शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
2
मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित
3
हरल्यावरही बक्षीस मिळतं पहिल्यांदाच पाहिलं! पाकच्या लष्कर प्रमुखांची सोशल मीडियावर उडतेय खिल्ली
4
पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी
5
दहशतवादी हल्ल्याचा कट अन् प्रशिक्षणासाठी तरुणांना पाकमध्ये पाठवले; शहजादचे धक्कादायक खुलासे
6
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
7
लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पतीसोबत घटस्फोट घेणार अर्चना पूरण सिंग? अभिनेत्री म्हणाल्या- "आम्ही भांडतो, पण..."
8
जान्हवी कपूरचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवरुन नजरच हटेना
9
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
10
१२वी नापास सायबर गुन्हेगार, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान करत होता देशविरोधी काम! एटीएसकडून अटक
11
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
12
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
13
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
14
सरन्यायाधीश आले तर... न्या. गवई यांच्या जाहीर नाराजीनंतर सरकारने काढले आदेश
15
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
16
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
17
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
18
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
19
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले

कोल्हापूर हद्दवाढीसाठी पालकमंत्र्यांना कोणत्याही क्षणी घेराव घालणार, सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 18:03 IST

‘गोकुळ’साठी वेळ मात्र हद्दवाढीसाठी वेळ नाही

कोल्हापूर : हद्दवाढप्रश्नी चर्चा करण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी वेळ द्यावा, बैठक घ्यावी, अशी मागणी कृती समितीतर्फे अनेकवेळा केली. त्यांना ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदासाठी आमदारांना एकत्र करण्यास वेळ आहे; पण शहर आणि जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या हद्दवाढ विषयात ते बैठक घेत नाहीत, असा आरोप सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्या पदाधिकऱ्यांनी रविवारी झालेल्या बैठकीत केला. याच प्रश्नी पालकमंत्री आबिटकर यांना कोणत्याही घेराव घालण्याचे आंदोलनही यावेळी जाहीर केले. महाराणा प्रताप चौकात बैठक झाली.माजी महापौर आर.के.पोवार म्हणाले, वर्ष १९७२ पासून हद्दवाढीसाठी लढत आहोत. यापूर्वीचे सरकार आणि आताचे सरकार या विषयात फसवत आहे. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत महत्त्वाचे नेते, आमदार एकत्र येतात. तेच हद्दवाढीच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहेत. म्हणून हद्दवाढ झाल्याशिवाय महापालिकेची निवडणूक नको, अशी भूमिका घेऊ. पालकमंत्र्यांनी या विषयात वेळ दिलेली नाही. त्यांना घेराव घालून जाब विचारू.

बाबा पार्टे म्हणाले, शहराची हद्दवाढ होण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर हेच फक्त प्रयत्न करीत आहेत. शहराचे आमदार असल्याने त्यांचे ते कर्तव्यही आहे; पण ते यात एकाकी पडत आहेत.आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक यांच्या भूमिका ‘व्हय बी म्हणत नाहीत आणि नाही बी म्हणत नाहीत’ अशी आहे. पालकमंत्री आबिटकर हे ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदासाठी आमदारांना एकत्र करून बैठका घेत आहेत; मात्र हद्दवाढीकडे ते दुर्लक्ष करीत आहेत. म्हणून त्यांना कोणत्याही क्षणी घेराव घालून जाब विचारू. हद्दवाढ केली नाही तर पालकमंत्रिपदाची खुर्ची फार दिवस राहणार नाही, असेही त्यांना सांगू.सुशील भांदिगरे म्हणाले, हद्दवाढप्रश्नी नेते सोयीची भूमिका घेत आहेत. त्यामुळे शिवाजी पुलावर चक्काजाम करून उग्र आंदोलन छेडू. ‘आप’चे संदीप देसाई, राजू जाधव, अशोक भंडारे, अनिल कदम यांची भाषणे झाली. बैठकीस कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

आज खासदार यांच्यासोबत बैठकहद्दवाढ विषयावर खासदार शाहू छत्रपती यांच्या उपस्थितीत आमदार नरके, आमदार सतेज पाटील, अमल महाडिक, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेऊ. याच्या नियोजनाच्या चर्चेसाठी आज, सोमवारी दुपारी १२ वाजता खासदार शाहू छत्रपती यांची सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होईल, असे पोवार यांनी सांगितले. बैठकीतच पोवार यांनी खासदार छत्रपती यांना मोबाइलवर संपर्क वेळ निश्चित केली.

राजारामपुरीपासून जागृतीला सुरुवातॲड. बाबा इंदूलकर म्हणाले की, हद्दवाढीसाठी आंदोलन उभारण्यासाठी शहरात व्यापकपणे जागृती होणे आवश्यक आहे. यासाठी आज, सोमवारी सायंकाळी सहा वाजता राजारामपुरी तालीम कट्यावर बैठक होईल. या बैठकीनंतर शहरातील सर्व भागांत जागृतीसाठी बैठका होतील. जोपर्यंत हद्दवाढ होत नाही, तोपर्यंत आंदोलन तेवत ठेवू.

..तर प्रवेश कर लावारोज शहरात ग्रामीणमधील लोक आणि करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. याचा ताण शहरावर येत आहे. शहराच्या विकासाला निधी कमी पडत आहे. हद्दवाढ झाली नसल्याने विकास निधी भरीव मिळालेला नाही. पुढील काळात हद्दवाढ होणारच नसेल निधीसाठी शहरात येणाऱ्यांना प्रवेश कर लावा, अशी मागणी शिंदेसेनेचे किशोर घाटगे, काँग्रेसचे संपतराव पाटील यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरguardian ministerपालक मंत्री