शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

भर पुरात गाठले मामाचे गाव, मुंबईत मृत्यू झालेल्या तरुणावर आजोळी अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 19:59 IST

दुर्दम्य आजाराशी झुंज देता देता प्राणज्योत मावळलेल्या युवकांचे मुंबईहून गावी आणताना आस्मानी संकटांना तोंड देत अखेर आजोळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

- सरदार चोगुले

कोल्हापूर - माणसाला कोठे, कधी, कसेही मरण आले तर अंत्यसंस्कार राहत्या गावातचं व्हावे.अशी इच्छा असते.असेच दुर्दम्य आजाराशी झुंज देता देता प्राणज्योत मावळलेल्या युवकांचे मुंबईहून गावी आणताना आस्मानी संकटांना तोंड देत अखेर आजोळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

उदाळवाडी (ता.पन्हाळा) येथील अभिनंदन संजय पाटील असे त्या युवकांचे नाव आहे. सर्वत्र मुसळधार पावसाने आणि महापूराच्या विळख्याने हाहाकार माजला असताना २२ तासाच्या संघर्षमय प्रवासानंतर त्याचा अंत्यविधी गावात करण्यात आला.

वाघवे मुळ गाव असणारा अभिनंदन पाटील आईच्या मृत्यूनंतर उदाळवाडी येथे मामाच्या गावी वास्तव्यास होता.तो खाजगी कंपनी काम करत होता.दोन महिन्यापूर्वी त्याला  निमोनिया झाल्याने त्याला उपचरासाठी कोल्हापूर येथे सीपीआर दवाखान्यात ठेवले होते; परंतू आजार बळावल्यामुळे महिन्यापूर्वी त्याला मुंबई येथील जे.जे.इस्पितळात पुढील उपचारासाठी दाखल केल्याने त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर त्याची बुधवारी सकाळी प्राणज्योत मावळली.    

कोल्हापूरला पावसाने व महापुराच्या पाण्याने थैमान घातल्याने मृतदेह गावाकडे नेऊ नका अशा विनवण्या डाॅक्टर नातेवाईकांना करत होते; परंतु, मृतदेह अंत्यविधीसाठी गावाकडेच नेण्यावर नातेवाईक ठाम होते. 

बुधवारी दुपारी अंधेरी येथील शिवसेनेच्या रूग्णवाहिकेने मृतदेह घेऊन कोल्हापूरकडे येत असताना अनेक संकटाना तोंड देत यावे लागले. 

पुणेच्या दरम्यान रूग्णवाहिकेला सरकारी अधिकाऱ्ऱ्यांच्या गाडीचा अपघात झाल्याने तेथे वांदग निर्माण झाले. त्यानंतर दोन ठिकाणी पोलिसांनी पुराच्या पाण्यातून गाडी घालण्यास नकार दिला होता; पण परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनीही माणूसकी दाखवत मदत केली.सुरक्षेच्या दृष्टीने गाडी रस्त्यावरील पाण्यातून बाहेर पडल्यानंतर सायरन करण्याचा इशारा करण्याची ताकीद दिली होती.अशा अनेक संघर्षमय प्रवासातून अभिनंदन पाटीलवर गुरुवारी मध्यरात्री मामाच्या गावी अंत्यसंस्कर करण्यात आले.

टॅग्स :Deathमृत्यूkolhapurकोल्हापूर