शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कोल्हापूर 'उत्तर'चे रणांगण: जयश्री जाधव यांची हवा, सत्यजित कदम यांचाही दावा, निकालाची उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 13:27 IST

महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव विरुद्ध भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्यात ही काटाजोड लढत झाली

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत नक्की हवा कुणाची याची बुधवारी दिवसभर जोरदार चर्चा रंगली. महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव विरुद्ध भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्यात ही काटाजोड लढत झाली आहे. दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे केले आहेत. परंतु काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव या बाजी मारतील, असे सर्वसाधारण जनमानस तयार झाले आहे.

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत झाली. रिंगणात एकूण पंधरा उमेदवार असले तरी मुख्य लढत दुरंगीच झाली. ही जागा कोणत्याही स्थितीत जिंकायचीच या दृष्टीने दोन्ही पक्षांनी सर्व यंत्रणा कामाला लावल्याने अखेरच्या क्षणापर्यंत लढतीतील चुरस कमी झाली नाही. मतदान किती होते याकडेही लोकांचे लक्ष होते.

पोटनिवडणुकीत सामान्यपणे कमी मतदान होते; परंतु या निवडणुकीत गेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाएवढेच मतदान झाले आहे. मतांची टक्केवारी वाढली असती तर लोक बदल करण्याच्या हेतून बाहेर पडले असा एक तर्क काढला जातो. परंतु येथे दोन्ही बाजूंने आपापले मतदान करून घेण्यासाठी प्रयत्न झाले आहेत.

काँग्रेसची हवा कशामुळे..

  • मुख्यत: मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, बुधवार, शुक्रवार पेठेचा परिसर आणि कसबा बाव़डा परिसरात काँग्रेसला चांगले मतदान झाल्याचा अंदाज त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. गेल्या निवडणुकीत शिवाजी पेठेने दिवंगत चंद्रकांत जाधव यांना चांगला हात दिला होता. या निवडणुकीत मंगळवार पेठेत जयश्री जाधव यांच्याबद्दल मोठी सहानुभूती राहिली. पेठेच्या उमेदवार म्हणून लोक स्वयंस्फूर्तीने मैदानात उतरल्याचे चित्र दिसले. त्याचा लाभ काँग्रेसला होण्याची शक्यता जास्त आहे. कसबा बावडा परिसरात सर्रास ७० ते ७२ टक्के मतदान झाले आहे. तेच निकालापर्यंत नेणारे असल्याचे काँग्रेसला वाटते.
  •  या निवडणुकीत शिवसेनेच्या मतांवर दोन्ही पक्षांचे जास्त लक्ष होते. शिवसेनेचा पारंपरिक मतदार काँग्रेसच्या हातावर शिक्का मारणार नाही, अशी हवा तयार करण्यात आली होती. परंतु माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह संजय पवार, विजय देवणे, हर्षल सुर्वे आदींनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश मानून जिवापाड काम केले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गडाला हादरे देण्यात फारसे यश आले नसल्याचे चित्र दिसते.
  • महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत अगोदरपासूनच एकजूट आहे. परंतु यावेळेला या दोन पक्षांसह शिवसेनेच्या नेते व कार्यकर्त्यांतही मनोमिलन झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रचारात या तिन्ही पक्षांत कुठे समन्वयाचा अभाव, विसंवाद फारसा दिसून आला नाही. सगळ्यांनी मिळून प्रचार यंत्रणा राबवली, मतदान बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. 

भाजपचा दावा कशाच्या बळावर..

  • भाजपला मानणारा शहरात पारंपरिक मतदार आहे. त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वाची मतदारांना अजूनही भुरळ आहे. पाच राज्यांतील यशानंतर भाजपची कोल्हापुरातही हवा तयार झाली होती. त्यामुळे कमळ या चिन्हाकडे पाहून चांगले मतदान झाल्याचे भाजपला वाटते.
  • या निवडणुकीत हिंदुत्वाचा खरा तारणहार भाजपच आहे, असे चित्र बिंबवण्याचा प्रयत्न या पक्षाकडून पद्धतशीरपणे झाला. अगदी मतदान केंदापर्यंत जय श्रीरामचा गजर सुरू होता. शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते काही झाले तरी हातावर शिक्का मारणार नाहीत, असा विश्वास भाजपला वाटत आहे. तो कितपत खरा ठरतो यावरच गुलाल ठरणार आहे.
  • शिवाजी पेठ, मंगळवार पेठ व कसबा बावडा या ठिकाणी भाजपचा बेस कमी असल्याने तिथे या पक्षाने सुरुवातीपासूनच सर्वात जास्त आर्थिक ताकद व यंत्रणा लावली होती. मुख्यत: शिवाजी पेठेत लिड नाही मिळाले तरी चालेल; परंतु तिथे फार मोठी पीछेहाट होऊ नये असेही प्रयत्न भाजपकडून झाले. शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील पेठेतील कार्यकर्त्यांने शेवटच्या काही दिवसांत कमळ हातात घेतल्याचे सांगण्यात येते.

सगळ्यात जास्त मतदान झालेली

कसबा बावडा येथील भारतवीर सामाजिक सभागृह : ८०.४८ (एकूण मते-३४०)

कसबा बावडा गावकामगार तलाठी कार्यालय : ८०.३४ (एकूण मते-८३४)

कसबा बावडा प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर : ८०.१४ (एकूण मते ११०८)

सगळ्यात कमी मतदान झालेले केंद्र

मध्यवर्ती विभागीय नियंत्रक कार्यालय (शिवाजी पार्क) - ४१.९९ (एकूण मते ९८६)

टॅग्स :kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरkolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभाcongressकाँग्रेसBJPभाजपा