शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

कोल्हापूर : अंबाबाईच्या मूर्तीचे संवर्धन रात्रीच्या अंधारात का?, शिवसेनेचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 16:32 IST

अंबाबाईची मूर्ती दुखावल्याने रविवारी रात्री उशिरापर्यंत तातडीची संवर्धन प्रक्रिया करण्यात आली. हे करताना कमालीची गोपनीयता पाळली गेली.

कोल्हापूर : अंबाबाईच्या मूर्तीला असे काय झाले होते की तातडीने मूर्तीचे संवर्धन करावे लागले. रात्री कोणतेही धार्मिक कार्य करणे चुकीचे असताना रात्री आणि सीसीटीव्ही कॅमेरे बंद ठेवून रासायनिक प्रक्रिया का करण्यात आली, हे करताना समिती का नेमली नाही, अशी प्रश्नांची सरबत्ती करत शिवसेनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीवर मोर्चा काढण्यात आला.सचिव शिवराज नाईकवाडे यांना निवेदन दिल्यानंतर कोणत्या व्यक्तींनी आणि शासनस्तरावर काय पत्रव्यवहार झाला, कोणामुळे हे घडले, याची माहिती मिळाल्याशिवाय कार्यालय सोडणार नाही, अशी भूमिका घेतली. आज शनिवारी ही कागदपत्रे कार्यकर्त्यांना सुपूर्द केली जाणार आहेत.अंबाबाईची मूर्ती दुखावल्याने रविवारी रात्री उशिरापर्यंत तातडीची संवर्धन प्रक्रिया करण्यात आली. हे करताना कमालीची गोपनीयता पाळली गेली. हे उघडकीस आल्यानंतर शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी देवस्थान समितीवर मोर्चा काढून जाब विचारण्यात आला. विजय देवणे म्हणाले, एका पुजाऱ्याने सांगितले म्हणून पुरातत्व खात्याने तातडीने संवर्धन प्रक्रिया केली, असे होणार नाही. त्यामुळे कोणत्या मंत्र्यांनी, सरकारने हस्तक्षेप करत ही प्रक्रिया केली, हे उघड झाले पाहिजे. प्रशासनानेदेखील कुणाच्या सांगण्यावरून हे केले स्पष्ट व्हावे. रवी इंगवले यांनी याला जबाबदार असलेल्या घटकांवर कारवाईची मागणी केली.मुनीश्वर यांचा पाठपुरावा..देवस्थानचे सचिव नाईकवाडे यांनी ही प्रक्रिया व्हावी, यासाठी पुजारी गजानन मुनीश्वर यांनी पाठपुरावा केला. देवस्थान समितीने हा प्रस्ताव पाठवला नव्हता. समितीलादेखील निर्णय आल्यावरच कळाले असल्याचे सांगितले. आज शनिवारी या प्रक्रियेची कागदपत्रे कार्यकर्त्यांना दिली जाणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरShiv Senaशिवसेना