शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

Kolhapur: विशाळगड हिंसेचा तपास का रखडला?; इंडिया आघाडीचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 16:00 IST

कलमे वाढवून दोषींना अटक करण्याची मागणी

कोल्हापूर : विशाळगडाच्या पायथ्याला गजापूर आणि मुसलमानवाडीत झालेल्या हिंसेनंतर पोलिसांनी जाणीवपूर्वक भारतीय न्याय संहिता कलम १५२ नुसार गुन्हा दाखल केला नाही. काही संशयितांची नावे वगळली. त्यामुळे वाढीव कलमाचा समावेश करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी इंडिया आघाडीने निवेदनाद्वारे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे बुधवारी (दि. २४) केली. घटना घडून ११ दिवस उलटले तरी तपासाला गती का नाही? असा सवाल इंडिया आघाडीने उपस्थित केला.विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्याच्या मुद्द्यावरून काही संघटनांनी १४ जुलैला गजापूर आणि मुसलमानवाडीत हिंसा केली. त्या घटनेनंतर पोलिसांनी शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून २४ संशयितांना अटक केली. मात्र, अजूनही हिंसेचे सूत्रधार रवींद्र पडवळ आणि बंडा साळोखे यांना अटक झालेली नाही. याबाबत इंडिया आघाडीने बुधवारी विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची भेट घेऊन तपासाबद्दल नाराजी व्यक्त केली.ॲड. बाबा इंदुलकर यांनी कलम १५२ नुसार गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांनी टाळल्याचा आरोप केला. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे, राष्ट्रवादीचे आर. के. पोवार यांनी तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत तातडीने दोषींना अटक करण्याची मागणी केली. यावेळी इंडिया आघाडीचे संजय पवार, चंद्रकांत यादव, दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे, गणी आजरेकर आदी उपस्थित होते.गुन्हे मागे घेऊ नयेतहिंसा करणाऱ्यांना शिवभक्त संबोधून त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी काही नेत्यांकडून होत आहे. मात्र, गुन्हे मागे घेऊन कोणालाही पाठीशी घालू नये. उलट हिंसेला प्रोत्साहन देणारे आणि जमावबंदी असतानाही तरुणांना विशाळगडाच्या पायथ्याला येण्याचे आवाहन करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी आघाडीने केली.राष्ट्रपतींच्या भेटीची वेळ मागणारहिंसेचा तपास योग्य पद्धतीने व्हावा, याची मागणी करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार असल्याचे इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सांगितले. मुर्मू यांच्या कौल्हापूर दौऱ्यात पोलसांनी भेटीसाठी वेळ द्यावी, असे आवाहन ॲड. इंदुलकर यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर