शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
5
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
6
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
7
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
10
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
11
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
12
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
13
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
14
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
15
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
16
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
17
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
18
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
19
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
20
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

बारामतीतच रात्री भारनियमन का?, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 14:14 IST

प्रश्न निर्माण करून आधी जनतेच्या डोळ्यात अश्रू आणायचे अणि नंतर ते पुसण्याचे नाटक महाविकास आघाडी सरकार करत आहे.

कोल्हापूर : ऊर्जामंत्र्यांच्या विभागाला केवळ नियोजन न जमल्यामुळे राज्यात वीजटंचाई निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीकडून ही कृत्रिम वीजटंचाई निर्माण करण्यात आली असून केवळ दलालांकडून वीजखरेदीसाठी आटापिटा सुरू असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे उपस्थित होते.हाळवणकर म्हणाले, प्रश्न निर्माण करून आधी जनतेच्या डोळ्यात अश्रू आणायचे अणि नंतर ते पुसण्याचे नाटक महाविकास आघाडी सरकार करत आहे. राज्यातील कोणतेही वीजनिर्मिती केंद्र कोळशाअभावी बंद नसल्याचे महानिर्मितीच्या वेबसाईटवर स्पष्ट म्हटले आहे. केंद्र सरकारने वीजखरेदीच्या दरावर मर्यादा घातल्याने हितसंबंधीयांचा जळफळाट सुरू आहे.महाराष्ट्र शासनाने महावितरणचे ९ हजार कोटी रुपये देणे आहे. ते दिल्यास सर्व प्रश्न सुटणार आहेत. परंतु केंद्र सरकारकडे बोट दाखवून ऊर्जामंत्री दिशाभूल करत आहेत. केंद्र सरकारने मार्चमध्ये सर्वाधिक म्हणजे रोज २ लाख १४ हजार टन कोळसा पुरवला आहे. तर ११ एप्रिलपर्यंत रोज १ लाख ७६ हजार टन कोळसा पुरवण्यात आला आहे. घोषित आणि अघोषित या भारनियमनामुळे समाज त्रस्त झाला आहे. त्यामुळे यातून दिलासा देण्याची गरज आहे.बारामतीतच रात्री भारनियमन का?राज्यात दिवसा भारनियमन आणि बारामतीत मात्र रात्री ११ ते पहाटे ५ असे भारनियमन हा भेदभाव का असा प्रश्न हाळवणकर यांनी उपस्थित केला. राज्यभरातील शेतकरी रात्रभर शेतातच रहावा अशी आघाडी सरकारची इच्छा आहे काय, असे ते म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरelectricityवीजBaramatiबारामतीFarmerशेतकरी