शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

जिल्हा परिषदेतील गर्दी ओसरली, ग्रामपंचायत निवडणुकीचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 10:50 IST

gram panchayat Election kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्याने आता जिल्हा परिषदेतील गर्दी ओसरल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे पदाधिकारीही कामापुरतेच येत असून, उर्वरित वेळ आता मतदारसंघातील निवडणुकांच्या जोडण्या लावण्यासाठी दिला जात आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेतील गर्दी ओसरली, ग्रामपंचायत निवडणुकीचा परिणामपदाधिकाऱ्यांचेही येणे झाले कमी

 कोल्हापूर -जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्याने आता जिल्हा परिषदेतील गर्दी ओसरल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे पदाधिकारीही कामापुरतेच येत असून, उर्वरित वेळ आता मतदारसंघातील निवडणुकांच्या जोडण्या लावण्यासाठी दिला जात आहे.ग्रामपंचायतीचे आज, बुधवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर आपापल्या जिल्हा परिषद मतदारसंघातील गावांमध्ये जोडण्या करण्यासाठी सदस्य गुंतले आहेत. आचारसंहिता असल्याने कोणतेही मोठे निर्णय जिल्हा परिषद घेऊ शकत नाही. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून प्रशासकीय मान्यता देऊन संपल्या आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेत येऊन फार काही निधी पदरात पडण्याची शक्यता नाही.दुसरीकडे सध्याच्या पदाधिकाऱ्यांच्या मुदत संपत आली आहे. २ जानेवारी २०२१ रोजी या पदाधिकाऱ्यांना एक वर्ष होत आहे. त्यामुळे पदाधिकारी बदलाचेही वारे वाहत आहे. परिणामी जिल्हा परिषदेत येऊन काय करायचे, असा प्रश्न असल्याने अनेक सदस्य इकडे येण्यापेक्षा मतदारसंघात थांबण्याकडे लक्ष देत आहेत. नेत्यांनीही संबंधितांना आता ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत.अशा परिस्थितीत आता सदस्यांची जिल्हा परिषदेतील उपस्थिती कमी झाली आहे. दिवसभर ठिय्या मारून बसणारे पदाधिकारीही आता कामापुरते येत आहेत. शिक्षण सभापती प्रवीण यादव यांच्या गावची निवडणूक लागली आहे. उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्यावर त्यांच्या भागातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या समन्वयाची जबाबदारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. राजू मगदूम यांची माणगावची निवडणूक लागल्याने तेदेखील जिल्हा परिषदेत आता फिरकेनासे झाले आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषदgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर