शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

पंचगंगेसह सात नद्यांची पूररेषा निश्चित करणार; जलसंपदा विभागाचे आदेश : साडेचार कोटींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:23 IST

कोल्हापूर : जिल्ह्यातील पंचगंगेसह भोगावती, तुळशी, धामणी, कुंभी, जांभळी व कासारी या सात नद्यांची पूररेषा निश्चित करण्याचा निर्णय जलसंपदा ...

कोल्हापूर : जिल्ह्यातील पंचगंगेसह भोगावती, तुळशी, धामणी, कुंभी, जांभळी व कासारी या सात नद्यांची पूररेषा निश्चित करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. त्यासाठी ४ कोटी ६८ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली. पूररेषा निश्चित होईल परंतु त्यानुसार लागू केलेले निर्बंधांची कडक अंमलबजावणी होण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त झाली.

राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे बेंचमध्ये नद्यांच्या प्रदूषणाबाबत याचिके(२५-२०१४)मध्ये लवादाने अशा प्रकारची पूररेषा निश्चित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने ७ फेब्रुवारी २०२० ला या नद्यांची पूररेषा निश्चित करण्याबाबतचे पत्र दिले होते. या नद्यांच्या जलशास्त्रीय अभ्यास करून निषेधक (निळी) व नियंत्रक (लाल) पूररेषा निश्चिती व आखणी करण्यात येणार आहे. या कामासाठी ४ कोटी ६८ लाख ८७ हजार रक्कमेच्या अंदाजपत्रकास जलसंपदा विभागाने १ एप्रिल २०२१ ला मान्यता दिली आहे.

या सातही नद्यांची एकूण लांबी ३३८ किलोमीटर आहे. त्यातील एकट्या पंचगंगा नदीची श्री क्षेत्र प्रयागापासून नृसिंहवाडीपर्यंतची लांबी ७६ किलोमीटर आहे. यापूर्वी कोल्हापूर महापालिकेने शिवाजी पुलापासून शिरोली पुलापर्यंतची पंचगंगा नदीची पूररेषा निश्चित केली आहे. आता ती वगळून प्रयागापासून शिवाजी पूल व शिरोली पुलापासून ते नृसिंहवाडीपर्यंत नदीची पूररेषा निश्चित केली जाणार आहे. पूररेषा निश्चित केल्याने नदीच्या पात्रापासून किती अंतरापर्यंत बांधकामे करता येतील याची सीमारेषा निश्चित होते. त्याशिवाय भराव टाकून पात्र संकुचित करण्यावरही निर्बंध येतात. आता कोल्हापूर शहरवगळता पंचगंगेसह अन्य कोणत्याच नदीपासून किती अंतरापर्यंत बांधकामे करता येतील यासंबंधीचे फारसे निकष, नियम नाहीत. त्यामुळे एकदा ही नियमावली निश्चित झाल्यास सरसकट कुठेही बांधकामे करण्यावर किमान काही निर्बंध येतील. फक्त निश्चित केलेल्या पूररेषेशी सरकारी यंत्रणा किती प्रामाणिक राहते हेच महत्त्वाचे आहे.

राज्य शासनाने घेतलेला निर्णय नद्यांच्या सुरक्षतेसाठी व नदी व नदीचे पर्यावरण संरक्षणासाठी स्वागतार्ह आहे; परंतु एकदा पूररेषा निश्चित केल्यानंतर त्यासाठी निश्चित केलेल्या निर्बंधाची कडक अंमलबजावणी व्हायला हवी. अन्यथा नुसती कागदावर रेषा निश्चित करून फारसे काही पदरात पडणार नाही.

उदय गायकवाड

पंचगंगा प्रदूषण नियंत्रणासाठी उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीचे सदस्य