शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अहो आश्चर्यम्! खड्ड्याची अशीही कृपा; मृत्यूच्या दाढेतून कोल्हापुरातील आजोबा आले बाहेर, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 18:00 IST

तात्यांना भेटायला नागरिकांची रीघ लागली

रमेश पाटीलकसबा बावडा (कोल्हापूर): मी विठ्ठलाचा भक्त. पंढरीची वारी माझी कधीही चुकली नाही. विठ्ठलामुळेच माझा पुनर्जन्म झालाय. त्यामुळे संक्रांत अन् गोळ्यांचा कोर्स संपल्यानंतर डॉक्टरांना विचारून पंढरपूरला विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी जाणार. हे शब्द आहेत मृत घोषित केलेल्या पांडुरंग रामा उलपे उर्फ पांडू तात्या यांचे.झाले असे की, पांडू तात्यांना पंधरा दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. त्यांना तात्काळ नातेवाईकांनी दवाखान्यात हलवले. पण उपचार सुरू असतानाच पांडू तात्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घरी अंत्यविधीची तयारी सुरू झाली, पै पाहुण्यांना निरोप देण्यात आले. पै पाव्हणे घरी जमू लागले. तात्यांना घरी घेवून जात असतानाच रस्त्यात ॲम्बुलन्स खड्ड्यात आदळली. या धक्क्याने तात्यांची काहीशी हालचाल सुरू झाली. ही गोष्ट लक्षात येताच त्यांना पुन्हा दवाखान्यात दाखल केले. तब्बल दोन आठवड्याच्या उपचारानंतर त्यांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला.कसबा बाबड्यातील पांडू तात्या शेतमजूर म्हणून काम करतात. त्यांना एक मुलगी आहे. १९८० सालापासून ते वारकरी संप्रदायात आहेत. सर्वांशी मिळून मिसळून वागणारे पांडू तात्या नेहमीप्रमाणे घरी देवाची पूजा करत असतानाच त्यांना हृदय विकाराचा झटका आला. पत्नी बाळाबाई यांनी आरडाओरडा करत शेजाऱ्यांना हाका मारल्या. लगेचच त्यांना दवाखान्यात हलवण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र अखेर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.त्यानंतर काही वेळातच नातेवाईकांनी अंत्यविधीची तयारी सुरू केली. दरम्यान, तात्यांना ॲम्बुलन्समधून घरी आणताना त्यांची पुन्हा हालचाल सुरू झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल केले. पुन्हा उपचार सुरू झाले. तात्या उपचाराला प्रतिसाद देऊ लागले. सोमवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या तात्यांना भेटावयास त्यांच्या घरी रीघ लागली आहे. संक्रांत झाल्यानंतर लगेचच पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणार असल्याची तात्या सांगत होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरDeathमृत्यू