शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

कोल्हापूर : अंबाबाईच्या मूर्तीचे संवर्धन रात्रीच्या अंधारात का?, शिवसेनेचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 16:32 IST

अंबाबाईची मूर्ती दुखावल्याने रविवारी रात्री उशिरापर्यंत तातडीची संवर्धन प्रक्रिया करण्यात आली. हे करताना कमालीची गोपनीयता पाळली गेली.

कोल्हापूर : अंबाबाईच्या मूर्तीला असे काय झाले होते की तातडीने मूर्तीचे संवर्धन करावे लागले. रात्री कोणतेही धार्मिक कार्य करणे चुकीचे असताना रात्री आणि सीसीटीव्ही कॅमेरे बंद ठेवून रासायनिक प्रक्रिया का करण्यात आली, हे करताना समिती का नेमली नाही, अशी प्रश्नांची सरबत्ती करत शिवसेनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीवर मोर्चा काढण्यात आला.सचिव शिवराज नाईकवाडे यांना निवेदन दिल्यानंतर कोणत्या व्यक्तींनी आणि शासनस्तरावर काय पत्रव्यवहार झाला, कोणामुळे हे घडले, याची माहिती मिळाल्याशिवाय कार्यालय सोडणार नाही, अशी भूमिका घेतली. आज शनिवारी ही कागदपत्रे कार्यकर्त्यांना सुपूर्द केली जाणार आहेत.अंबाबाईची मूर्ती दुखावल्याने रविवारी रात्री उशिरापर्यंत तातडीची संवर्धन प्रक्रिया करण्यात आली. हे करताना कमालीची गोपनीयता पाळली गेली. हे उघडकीस आल्यानंतर शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी देवस्थान समितीवर मोर्चा काढून जाब विचारण्यात आला. विजय देवणे म्हणाले, एका पुजाऱ्याने सांगितले म्हणून पुरातत्व खात्याने तातडीने संवर्धन प्रक्रिया केली, असे होणार नाही. त्यामुळे कोणत्या मंत्र्यांनी, सरकारने हस्तक्षेप करत ही प्रक्रिया केली, हे उघड झाले पाहिजे. प्रशासनानेदेखील कुणाच्या सांगण्यावरून हे केले स्पष्ट व्हावे. रवी इंगवले यांनी याला जबाबदार असलेल्या घटकांवर कारवाईची मागणी केली.मुनीश्वर यांचा पाठपुरावा..देवस्थानचे सचिव नाईकवाडे यांनी ही प्रक्रिया व्हावी, यासाठी पुजारी गजानन मुनीश्वर यांनी पाठपुरावा केला. देवस्थान समितीने हा प्रस्ताव पाठवला नव्हता. समितीलादेखील निर्णय आल्यावरच कळाले असल्याचे सांगितले. आज शनिवारी या प्रक्रियेची कागदपत्रे कार्यकर्त्यांना दिली जाणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरShiv Senaशिवसेना