शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

‘एकत्र जगू नाही, पण मरु शकतो’, अहमदनगरमधील प्रेमीयुगुलाची कोल्हापुरात गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 10:59 IST

तरुणीचा तीन वर्षापूर्वी गावातच एकाशी विवाह झाला आहे. मात्र आत्महत्या केलेल्या तरुणाशी गेले काही वर्षे प्रेमसंबध होते.

कोल्हापूर : अहमदनगर जिल्ह्यातील तामसवाडी (ता. नेवासा) येथील एका प्रेमीयुगुलाने कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर परिसरातील एका यात्री निवासमध्ये (धर्मशाळा) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

राहुल विश्वासराव मच्छे (वय २५), प्रियंका विकास भराडे (वय २२) अशी आत्महत्या केलेल्या दोघांंची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली. रुममध्ये टेबलवर पोलिसांना मिळालेल्या चिठ्ठीत ‘आम्ही दोघे एकत्र जगू शकत नाही, पण मरु शकतो’, असे त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राहुल मच्छे व प्रियंका भराडे हे एकाच गावचे रहिवासी आहेत. प्रियंकाचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. गेली काही वर्ष दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. ते दोघे ३१ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी एसटी बसने कोल्हापुरात आले. दोघे श्री अंबाबाई मंदिर परिसरातील ताराबाई रोडवरील एका यात्री निवासमध्ये दाम्पत्य या नात्याने रूम नंबर ६ मध्ये उतरले.

शुक्रवारी सायंकाळी त्यांनी रूमचा दरवाजा बंद केला. तो उघडला नसल्याने शनिवारी रात्री ११ वाजता यात्री निवास मालकांना शंका आली. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, उपनिरीक्षक संदीप जाधव व उपनिरीक्षक प्रीतम पुजारी यांनी संबंधित यात्री निवासला भेट दिली. रूमचा दरवाजा तोडला असता, या प्रेमीयुगुलाने छताच्या हुकाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांना रुममध्ये एकच बॅग मिळाली. त्यात कपडे, राहुलचे आधारकार्ड सापडले. प्रियंकाने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत गावातील एकाचा संपर्कासाठीचा मोबाईल क्रमांक मिळाला. त्यावरून पोलिसांनी फोनवरुन दोघांच्याही नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. यात्री निवास मालक रवी सलुजा (रा. जोतिबा रोड) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

‘माफ करा, दोघांचाही अंत्यविधी एकत्रित करा’

आत्महत्या करण्यापूर्वी प्रियंकाने लिहून ठेवलेली चिठ्ठी मिळाली. त्यामध्ये ‘तात्या, मामी, आत्या, मम्मी आणि माझे सगळे भाऊ तसेच राहुलचे दादा, मम्मी, गौतम, दाजी व बहीण यांनी आम्हाला माफ करावे. आम्ही प्रेम करतो; पण प्रेम कोणाला कळले नाही. आम्ही दोघे एकत्र जगू शकत नसलो तरी मरू मात्र शकतो. त्यामुळे २०२२ हे वर्ष आम्हाला पाहायचे नाही. आम्हाला माफ करा, दोघांचाही अंत्यविधी एकत्रित करा’, असा मजकूर आहे.

जीवन संपविण्यापूर्वी मारली मिठी

दोघांनीही एकाच हुकाला वेगवेगळ्या साड्यांनी गळफास लावून घेतला, दोघांनीही जीवन संपविण्यापूर्वी एकमेकांना मिठी मारल्याचे आत्महत्येनंतर खोलीतील दृश्यावरून दिसत होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAhmednagarअहमदनगर