शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांचे कोणत्या प्रकल्पात किती पैसे गुंतलेत याचे बिंग फोडणार, राजू शेट्टींचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 11:21 IST

शासनाच्या कंपन्या बंद पाडून या कंपन्या विकत घेण्याचे काम नेत्यांनी सुरू केले आहे; परंतु ते हाणून पाडावे लागेल.

कोल्हापूर : साखर कारखान्यांमधून शेतकऱ्यांना लुटून झाल्यानंतर आता या पांढऱ्या कपड्यातील दरोडेखोरांनी वीज प्रकल्पाच्या माध्यमातूनही पैसे लुटायला सुरुवात केली आहे. राज्यातील कोणत्या नेत्यांचे कोणत्या प्रकल्पात किती पैसे गुंतलेत याचे बिंग आठवडाभरात फोडणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला आहे.

शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करा या मागणीसाठी येथील महावितरणच्या कार्यालयासमोर शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सलग सातव्या दिवशी सोमवारी आंदोलन सुरू होते. त्यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शेट्टी बोलत होते. शुक्रवारपर्यंत जर याबाबत निर्णय झाला नाही, तर शुक्रवारनंतरचे आंदोलन वेगळे आणि आक्रमक असेल, असा इशाराही त्यांनी दिला.

ते म्हणाले, एक वीज प्रकल्प उभारण्यासाठी १५ ते २० कोटी रुपयांचा खर्च येतो. हीच वीज महावितरणाला विकून वर्षभरात हा पैसा वसूल होतो. त्यापुढे वीस वर्षे शेतकऱ्यांना लुटले जाते. शासनाच्या कंपन्या बंद पाडून या कंपन्या विकत घेण्याचे काम नेत्यांनी सुरू केले आहे; परंतु ते हाणून पाडावे लागेल.

विधानसभेचे अधिवेशन आता सुरू होणार आहे. हसन मुश्रीफ, सतेज पाटील हे दोन मंत्री मला भेटून गेले आहेत. त्यांनी दोन दिवस थांबायला सांगितले आहे. त्यामुळे शुक्रवारपर्यंत वाट पाहणार आहे; परंतु जर तोपर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर मात्र यापुढचे आंदोलन उग्र असेल. आम्ही निवडून दिलेले आमदार जर या विषयावर अधिवेशनात तोंड उघडणार नसतील तर त्यांनासुद्धा गाव बंद केले जाईल, असाही इशारा शेट्टी यांनी दिला.

सोमवारी दिवसभरात अनेक कार्यकर्त्यांनी शेट्टी यांना पाठिंबा दिला. शियेच्या सरपंच रेखा जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ शेट्टी यांना भेटले. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाजीराव पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त करून पाठिंबा व्यक्त केला. यावेळी प्रा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्ड्यान्नावर, तानाजी देसाई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

बारामतीत आंदोलन करायचे विसरलो नाही

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प मांडणार आहेत. शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहनात्मक अनुदान देणे अजून शिल्लक आहे. जर या अधिवेशनात ही तरतूद झाली नाही तर बारामतीत आंदोलन करायचे आम्ही विसरलेलाे नाही, असेही शेट्टी म्हणाले.

चांदोलीतून पाणी सोडण्यासाठी मंत्रालयातून फोन

चांदोली धरणाखालील शासनाचा विद्युत प्रकल्प गेले आठ महिने बंद होता. मी १५ फेब्रुवारीला विचारल्यानंतर तो सुरू करण्यात आला. तेथून आता आठ मेगावॅट वीज तयार झाली आहे. मग तिथला शासनाचा प्रकल्प बंद आणि ‘महती’ कंपनीचा सुरू हे कोणाच्या फायद्यासाठी होते. या कंपनीचा मालक कोण आहे, हे अजित पवार यांना चांगले माहिती आहे. मीही माहिती घेतोय. ‘महती’ला वीज तयार करता यावी म्हणून जलसंपदाच्या अधिकाऱ्यांना मंत्रालयातून कोणी फोन केले हे मोबाइलचे कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर उघड होईल, असेही शेट्टी म्हणाले.

...तर सर्व खटले माेफत लढू

शेट्टी यांच्या आंदोलनाला कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. एवढेच नव्हे, तर ही रास्त मागणी करताना जर खटले दाखल केले गेले तर सर्व खटल्यांचे कामकाज वकील मोफत करतील, अशी ग्वाहीही शिष्टमंडळाने दिली. अध्यक्ष ॲड. गिरीश खडके, सचिव ॲड. विजयकुमार ताटे, देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

बाकीचे आमदार कुठे गेले

हसन मुश्रीफ, सतेज पाटील हे दोन मंत्री आणि विनय कोरे, राजू आवळे हे दोन आमदार आंदोलनस्थळी भेटून गेले. बाकीचे आमदार आहेत कुठे अशी विचारणा शेट्टी यांनी केली. महाशिवरात्रीला आमदार गावातच थांबणार आहेत. तेव्हा त्यांना याबाबत जाब विचारा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीelectricityवीजRaju Shettyराजू शेट्टी