शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

जमीनच नसताना १९ हजार जणांकडून ‘पी. एम. किसान’चा लाभ, कोल्हापुरात महसूल विभागाच्या चौकशीत उघड 

By राजाराम लोंढे | Updated: March 1, 2023 17:04 IST

खरे लाभार्थी मात्र वंचित

राजाराम लोंढेकोल्हापूर : केंद्र सरकारच्या ‘पी. एम. किसान’ पेन्शन योजनेंतर्गत महसूल विभागाने केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली असून, ज्यांच्या नावावर एक गुंठाही जमीन नाही, अशा १९ हजार जणांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. महसूल विभागाने पात्र खातेदारांसाठी चाळण लावली असून, आता एका कुटुंबातील एकाच खातेदाराला लाभ मिळणार असल्याने तेराव्या हप्त्यात तब्बल ७८ हजार ६८५ खातेदारांची पेन्शन बंद करण्यात आली आहे.केंद्र सरकार शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये पेन्शन देते. सुरुवातीच्या टप्प्यात नोंदणीचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांची संख्या झाली. जिल्ह्यात ५ लाख ३७ हजार खातेदार आहेत. या सगळ्यांना पहिले काही हप्ते मिळाले. मात्र, दीड वर्षापूर्वी तक्रार झाल्यानंतर या लाभार्थ्यांची चौकशी झाली आणि २३ हजार बोगस लाभार्थी सापडले. आयकर परतावा करणारे शेतकरी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले. बाराव्या हप्त्यात बोगस १३ हजार खातेदारांची पेन्शन बंद झाली.लाभार्थी खरेच शेतकरी आहेत का? याची तपासणी करण्याचे आदेश डिसेंबरमध्ये देण्यात आले होते. त्यामध्ये तब्बल १९ हजार लाभार्थ्यांच्या नावावर गुंठाभरही जमीन नसल्याचे उघड झाले आहे. त्यांच्यासह एकाच कुटुंबातील दोन - तीन खातेदार लाभार्थी होते. त्याऐवजी कुटुंबातील एकालाच पेन्शन मिळणार असल्याने तेराव्या हप्त्यात जिल्ह्यातील ७८ हजार ६८५ लाभार्थ्यांची पेन्शन बंद करण्यात आली आहे. चाळण लावल्यानेच तेरावा हप्ता एक महिना उशिरा आला असून, जिल्ह्यातील किमान १ लाख लाभार्थ्यांची पेन्शन बंद होण्याची शक्यता आहे.राहतोय एकीकडे, शेती दुसरीकडेचमहसूल विभागाच्या चौकशीत अनेक गोष्टी लक्षात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने लाभार्थी राहतोय एका गावात आणि त्याच्या नावावर दुसरीकडेच शेती आहे. अशा शेतकऱ्यांना लाभ द्यायचा का? असा प्रश्न महसूल यंत्रणेपुढे आहे.प्लॉटच्या सात-बारावर लाभकाहीं जणांकडे शेती नाही. मात्र, घराच्या बांधकामासाठी प्लॉट घेतले आहेत. त्याचा सात-बारा उतारा दाखवून लाभ घेतल्याची अनेक प्रकरणे आहेत.

खरे लाभार्थी मात्र वंचितया योजनेत बोगस लाभार्थी आढळल्याने गेली दीड वर्षे नवीन पात्र ३ हजार खातेदारांचे प्रस्ताव धूळ खात पडून आहेत. त्याचबरोबर हे काम महसूल विभागाकडून कृषी विभागाकडे वर्ग केले खरे, तरीही काम ठप्पच आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे विचारणा केली तर आम्हाला अजून लॉगिन पासवर्ड मिळाला नसल्याचे अधिकारी सांगतात. त्यामुळे खरे लाभार्थी लाभापासून वंचित राहिले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना