शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील बालिंगा पूल कधी खुला होणार, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 12:24 IST

कोपार्डे : दोन दिवस झाले पावसाचा जोर कमी झाल्याने कोल्हापूर -गगनबावडा मार्गावरील ठिकठिकाणी आलेले पाणी कमी झाले आहे. बालिंगा ...

कोपार्डे : दोन दिवस झाले पावसाचा जोर कमी झाल्याने कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील ठिकठिकाणी आलेले पाणी कमी झाले आहे. बालिंगा पुलाजवळील रस्त्यावर पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. पण रस्त्यावरील पाणी कमी झाले तरी पुलाजवळील पाणी पातळी कमी झाल्याशिवाय पूल वाहतुकीला खुला करणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.गेल्या आठवडाभर मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांचे पाणी धोका पातळीवर पोहोचले होते. सर्व महामार्गावर पाणी आल्याने रस्ते बंद केले होते. ब्रिटिशकालीन बालिंगा पुलाजवळ भोगावती नदीची पाणीपातळी मच्छिंद्रीपेक्षा जास्त झाल्यानंतर रस्त्यावर पाणी आले नसतानाही पुलाच्या सुरक्षेच्या कारणास्तव राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहतुकीसाठी बुधवारी बंद केला होता.गुरुवारी पहाटे दोनवडे बालिंगा पुलादरम्यान रस्त्यावर चार फूट पाणी आले होते. यामुळे गेले दोन दिवस वाहतूक बंद केली होती. पण पावसाचा जोर कमी झाल्याने हळूहळू कमी होत आहे. पाणी कमी झाले तरी पुलाजवळ पुराची पाणी पातळी मच्छिंद्रीच्या खाली गेल्याशिवाय पूल वाहतुकीला खुला केला जाणार नाही, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आहे. यामुळे या मार्गावरून शहरात जाणाऱ्या नोकरदार, शाळकरी विद्यार्थी, दूध, भाजीपाला विक्री अडचणीत येणार आहे. अधिकारांच्या भूमिकेवर लोकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मच्छिंद्रीपेक्षा नदीपात्रातील पाणी कमी झाले तरच धोका पातळी कमी होईल. ज्या पातळीवर वाहतूक बंद करण्यात आली त्या पातळीवर पाणी आल्याशिवाय वाहतुकीला पूल खुला होणार नाही. सर्वांनी सहकार्य करावे. - शुभम पाटील, उपअभियंताकोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागासाठी बालिंगा पुलावरील रहदारी सुरू होणे महत्त्वाचे आहे. इतर कोणताही मार्ग खुला नसताना रस्त्यावरील पाणी पातळी कमी झाल्यानंतर तांत्रिक बाबी सांगून अडवाअडवी केल्यास संघर्ष होईल. - राजेंद्र सूर्यवंशी, माजी पंचायत समिती सभापती करवीर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गfloodपूर