शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

ज्यांनी महाराष्ट्र लुटला त्यांची चौकशी करणार : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 1:54 PM

गेल्या पंचवीस वर्षांत दोन-अडीचशे घराण्यांनी महाराष्ट्र लुटला आहे,

कोल्हापूर : गेल्या पंचवीस वर्षांत दोन-अडीचशे घराण्यांनी महाराष्ट्र लुटला आहे, साखर कारखाने मोडून खाल्ले आहेत, त्यांची चौकशी करणार असल्याची घोषणा महसूलमंत्री आणि भाजपा प्रदेध्याध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे केली. माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांच्या भाजपा प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते.मंत्री पाटील म्हणाले, 'महाराष्ट्रानेच नव्हे तर देशानेही नवे राजकीय वळण घेतले आहे. आतापर्यंत नेहरू-गांधी घराण्याने देश चालवला आणि शरद पवार यांच्यासारख्यानी महाराष्ट्र चालवला.पवार खासदार, मुलगी खासदार, पुतण्या माजी मंत्री आणि आता रोहित पवार विधानसभा लढवणार ही घराणेशाही नव्या पिढीला मान्य नाही. म्हणून लोक मोठ्या संख्येने भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. आम्ही ज्यांना पक्षात घेत आहे त्यांना कोणतीही भीती दाखवण्याची गरज नाही. ते लोक स्वखुषीने भाजपमध्ये येत आहेत. आयकर धाडी किंवा ईडीचे छापे काय आठ दिवसांत टाकता येत नाहीत, त्यासाठी त्या यंत्रणा सहा-सहा महिने त्या प्रकरणाचा अभ्यास करत असतात. त्यामुळे पवार किंवा हसन मुश्रीफ नुसता कांगावा करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना या कारवाईबद्दल हरकत असेल तर न्यायालयात दाद मागावी, आम्ही काय कुणाला अडवलेले नाही. दोन्ही काँग्रेसमधील दोन अडीचशे घराण्यांनी महाराष्ट्र लुटून नेल्याने मागच्या पाच वर्षांत आमचे सरकार हतबल होते. आता आपल्याला मजबूत सरकार आणायचे आहे. त्यासाठी नेटाने कामाला लागावे, असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले.––―――––―–―आमदार क्षीरसागर यांनी फार जोशात राहू नये : महेश जाधव यांचा टोलालोकसभा निवडणुकीत कोल्हापूरच्या जनतेने मातब्बर उमेदवारांना पराभूत केले आहे. त्यामुळे शिवसेनेचे कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी फार जोशात राहू नये, असा टोला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी लगावला. शिवसेनेचे सहा आमदार आणि दोन खासदार असले तरी भाजपाच आज जिल्ह्यातील एक नंबरचा पक्ष असल्याचा दावा त्यांनी केला.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील