शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

‘एकत्र जगू नाही, पण मरु शकतो’, अहमदनगरमधील प्रेमीयुगुलाची कोल्हापुरात गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 10:59 IST

तरुणीचा तीन वर्षापूर्वी गावातच एकाशी विवाह झाला आहे. मात्र आत्महत्या केलेल्या तरुणाशी गेले काही वर्षे प्रेमसंबध होते.

कोल्हापूर : अहमदनगर जिल्ह्यातील तामसवाडी (ता. नेवासा) येथील एका प्रेमीयुगुलाने कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर परिसरातील एका यात्री निवासमध्ये (धर्मशाळा) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

राहुल विश्वासराव मच्छे (वय २५), प्रियंका विकास भराडे (वय २२) अशी आत्महत्या केलेल्या दोघांंची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली. रुममध्ये टेबलवर पोलिसांना मिळालेल्या चिठ्ठीत ‘आम्ही दोघे एकत्र जगू शकत नाही, पण मरु शकतो’, असे त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राहुल मच्छे व प्रियंका भराडे हे एकाच गावचे रहिवासी आहेत. प्रियंकाचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. गेली काही वर्ष दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. ते दोघे ३१ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी एसटी बसने कोल्हापुरात आले. दोघे श्री अंबाबाई मंदिर परिसरातील ताराबाई रोडवरील एका यात्री निवासमध्ये दाम्पत्य या नात्याने रूम नंबर ६ मध्ये उतरले.

शुक्रवारी सायंकाळी त्यांनी रूमचा दरवाजा बंद केला. तो उघडला नसल्याने शनिवारी रात्री ११ वाजता यात्री निवास मालकांना शंका आली. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, उपनिरीक्षक संदीप जाधव व उपनिरीक्षक प्रीतम पुजारी यांनी संबंधित यात्री निवासला भेट दिली. रूमचा दरवाजा तोडला असता, या प्रेमीयुगुलाने छताच्या हुकाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांना रुममध्ये एकच बॅग मिळाली. त्यात कपडे, राहुलचे आधारकार्ड सापडले. प्रियंकाने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत गावातील एकाचा संपर्कासाठीचा मोबाईल क्रमांक मिळाला. त्यावरून पोलिसांनी फोनवरुन दोघांच्याही नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. यात्री निवास मालक रवी सलुजा (रा. जोतिबा रोड) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

‘माफ करा, दोघांचाही अंत्यविधी एकत्रित करा’

आत्महत्या करण्यापूर्वी प्रियंकाने लिहून ठेवलेली चिठ्ठी मिळाली. त्यामध्ये ‘तात्या, मामी, आत्या, मम्मी आणि माझे सगळे भाऊ तसेच राहुलचे दादा, मम्मी, गौतम, दाजी व बहीण यांनी आम्हाला माफ करावे. आम्ही प्रेम करतो; पण प्रेम कोणाला कळले नाही. आम्ही दोघे एकत्र जगू शकत नसलो तरी मरू मात्र शकतो. त्यामुळे २०२२ हे वर्ष आम्हाला पाहायचे नाही. आम्हाला माफ करा, दोघांचाही अंत्यविधी एकत्रित करा’, असा मजकूर आहे.

जीवन संपविण्यापूर्वी मारली मिठी

दोघांनीही एकाच हुकाला वेगवेगळ्या साड्यांनी गळफास लावून घेतला, दोघांनीही जीवन संपविण्यापूर्वी एकमेकांना मिठी मारल्याचे आत्महत्येनंतर खोलीतील दृश्यावरून दिसत होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAhmednagarअहमदनगर