शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

देशासाठी कुणी मरायला सांगितलं होतं? शहीद ऋषिकेश जोंधळेंच्या कुटुंबीयांना ग्रामसेवकाचा त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 19:31 IST

जोंधळे-डवरी वाद चव्हाट्यावर.

आजरा : वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील सुपुत्र ऋषिकेश जोंधळे देशाच्या सीमेवर शहीद झाले. त्यांच्याच आई-वडिलांना गावातील ग्रामसेवकाने अपमानास्पद शब्द वापरल्याची संतापजनक घटना समोर आली. तुझ्या मुलाला देशासाठी कोणी मरायला सांगितले होते असे अपमानास्पद शब्द ग्रामसेवक राजेंद्र उर्फ दत्तात्रय शंकरनाथ डवरी याने वापरले.ग्रामसेवक राजेंद्र उर्फ दत्तात्रय शंकरनाथ डवरी याने जोंधळे कुटुंबीयांना मानसिक व मानहानीकारक त्रास देणे सुरू केले आहे. या ग्रामसेवकाच्या त्रासापासून आपल्याला संरक्षण मिळावे अशी मागणी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांच्याकडे वीर पिता रामचंद्र जोंधळे व वीर माता कविता जोंधळे ( रा.बहिरेवाडी ता.आजरा) यांनी केली आहे.जोंधळे कुटुंबीयांनी दिलेल्या निवदेनात असे म्हटले आहे की, ऋषिकेश जोंधळे हे जम्मू-काश्मीरमध्ये देशाच्या सीमेवर लढताना १३ नोव्हेंबर २०२० रोजी शहीद झाले. मुलगा देशासाठी शहीद झाल्यानंतर गेल्या दीड वर्षापासून राज्यभरातून अनेक लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी माझ्या घरी भेट देत आहेत. मात्र ग्रामसेवक डवरी याला या गोष्टी खटकत असल्याने तो वारंवार माझा व माझ्या परिवाराचा अपमान करीत आहे.१ जून रोजी ग्रामसेवक डवरी यांनी माझ्या बरोबर नाहक वाद घातला व तुझ्या मुलग्याला देशासाठी कोणी मरायला सांगितले होते असे अपशब्द वापरून आपल्या देशाचा व देशाच्या सीमेवर लढणाऱ्या असंख्य जवानांचा त्यांनी अपमान केला आहे. ज्या तिरंग्यातून माझ्या मुलाचा देह बहिरेवाडी गावी आणला तो तिरंगा ध्वज मी माझ्या अंगणात उभा केला होता. ग्रामसेवक डवरी यांनी कुत्सित बुद्धीने तो ध्वजही मला बळजबरीने काढायला लावला.माझ्या घराचे बांधकाम चालू असताना ग्रामसेवक डवरी हा माझ्याकडील बांधकाम कामगारांना नाहक त्रास देत होता. त्याच्या घराचे बांधकामाचे साहित्य जाणून बुजून आमच्या घरासमोर टाकले होते. हे साहित्य काढून घेण्याची विनंती केली असता उलट आम्हालाच शिवीगाळ करून आमचे विरोधात खोटी तक्रार दिली. त्यामुळे माझ्या कुटुंबाची नाहक बदनामी झाली आहे. मुलगा शहीद झाल्यानंतर कुटुंबाचा आधार गेला. अशावेळी ग्रामसेवक डवरी माझ्या कुटुंबाचा जगण्याचा आधार काढून घेत आहे.भरचौकात फलक लावून बदनामीगेल्या आठवड्यात भरचौकात माझ्या कुटुंबीयांची फलक लावून बदनामी केली आहे व मानसिक खच्चीकरण केले आहे. त्यामुळे माझे कुटुंब पूर्णपणे असुरक्षित बनले आहे. एकीकडे ऋषिकेश जोंधळे शहीद झाल्यानंतर शासन, अधिकारी व समाजातून माझ्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला. मात्र आता ग्रामसेवक डवरी हा आमच्याच कुटुंबीयांच्या जीवावर उठला आहे. ग्रामसेवक डवरीपासून आमच्या जीविताला धोका आहे. तो प्रशासकीय सेवेत असल्यामुळे त्याच्या पदाचा वापर करून आमच्यावर दबाव आणत आहे त्याच्यापासून संरक्षण मिळावे, अशीही मागणी निवेदनातून रामचंद्र व कविता जोंधळे यांनी केली आहे.जोंधळे-डवरी वाद चव्हाट्यावरघरासमोर असणाऱ्या खडीच्या कारणावरून जोंधळे व दतात्रय शंकर डवरी यांच्या मध्ये १ जून रोजी वाद झाला होता . या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. डवरी यांनी आपल्याला मारहाण जोंधळे व त्यांच्या परिवाराने केली असल्याची वर्दी आजरा पोलिसांत केली होती. तेव्हा पासून डवरी व जोंधळे यांच्यात धुसफूस सुरु होती.डिटिजल बोर्ड हटवलाडवरी यांनी लावलेला फलक ग्रामपंचायतीने पोलिसांना बोलावून घेऊन हटवला असून तो फलक ताब्यात घेतला आहे . परस्पर विरोधी तक्रारी असल्याने डवरी व जोंधळे यांचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून पोलिस व ग्रामस्थ यांनी हा विषय सांमजस्याने सोडवला पाहिजे अशी ग्रामस्थांची धारणा आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस