शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

महिला कधी सुरक्षित होणार ? कोल्हापूर जिल्ह्यात सात महिन्यांत ११० बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 16:40 IST

विनयभंगाचे २०५ गुन्हे दाखल, अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचेही प्रमाण चिंताजनक

कोल्हापूर : कोलकाता येथील डॉक्टर तरुणी आणि बदलापूर येथील दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्यानंतर पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कोल्हापुरातही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न चिंताजनक आहे. गेल्या सात महिन्यांत जिल्ह्यात बलात्काराचे ११० गुन्हे नोंद झाले, तर विनयभंगाचे २०५ गुन्हे दाखल झाले. १५८ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या, त्यामुळे महिला कधी सुरक्षित होणार? असा प्रश्न उपस्थित होतो.

या गुन्ह्यांमध्ये वाढगेल्या सात महिन्यांत बलात्काराचे ११०, तर विनयभंगाचे २०५ गुन्हे दाखल झाले. १५८ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले. बलात्कार आणि अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ चिंताजनक आहे. असे गुन्हे रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

कुटुंबातही मुली असुरक्षितअल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणारे बहुतांश आरोपी कुटुंबीय, जवळचे नातेवाईक, ओळखीतील व्यक्ती असतात. अनेकदा असे गुन्हे पोलिस ठाण्यांपर्यंत पोहोचतही नाहीत. कौटुंबिक छळाच्याही घटना वाढत आहेत. कुटुंबातच मुली आणि महिला असुरक्षित असल्याने त्यांच्या सुरक्षेची सुरुवात कुटुंबापासून होणे गरजेचे आहे.

संस्कार, प्रबोधन गरजेचेमुली आणि महिलांचा आदर राखणे, त्यांचा सन्मान करण्याचे संस्कार घरातून होणे गरजेचे आहे. पालकांनी विशेष खबरदारी घेऊन मुलांची जडणघडण केल्यास अशा प्रकारचे गुन्हे कमी होऊ शकतात. शाळा आणि महाविद्यालयांनीही यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडण्याची गरज आहे. तरच ही सामाजिक समस्या कमी होऊ शकेल.निर्भया पथकांनी आक्रमक व्हावेनिर्भया पथकांकडून सध्या शाळा, महाविद्यालये आणि गर्दीच्या ठिकाणी संशयितांवर कारवाया केल्या जातात, मात्र रोडरोमियो आणि हुल्लडबाजांना धडकी भरेल अशी कारवाई होणे गरजेचे आहे. कारवाईत सातत्य असावे. दोषींना शिक्षा झाली तरच असे गुन्हे करण्याचे धाडस कमी होईल. यासाठी ठोस कारवाया गरजेच्या आहेत.

महिलांसंबंधी गुन्ह्यांची आकडेवारीगुन्हा - दाखल - उघडखून - ८ - ८हुंड्यासाठी छळ - २० - २०बलात्कार - ११० - ११०विनयभंग - २०५ - २०५अपहरण - १५८ - १४४

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस