शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील बालिंगा पूल कधी खुला होणार, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 12:24 IST

कोपार्डे : दोन दिवस झाले पावसाचा जोर कमी झाल्याने कोल्हापूर -गगनबावडा मार्गावरील ठिकठिकाणी आलेले पाणी कमी झाले आहे. बालिंगा ...

कोपार्डे : दोन दिवस झाले पावसाचा जोर कमी झाल्याने कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील ठिकठिकाणी आलेले पाणी कमी झाले आहे. बालिंगा पुलाजवळील रस्त्यावर पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. पण रस्त्यावरील पाणी कमी झाले तरी पुलाजवळील पाणी पातळी कमी झाल्याशिवाय पूल वाहतुकीला खुला करणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.गेल्या आठवडाभर मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांचे पाणी धोका पातळीवर पोहोचले होते. सर्व महामार्गावर पाणी आल्याने रस्ते बंद केले होते. ब्रिटिशकालीन बालिंगा पुलाजवळ भोगावती नदीची पाणीपातळी मच्छिंद्रीपेक्षा जास्त झाल्यानंतर रस्त्यावर पाणी आले नसतानाही पुलाच्या सुरक्षेच्या कारणास्तव राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहतुकीसाठी बुधवारी बंद केला होता.गुरुवारी पहाटे दोनवडे बालिंगा पुलादरम्यान रस्त्यावर चार फूट पाणी आले होते. यामुळे गेले दोन दिवस वाहतूक बंद केली होती. पण पावसाचा जोर कमी झाल्याने हळूहळू कमी होत आहे. पाणी कमी झाले तरी पुलाजवळ पुराची पाणी पातळी मच्छिंद्रीच्या खाली गेल्याशिवाय पूल वाहतुकीला खुला केला जाणार नाही, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आहे. यामुळे या मार्गावरून शहरात जाणाऱ्या नोकरदार, शाळकरी विद्यार्थी, दूध, भाजीपाला विक्री अडचणीत येणार आहे. अधिकारांच्या भूमिकेवर लोकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मच्छिंद्रीपेक्षा नदीपात्रातील पाणी कमी झाले तरच धोका पातळी कमी होईल. ज्या पातळीवर वाहतूक बंद करण्यात आली त्या पातळीवर पाणी आल्याशिवाय वाहतुकीला पूल खुला होणार नाही. सर्वांनी सहकार्य करावे. - शुभम पाटील, उपअभियंताकोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागासाठी बालिंगा पुलावरील रहदारी सुरू होणे महत्त्वाचे आहे. इतर कोणताही मार्ग खुला नसताना रस्त्यावरील पाणी पातळी कमी झाल्यानंतर तांत्रिक बाबी सांगून अडवाअडवी केल्यास संघर्ष होईल. - राजेंद्र सूर्यवंशी, माजी पंचायत समिती सभापती करवीर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गfloodपूर