साडेतीन वर्षांपासून १ हजार ३११ शेतकरी सापडेनात !

By हरी मोकाशे | Updated: September 8, 2023 19:02 IST

शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना डिसेंबर २०१९ पासून राबविण्यात येत आहे.

लातूर : नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि कर्जमुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात येत आहे. मोहिमेंतर्गत कर्जमुक्त करण्यासाठी प्रशासन व बँकांकडून गेल्या साडेतीन वर्षांपासून १ हजार ३११ शेतकऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, त्यांचा अद्यापही पत्ताच लागला नसल्याचे दिसून येत आहे.

कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतीपिकांचे नुकसान होते. त्यामुळे शेतकरी संकटात सापडतो. सततच्या नुकसानीमुळे आणि शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना नेहमी कर्ज काढावे लागते. परिणामी, बळीराजा कर्जबाजारी होतो. नैराश्य आणि आर्थिक ताणतणावामुळे काही वेळेस शेतकरी आपली जीवनयात्रा संपविण्याचा मार्ग अवलंबतात. या परिस्थितीचा विचार करुन शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना डिसेंबर २०१९ पासून राबविण्यात येत आहे. योजनेसाठी १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ कालावधीत अल्प मुदत पीककर्ज आणि पुनर्गठित दोन लाखांपर्यंत पीककर्ज माफ करण्यास सुरुवात झाली. योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील ६५ हजार ५५२ शेतकऱ्यांचे प्रस्ताव ऑनलाइन सादर झाले. आतापर्यंत ५८ हजार ४२६ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे.

५८ हजार ५२६ शेतकऱ्यांना लाभ...कर्जमुक्ती योजनेसाठी जिल्ह्यातील ६५ हजार ५५२ शेतकऱ्यांचे प्रस्ताव ऑनलाइन सादर करण्यात आले होते. राज्य शासनाने आतापर्यंत कर्जमाफीसाठी एकूण ७ याद्या जाहीर केल्या आहेत. त्यात ६० हजार १९६ शेतकऱ्यांची नावे आहेत. त्यापैकी ५८ हजार ८८५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. त्यातील ५८ हजार ५२६ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३४५.१९ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत.

बँकांकडे सातत्याने पाठपुरावा...

जिल्ह्यातील ६० हजार १९६ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असले तरी प्रत्यक्षात ५८ हजार ८८५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. जवळपास साडेतीन वर्षांपासून १ हजार ३११ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नाही. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून बँका, सहायक निबंधक कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, या शेतकऱ्यांचा अद्यापही ठावठिकाणा लागला नाही.

काहींचा अंगठा जुळेना...कर्जमाफीच्या लाभासाठी काही शेतकऱ्यांना अंगठा जुळत नसल्याने अडचण होत आहे. शिवाय, काही शेतकरी मयत झाले आहेत. तर काहींचे स्थलांतर झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १ हजार ३११ शेतकऱ्यांचा शोध लागत नाही. योजनेचा लाभ देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येत आहे.

योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न...

कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील ६० हजार १९६ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ५८ हजार ८८५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. त्यातील ५८ हजार ५२६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शासनाकडून ३४५.१९ कोटींची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. उर्वरित १३११ शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून सांगण्यात आले.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर