शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील बालिंगा पूल कधी खुला होणार, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 12:24 IST

कोपार्डे : दोन दिवस झाले पावसाचा जोर कमी झाल्याने कोल्हापूर -गगनबावडा मार्गावरील ठिकठिकाणी आलेले पाणी कमी झाले आहे. बालिंगा ...

कोपार्डे : दोन दिवस झाले पावसाचा जोर कमी झाल्याने कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील ठिकठिकाणी आलेले पाणी कमी झाले आहे. बालिंगा पुलाजवळील रस्त्यावर पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. पण रस्त्यावरील पाणी कमी झाले तरी पुलाजवळील पाणी पातळी कमी झाल्याशिवाय पूल वाहतुकीला खुला करणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.गेल्या आठवडाभर मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांचे पाणी धोका पातळीवर पोहोचले होते. सर्व महामार्गावर पाणी आल्याने रस्ते बंद केले होते. ब्रिटिशकालीन बालिंगा पुलाजवळ भोगावती नदीची पाणीपातळी मच्छिंद्रीपेक्षा जास्त झाल्यानंतर रस्त्यावर पाणी आले नसतानाही पुलाच्या सुरक्षेच्या कारणास्तव राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहतुकीसाठी बुधवारी बंद केला होता.गुरुवारी पहाटे दोनवडे बालिंगा पुलादरम्यान रस्त्यावर चार फूट पाणी आले होते. यामुळे गेले दोन दिवस वाहतूक बंद केली होती. पण पावसाचा जोर कमी झाल्याने हळूहळू कमी होत आहे. पाणी कमी झाले तरी पुलाजवळ पुराची पाणी पातळी मच्छिंद्रीच्या खाली गेल्याशिवाय पूल वाहतुकीला खुला केला जाणार नाही, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आहे. यामुळे या मार्गावरून शहरात जाणाऱ्या नोकरदार, शाळकरी विद्यार्थी, दूध, भाजीपाला विक्री अडचणीत येणार आहे. अधिकारांच्या भूमिकेवर लोकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मच्छिंद्रीपेक्षा नदीपात्रातील पाणी कमी झाले तरच धोका पातळी कमी होईल. ज्या पातळीवर वाहतूक बंद करण्यात आली त्या पातळीवर पाणी आल्याशिवाय वाहतुकीला पूल खुला होणार नाही. सर्वांनी सहकार्य करावे. - शुभम पाटील, उपअभियंताकोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागासाठी बालिंगा पुलावरील रहदारी सुरू होणे महत्त्वाचे आहे. इतर कोणताही मार्ग खुला नसताना रस्त्यावरील पाणी पातळी कमी झाल्यानंतर तांत्रिक बाबी सांगून अडवाअडवी केल्यास संघर्ष होईल. - राजेंद्र सूर्यवंशी, माजी पंचायत समिती सभापती करवीर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गfloodपूर