शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

जमीनच नसताना १९ हजार जणांकडून ‘पी. एम. किसान’चा लाभ, कोल्हापुरात महसूल विभागाच्या चौकशीत उघड 

By राजाराम लोंढे | Updated: March 1, 2023 17:04 IST

खरे लाभार्थी मात्र वंचित

राजाराम लोंढेकोल्हापूर : केंद्र सरकारच्या ‘पी. एम. किसान’ पेन्शन योजनेंतर्गत महसूल विभागाने केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली असून, ज्यांच्या नावावर एक गुंठाही जमीन नाही, अशा १९ हजार जणांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. महसूल विभागाने पात्र खातेदारांसाठी चाळण लावली असून, आता एका कुटुंबातील एकाच खातेदाराला लाभ मिळणार असल्याने तेराव्या हप्त्यात तब्बल ७८ हजार ६८५ खातेदारांची पेन्शन बंद करण्यात आली आहे.केंद्र सरकार शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये पेन्शन देते. सुरुवातीच्या टप्प्यात नोंदणीचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांची संख्या झाली. जिल्ह्यात ५ लाख ३७ हजार खातेदार आहेत. या सगळ्यांना पहिले काही हप्ते मिळाले. मात्र, दीड वर्षापूर्वी तक्रार झाल्यानंतर या लाभार्थ्यांची चौकशी झाली आणि २३ हजार बोगस लाभार्थी सापडले. आयकर परतावा करणारे शेतकरी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले. बाराव्या हप्त्यात बोगस १३ हजार खातेदारांची पेन्शन बंद झाली.लाभार्थी खरेच शेतकरी आहेत का? याची तपासणी करण्याचे आदेश डिसेंबरमध्ये देण्यात आले होते. त्यामध्ये तब्बल १९ हजार लाभार्थ्यांच्या नावावर गुंठाभरही जमीन नसल्याचे उघड झाले आहे. त्यांच्यासह एकाच कुटुंबातील दोन - तीन खातेदार लाभार्थी होते. त्याऐवजी कुटुंबातील एकालाच पेन्शन मिळणार असल्याने तेराव्या हप्त्यात जिल्ह्यातील ७८ हजार ६८५ लाभार्थ्यांची पेन्शन बंद करण्यात आली आहे. चाळण लावल्यानेच तेरावा हप्ता एक महिना उशिरा आला असून, जिल्ह्यातील किमान १ लाख लाभार्थ्यांची पेन्शन बंद होण्याची शक्यता आहे.राहतोय एकीकडे, शेती दुसरीकडेचमहसूल विभागाच्या चौकशीत अनेक गोष्टी लक्षात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने लाभार्थी राहतोय एका गावात आणि त्याच्या नावावर दुसरीकडेच शेती आहे. अशा शेतकऱ्यांना लाभ द्यायचा का? असा प्रश्न महसूल यंत्रणेपुढे आहे.प्लॉटच्या सात-बारावर लाभकाहीं जणांकडे शेती नाही. मात्र, घराच्या बांधकामासाठी प्लॉट घेतले आहेत. त्याचा सात-बारा उतारा दाखवून लाभ घेतल्याची अनेक प्रकरणे आहेत.

खरे लाभार्थी मात्र वंचितया योजनेत बोगस लाभार्थी आढळल्याने गेली दीड वर्षे नवीन पात्र ३ हजार खातेदारांचे प्रस्ताव धूळ खात पडून आहेत. त्याचबरोबर हे काम महसूल विभागाकडून कृषी विभागाकडे वर्ग केले खरे, तरीही काम ठप्पच आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे विचारणा केली तर आम्हाला अजून लॉगिन पासवर्ड मिळाला नसल्याचे अधिकारी सांगतात. त्यामुळे खरे लाभार्थी लाभापासून वंचित राहिले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना