शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

बारामतीतच रात्री भारनियमन का?, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 14:14 IST

प्रश्न निर्माण करून आधी जनतेच्या डोळ्यात अश्रू आणायचे अणि नंतर ते पुसण्याचे नाटक महाविकास आघाडी सरकार करत आहे.

कोल्हापूर : ऊर्जामंत्र्यांच्या विभागाला केवळ नियोजन न जमल्यामुळे राज्यात वीजटंचाई निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीकडून ही कृत्रिम वीजटंचाई निर्माण करण्यात आली असून केवळ दलालांकडून वीजखरेदीसाठी आटापिटा सुरू असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे उपस्थित होते.हाळवणकर म्हणाले, प्रश्न निर्माण करून आधी जनतेच्या डोळ्यात अश्रू आणायचे अणि नंतर ते पुसण्याचे नाटक महाविकास आघाडी सरकार करत आहे. राज्यातील कोणतेही वीजनिर्मिती केंद्र कोळशाअभावी बंद नसल्याचे महानिर्मितीच्या वेबसाईटवर स्पष्ट म्हटले आहे. केंद्र सरकारने वीजखरेदीच्या दरावर मर्यादा घातल्याने हितसंबंधीयांचा जळफळाट सुरू आहे.महाराष्ट्र शासनाने महावितरणचे ९ हजार कोटी रुपये देणे आहे. ते दिल्यास सर्व प्रश्न सुटणार आहेत. परंतु केंद्र सरकारकडे बोट दाखवून ऊर्जामंत्री दिशाभूल करत आहेत. केंद्र सरकारने मार्चमध्ये सर्वाधिक म्हणजे रोज २ लाख १४ हजार टन कोळसा पुरवला आहे. तर ११ एप्रिलपर्यंत रोज १ लाख ७६ हजार टन कोळसा पुरवण्यात आला आहे. घोषित आणि अघोषित या भारनियमनामुळे समाज त्रस्त झाला आहे. त्यामुळे यातून दिलासा देण्याची गरज आहे.बारामतीतच रात्री भारनियमन का?राज्यात दिवसा भारनियमन आणि बारामतीत मात्र रात्री ११ ते पहाटे ५ असे भारनियमन हा भेदभाव का असा प्रश्न हाळवणकर यांनी उपस्थित केला. राज्यभरातील शेतकरी रात्रभर शेतातच रहावा अशी आघाडी सरकारची इच्छा आहे काय, असे ते म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरelectricityवीजBaramatiबारामतीFarmerशेतकरी