शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

Kolhapur: विशाळगड हिंसेचा तपास का रखडला?; इंडिया आघाडीचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 16:00 IST

कलमे वाढवून दोषींना अटक करण्याची मागणी

कोल्हापूर : विशाळगडाच्या पायथ्याला गजापूर आणि मुसलमानवाडीत झालेल्या हिंसेनंतर पोलिसांनी जाणीवपूर्वक भारतीय न्याय संहिता कलम १५२ नुसार गुन्हा दाखल केला नाही. काही संशयितांची नावे वगळली. त्यामुळे वाढीव कलमाचा समावेश करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी इंडिया आघाडीने निवेदनाद्वारे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे बुधवारी (दि. २४) केली. घटना घडून ११ दिवस उलटले तरी तपासाला गती का नाही? असा सवाल इंडिया आघाडीने उपस्थित केला.विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्याच्या मुद्द्यावरून काही संघटनांनी १४ जुलैला गजापूर आणि मुसलमानवाडीत हिंसा केली. त्या घटनेनंतर पोलिसांनी शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून २४ संशयितांना अटक केली. मात्र, अजूनही हिंसेचे सूत्रधार रवींद्र पडवळ आणि बंडा साळोखे यांना अटक झालेली नाही. याबाबत इंडिया आघाडीने बुधवारी विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची भेट घेऊन तपासाबद्दल नाराजी व्यक्त केली.ॲड. बाबा इंदुलकर यांनी कलम १५२ नुसार गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांनी टाळल्याचा आरोप केला. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे, राष्ट्रवादीचे आर. के. पोवार यांनी तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत तातडीने दोषींना अटक करण्याची मागणी केली. यावेळी इंडिया आघाडीचे संजय पवार, चंद्रकांत यादव, दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे, गणी आजरेकर आदी उपस्थित होते.गुन्हे मागे घेऊ नयेतहिंसा करणाऱ्यांना शिवभक्त संबोधून त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी काही नेत्यांकडून होत आहे. मात्र, गुन्हे मागे घेऊन कोणालाही पाठीशी घालू नये. उलट हिंसेला प्रोत्साहन देणारे आणि जमावबंदी असतानाही तरुणांना विशाळगडाच्या पायथ्याला येण्याचे आवाहन करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी आघाडीने केली.राष्ट्रपतींच्या भेटीची वेळ मागणारहिंसेचा तपास योग्य पद्धतीने व्हावा, याची मागणी करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार असल्याचे इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सांगितले. मुर्मू यांच्या कौल्हापूर दौऱ्यात पोलसांनी भेटीसाठी वेळ द्यावी, असे आवाहन ॲड. इंदुलकर यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर