शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

महिला कधी सुरक्षित होणार ? कोल्हापूर जिल्ह्यात सात महिन्यांत ११० बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 16:40 IST

विनयभंगाचे २०५ गुन्हे दाखल, अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचेही प्रमाण चिंताजनक

कोल्हापूर : कोलकाता येथील डॉक्टर तरुणी आणि बदलापूर येथील दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्यानंतर पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कोल्हापुरातही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न चिंताजनक आहे. गेल्या सात महिन्यांत जिल्ह्यात बलात्काराचे ११० गुन्हे नोंद झाले, तर विनयभंगाचे २०५ गुन्हे दाखल झाले. १५८ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या, त्यामुळे महिला कधी सुरक्षित होणार? असा प्रश्न उपस्थित होतो.

या गुन्ह्यांमध्ये वाढगेल्या सात महिन्यांत बलात्काराचे ११०, तर विनयभंगाचे २०५ गुन्हे दाखल झाले. १५८ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले. बलात्कार आणि अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ चिंताजनक आहे. असे गुन्हे रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

कुटुंबातही मुली असुरक्षितअल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणारे बहुतांश आरोपी कुटुंबीय, जवळचे नातेवाईक, ओळखीतील व्यक्ती असतात. अनेकदा असे गुन्हे पोलिस ठाण्यांपर्यंत पोहोचतही नाहीत. कौटुंबिक छळाच्याही घटना वाढत आहेत. कुटुंबातच मुली आणि महिला असुरक्षित असल्याने त्यांच्या सुरक्षेची सुरुवात कुटुंबापासून होणे गरजेचे आहे.

संस्कार, प्रबोधन गरजेचेमुली आणि महिलांचा आदर राखणे, त्यांचा सन्मान करण्याचे संस्कार घरातून होणे गरजेचे आहे. पालकांनी विशेष खबरदारी घेऊन मुलांची जडणघडण केल्यास अशा प्रकारचे गुन्हे कमी होऊ शकतात. शाळा आणि महाविद्यालयांनीही यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडण्याची गरज आहे. तरच ही सामाजिक समस्या कमी होऊ शकेल.निर्भया पथकांनी आक्रमक व्हावेनिर्भया पथकांकडून सध्या शाळा, महाविद्यालये आणि गर्दीच्या ठिकाणी संशयितांवर कारवाया केल्या जातात, मात्र रोडरोमियो आणि हुल्लडबाजांना धडकी भरेल अशी कारवाई होणे गरजेचे आहे. कारवाईत सातत्य असावे. दोषींना शिक्षा झाली तरच असे गुन्हे करण्याचे धाडस कमी होईल. यासाठी ठोस कारवाया गरजेच्या आहेत.

महिलांसंबंधी गुन्ह्यांची आकडेवारीगुन्हा - दाखल - उघडखून - ८ - ८हुंड्यासाठी छळ - २० - २०बलात्कार - ११० - ११०विनयभंग - २०५ - २०५अपहरण - १५८ - १४४

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस