शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणुकीशिवाय शेतीत फायदा अशक्य - फडणवीस

By admin | Updated: June 27, 2016 01:04 IST

शाहू’च्या सहकार्याने सिंचनाचा पथदर्शी प्रकल्प

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी, छत्रपती शाहू महाराजांनी दुष्काळ निवारण, जलसंधारण, शिक्षण आणि बहुजनांचा विकास हे विचार त्यांच्या कृतींतून समाजासमोर मांडले. आज याच आदर्श विचारांच्या आधारावर केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील युतीचे सरकार वाटचाल करीत आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे बोलताना क ाढले. काम करताना ज्या वेळी आम्हाला अडचणी येतील, त्यावेळी शाहूंचे ग्रंथ आम्ही उघडून बघू आणि त्याद्वारे बहुजनांचा विकास करू, असेही ते म्हणाले. राजर्षी शाहू चरित्रसाधने प्रकाशन समिती, मुंबई यांच्या वतीने संपादक प्रा. रमेश जाधव लिहिलेल्या राजर्षी शाहू गौरव ग्रंथाचे प्रकाशन शानदार सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार संभाजीराजे छत्रपती, महापौर अश्विनी रामाणे, आदी व्यासपीठावर उपस्थित होते. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार सांगून निवडणुका जिंकता येतील, टाळ्या मिळविता येतील; परंतु त्याही पलीकडे जाऊन हे विचार सत्तेच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीत उतरवावे लागतील तेव्हाच शाहूंना अभिप्रेत असलेला बहुजनांचा विकास होईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, बहुजनांच्या विकासाशिवाय समाजाचा विकास होणार नाही, हे शाहूंनी ओळखले होते. तोच विचार घेऊन आम्ही काम करीत आहोत. केंद्रातील मोदी सरकारने स्वीकारलेला ‘सब का साथ सब का विकास’ हा मंत्र शाहूंच्या विचारातील आहे. राज्य सरकारने सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना शाहूंच्या शेतीविषयक कामावर आधारलेली आहे. आम्हाला सत्तेचा लोभ नाही. सिंहासनाची आस नाही. शिवाजी, शाहू यांच्या विचारांच्या पथदर्शक मार्गावरून विकास करून दाखविण्याची आस आहे. शाहू महाराज कोणा एका जातीचे, वर्गाचे नव्हते, ही गोष्ट या ग्रंथाच्या माध्यमातून समोर आली आहे. गौरवग्रंथात तौलनिक लेखाजोखा मांडला गेला असून, खरा इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न रमेश जाधव यांनी केला, असे उद्गार शिक्षणमंत्री तावडे यांनी यावेळी काढले. सरकार कोणाचे का असेना; पण शाहू विचारांचे कार्य पुढे नेण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांचे सरकार करीत आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख श्रीमंत शाहू छत्रपती यांनी यावेळी केला. याप्रसंगी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, उल्हास पाटील, आदी उपस्थित होते. प्रा. रमेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. पंधरा वर्षांत काम रखडले गेल्या पंधरा वर्षांत शाहू, फुले, आंबेडकर यांच्या जीवनावरील ग्रंथांचे काम रखडले होते. दररोज एक पान लिहिले गेले असते तरी हे ग्रंथ पूर्ण झाले असते. उठता-बसता त्यांची नावे घेतली आणि त्याचवेळी प्रेरणा देणारा वारसा नवा पिढीसमोर मांडण्याची जबाबदारी असताना ग्रंथाचे काम रखडून ठेवले गेले. मात्र, आमचे सरकार सत्तेवर आल्याबरोबर या तीन व्यक्तींच्या ग्रंथांचे काम अग्रक्रमाने हाती घेतले. चांगले काम चांगल्या माणसांच्या हातूनच व्हावे, अशीच सर्वांची इच्छा असल्याने काम रेंगाळले असावे, असे तावडे म्हणाले.