शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
4
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
5
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
6
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
7
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
8
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
9
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
10
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
11
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
12
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
13
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
14
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
15
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
16
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
17
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
18
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
19
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
20
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार

जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रिया ४ सप्टेंबरपर्यंत राबविणार नाही, सरकारी वकिलांनी मांडले सर्किट बेंचसमोर म्हणणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 18:41 IST

करवीर, कागल आणि आजरा तालुक्यातील रचनेबाबत ही एकत्रित सुनावणी घेण्यात आली.

कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीबाबत कोणतीही प्रक्रिया पुढील सुनावणीपर्यंत म्हणजे ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत राबवली जाणार नसल्याचे स्पष्ट म्हणणे सरकारी वकील ॲड. अनिल साखरे यांनी सोमवारी मांडले. करवीर, कागल आणि आजरा तालुक्यातील रचनेबाबत ही एकत्रित सुनावणी घेण्यात आली.कागल तालुक्यातील गावांची अदलाबदल, करवीर तालुक्यातील ग्रामपंचायतीही फोडणारी प्रारूप रचना आणि आजरा तालुक्यातील एक मतदारसंघ रद्द करण्याबाबत एकत्रित सुनावणी सोमवारी घेण्यात आली. त्यावेळी सरकारतर्फे ॲड. साखरे आणि ॲड. नेहा भिडे यांनी काम पाहिले. या तीन तालुक्यांपैकी केवळ करवीर तालुक्याबाबत सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. युवराज नरवणकर यांनी काम पाहिले.युक्तिवाद करताना सरकारी वकिलांनी वेळ मागून घेतला. परंतु, यावेळी ॲड. नरवणकर यांनी या दरम्यान जर निवडणूक प्रक्रिया पुढे गेली तर काय अशी विचारणा केली. यावर न्यायमूर्तींनी विचारणा केल्यानंतर जोपर्यंत ही सुनावणी होत नाही तोपर्यंत जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया पुढे जाणार नाही, असे सरकारी वकिलांमार्फत सांगण्यात आले. त्यामुळे आता ४ सप्टेंबरकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.