शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

Kolhapur News: अंबाबाईची मूर्ती बदलणार की संवर्धन?, देवस्थान, पुजाऱ्यांची नकारघंटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 12:10 IST

अंबाबाईच्या मूर्तीची झीज हा विषय गेल्या कित्येक वर्षांपासूनचा प्रलंबित आहे

कोल्हापूर : पुजारी आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीलाच अंबाबाईची मूर्ती बदलण्याची इच्छा नसल्याने गेली वर्षानुवर्षे देवीच्या मूळ मूर्तीची प्रतारणा सुरू आहे. दर दोन पाच वर्षांनी मूर्तीचे संवर्धन होते. पुढच्यावेळी ती आणखीनच खराब होते, पुन्हा तात्पुरतचे कोटिंग करून मूर्ती बदलण्याचा विषय पुढे ढकलला जाताे. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल तर मूर्ती बदलणे हाच एकमेव पर्याय आहे. दरम्यान आज, मंगळवारी पुरातत्त्वचे सहसंचालक विलास वहाने हे मूर्तीची पाहणी करणार आहेत.अंबाबाईच्या मूर्तीची झीज हा विषय गेल्या कित्येक वर्षांपासूनचा प्रलंबित आहे. मूळ मूर्तीत कोल्हापूरकरांच्या भावना गुंतल्या आहेत, मूर्ती बदलाचा निर्णय घेतला तर विरोध होईल या भीतीने आजवर या प्रश्नावर उघडपणे कोणी चर्चा केली नाही. हे खरेच आहे की देवतांच्या मूर्तीवर भाविकांची श्रद्धा असते, म्हणूनच मूर्ती दगडी असली तरी त्यापुढे नतमस्तक होतात. पण मूर्तीच धोक्यात आली असेल, तिची आणखी प्रतारणा होताना पाहणे हे एक भाविक म्हणून जास्त वेदनादायी आहे.

म्हणे आई कशी बदलणार?या विषयावर एका पुजाऱ्याने मूर्ती बदलावर आई कशी बदलणार असा युक्तिवाद मांडला; पण तिची रोज प्रतारणा होत राहणे आणि ते बघणे जास्त वेदनादायी आहे. अंबाबाईची मूर्ती यापूर्वी एकदा बदलली आहे. सध्याची मूर्ती पाहवत नाही अशा स्थितीत आहे. मूर्तीला चिरा, भेगा, खड्डे पडले आहेत, पण तशी मूर्तीची स्थिती चांगली आहे असा विचित्र निष्कर्ष पुरातत्त्व खात्याने दिला होता.

दुर्घटनेची वाट बघताय का?आतापर्यंत फक्त मूर्तीचा चेहरा सुस्थितीत होता; पण मागीलवर्षी मूर्तीचे नाक, ओठ, हनुवटी, कान ते गाल हा भागदेखील दुखावल्याने ऐन नवरात्राच्या तोेंडावर धोका नको म्हणून एका रात्रीत संवर्धन केले गेले. हाच प्रकार २०१५ पासून वारंवार केला जातो. सगळं आलबेल असेल तर लपवाछपवी का केली जात आहे.. की देवस्थान आणि पुजारी दुर्घटनेची वाट बघत आहेत.

शंकराचार्यांची समिती नेमा.. कोल्हापूरकरांना विश्वासात घ्यामूर्तीत भक्तांच्या भावना गुंतल्या असल्या तरी निर्णय घ्यावाच लागणार आहे, ती कधी ना कधी बदलावी लागणार आहे, ते अंतिम सत्य आहे. त्यासाठी देवस्थान समिती व पुजाऱ्यांनी एकत्र येऊन शंकराचार्यांची समिती नेमावी. कोल्हापूरकरांचीदेखील आता तशी मानसिकता झाली आहे. त्यामुळे आता देवस्थानने पुढाकार घेऊन मूर्ती बदलासाठी पावले उचलावीत.

मूर्तीची झीज अशी

  • १९२० साली एका पुजाऱ्याच्या हातून तांब्या निसटल्याने देवीचा हात दुखावला.
  • १९५५ साली वज्रलेप झाला. मात्र, तो चुकीच्या पद्धतीने केल्याने मूर्तीचे मूळ सौंदर्य नष्ट झाले.
  • १९९७ साली मूर्तीवरील स्नान, अभिषेक थांबवले
  • २०१५ साली मूर्तीवर रासायनिक संवर्धन केले गेले, त्यात मूर्तीच्या मस्तकावरील नाग, हातातील पानपात्र गायब केले.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर