शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

‘एकत्र जगू नाही, पण मरु शकतो’, अहमदनगरमधील प्रेमीयुगुलाची कोल्हापुरात गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 10:59 IST

तरुणीचा तीन वर्षापूर्वी गावातच एकाशी विवाह झाला आहे. मात्र आत्महत्या केलेल्या तरुणाशी गेले काही वर्षे प्रेमसंबध होते.

कोल्हापूर : अहमदनगर जिल्ह्यातील तामसवाडी (ता. नेवासा) येथील एका प्रेमीयुगुलाने कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर परिसरातील एका यात्री निवासमध्ये (धर्मशाळा) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

राहुल विश्वासराव मच्छे (वय २५), प्रियंका विकास भराडे (वय २२) अशी आत्महत्या केलेल्या दोघांंची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली. रुममध्ये टेबलवर पोलिसांना मिळालेल्या चिठ्ठीत ‘आम्ही दोघे एकत्र जगू शकत नाही, पण मरु शकतो’, असे त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राहुल मच्छे व प्रियंका भराडे हे एकाच गावचे रहिवासी आहेत. प्रियंकाचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. गेली काही वर्ष दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. ते दोघे ३१ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी एसटी बसने कोल्हापुरात आले. दोघे श्री अंबाबाई मंदिर परिसरातील ताराबाई रोडवरील एका यात्री निवासमध्ये दाम्पत्य या नात्याने रूम नंबर ६ मध्ये उतरले.

शुक्रवारी सायंकाळी त्यांनी रूमचा दरवाजा बंद केला. तो उघडला नसल्याने शनिवारी रात्री ११ वाजता यात्री निवास मालकांना शंका आली. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, उपनिरीक्षक संदीप जाधव व उपनिरीक्षक प्रीतम पुजारी यांनी संबंधित यात्री निवासला भेट दिली. रूमचा दरवाजा तोडला असता, या प्रेमीयुगुलाने छताच्या हुकाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांना रुममध्ये एकच बॅग मिळाली. त्यात कपडे, राहुलचे आधारकार्ड सापडले. प्रियंकाने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत गावातील एकाचा संपर्कासाठीचा मोबाईल क्रमांक मिळाला. त्यावरून पोलिसांनी फोनवरुन दोघांच्याही नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. यात्री निवास मालक रवी सलुजा (रा. जोतिबा रोड) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

‘माफ करा, दोघांचाही अंत्यविधी एकत्रित करा’

आत्महत्या करण्यापूर्वी प्रियंकाने लिहून ठेवलेली चिठ्ठी मिळाली. त्यामध्ये ‘तात्या, मामी, आत्या, मम्मी आणि माझे सगळे भाऊ तसेच राहुलचे दादा, मम्मी, गौतम, दाजी व बहीण यांनी आम्हाला माफ करावे. आम्ही प्रेम करतो; पण प्रेम कोणाला कळले नाही. आम्ही दोघे एकत्र जगू शकत नसलो तरी मरू मात्र शकतो. त्यामुळे २०२२ हे वर्ष आम्हाला पाहायचे नाही. आम्हाला माफ करा, दोघांचाही अंत्यविधी एकत्रित करा’, असा मजकूर आहे.

जीवन संपविण्यापूर्वी मारली मिठी

दोघांनीही एकाच हुकाला वेगवेगळ्या साड्यांनी गळफास लावून घेतला, दोघांनीही जीवन संपविण्यापूर्वी एकमेकांना मिठी मारल्याचे आत्महत्येनंतर खोलीतील दृश्यावरून दिसत होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAhmednagarअहमदनगर