काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील मणिशंकर अय्यर यांनी मोदींसाठी वापरलेल्या भाषेचं समर्थन करु शकत नसल्याचं म्हणत त्यांनी माफी मागावी असं म्हटलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधींनी आपलं मत व्यक्त केलं. ...
सातारा परिसर येथील महाराष्ट्र बँकेच्या एटीएममधून ५०० रुपयाच्या फाटक्या व रंग लागलेल्या नोटा ग्राहकास मिळाल्या. याबाबत त्यांनी बँकेला संपर्क केला असता बँकेने एजन्सीकडे बोट दाखवले तर एजन्सी ने मुख्य शाखेत जाण्याचा सल्ला दिला. ...
मुंबईतील चेंबूरमध्ये झाड अंगावर कोसळून आणखी एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शारदा घोडेस्वार असं मृत्यू महिलेचं नाव आहे. आज सकाळी 10 च्या सुमारास ही घटना घडली. ...
शेतक-यांना कृषीपंपाच्या वीज जोडण्या देण्यात याव्यात, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने सकाळी महावितरणच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन करण्यात आले. तब्बल चार तास चालेल्या या आंदोलनाने विभागाच्या अधिका-यांची चांगलीच गोची झाली. ...
काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या असभ्य टीकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पलटवार केला आहे. 'भलेही नीच जातीचा असलो, तरी कामं मोठी केली आहेत', असं सांगत नरेंद्र मोदींनी मणिशंकर अय्यर यांना सुनावलं आहे. ...
आदिवासी विकास विभागाच्या (ट्रायबल) अधिनस्थ आश्रमशाळा, वसतिगृहात विद्यार्थ्यांची सुरक्षितता, कारभारावर सूक्ष्म नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
सध्या कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने जिल्हाभरात हजारो हेक्टरवरील पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे शासनाने कापूस उत्पादक शेतक-यांना सरसकट सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याचा ठराव गुरूवारी अमरावती जिल्हा परिषदेत पारित करण्यात आला. ...