शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Kolhapur: विशाळगड हिंसेचा तपास का रखडला?; इंडिया आघाडीचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 16:00 IST

कलमे वाढवून दोषींना अटक करण्याची मागणी

कोल्हापूर : विशाळगडाच्या पायथ्याला गजापूर आणि मुसलमानवाडीत झालेल्या हिंसेनंतर पोलिसांनी जाणीवपूर्वक भारतीय न्याय संहिता कलम १५२ नुसार गुन्हा दाखल केला नाही. काही संशयितांची नावे वगळली. त्यामुळे वाढीव कलमाचा समावेश करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी इंडिया आघाडीने निवेदनाद्वारे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे बुधवारी (दि. २४) केली. घटना घडून ११ दिवस उलटले तरी तपासाला गती का नाही? असा सवाल इंडिया आघाडीने उपस्थित केला.विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्याच्या मुद्द्यावरून काही संघटनांनी १४ जुलैला गजापूर आणि मुसलमानवाडीत हिंसा केली. त्या घटनेनंतर पोलिसांनी शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून २४ संशयितांना अटक केली. मात्र, अजूनही हिंसेचे सूत्रधार रवींद्र पडवळ आणि बंडा साळोखे यांना अटक झालेली नाही. याबाबत इंडिया आघाडीने बुधवारी विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची भेट घेऊन तपासाबद्दल नाराजी व्यक्त केली.ॲड. बाबा इंदुलकर यांनी कलम १५२ नुसार गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांनी टाळल्याचा आरोप केला. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे, राष्ट्रवादीचे आर. के. पोवार यांनी तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत तातडीने दोषींना अटक करण्याची मागणी केली. यावेळी इंडिया आघाडीचे संजय पवार, चंद्रकांत यादव, दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे, गणी आजरेकर आदी उपस्थित होते.गुन्हे मागे घेऊ नयेतहिंसा करणाऱ्यांना शिवभक्त संबोधून त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी काही नेत्यांकडून होत आहे. मात्र, गुन्हे मागे घेऊन कोणालाही पाठीशी घालू नये. उलट हिंसेला प्रोत्साहन देणारे आणि जमावबंदी असतानाही तरुणांना विशाळगडाच्या पायथ्याला येण्याचे आवाहन करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी आघाडीने केली.राष्ट्रपतींच्या भेटीची वेळ मागणारहिंसेचा तपास योग्य पद्धतीने व्हावा, याची मागणी करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार असल्याचे इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सांगितले. मुर्मू यांच्या कौल्हापूर दौऱ्यात पोलसांनी भेटीसाठी वेळ द्यावी, असे आवाहन ॲड. इंदुलकर यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर