शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

गुड न्यूज-देवस्थानचा कारभार आता भक्तांनाही समजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 11:20 IST

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमध्ये भविष्यात होणारे सगळे गैरकारभार रोखण्यासाठीचे पाऊल उचलत प्रशासक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी समितीचा सगळा कारभार पारदर्शी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमध्ये भविष्यात होणारे सगळे गैरकारभार रोखण्यासाठीचे पाऊल उचलत प्रशासक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी समितीचा सगळा कारभार पारदर्शी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत समिती अस्तित्वात आल्यापासून म्हणजे १९६९ पासूनचे आजवरचे सगळे ठराव, लेखापरीक्षण अहवाल, समितीची नियमावली-लागू असलेले कायदे व संबंधित सगळी कागदपत्रे पुढील आठवड्यात समितीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. ई ऑफिस ही संकल्पना राबवण्यात येणार आहे.

गेल्या चार वर्षात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमध्ये झालेल्या भ्रष्ट कारभारामुळे समितीवरील स्थानिक नागरिकांचाच नव्हे तर भाविकांचाही विश्वास उडाला आहे. तो परत मिळवणे हेच मोठे आव्हान असणार आहे. सध्या प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी कामकाज पाहत असल्याने त्यांनी अनेक नवनवीन संकल्पना राबवायला सुरुवात केली आहे.

समितीमधील भ्रष्टाचाराची गंभीर दखल घेत यापुढे येणाऱ्या विश्वस्तांना असा गैरकारभार करता येवू नये, किंवा त्यांनी घेतलेले निर्णय, ठराव, कामकाज याची सगळी माहिती नागरिकांना समजावी, सहजरीत्या बघता यावी यासाठी समितीच्या कामकाजासंबंधीची सगळी कागदपत्रे देवस्थानच्या वेबसाईटवर टाकण्यात येणार आहेत.

यात १९६९ पासूनचे सगळे ठराव, लेखापरिक्षण अहवाल, नियम-कायद्यातील तरतुदी यांचा समावेश आहे. या कागदपत्रांच्या स्कॅनिंगचे काम आता अंतिम टप्प्यात असून, पुढील आठवड्यात ते नागरिकांना पाहण्यासाठी खुले होणार आहे. हा टप्पा झाला की ई-ऑफिस ही संकल्पना राबवली जाणार आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे महाबीजची जबाबदारी होती, त्यावेळी ते ई- ऑफिस पद्धतीने कामकाज करत होते. त्यानुसार येथेदेखील कामकाज करण्याचा प्रयत्न असणार आहे.

टेंडर नको, सेवा द्या...

देवस्थान समितीच्या प्रत्येक कामासाठी ई टेंडर प्रक्रिया राबवली जाते. या टेंडरप्रक्रियेमध्येच सर्वाधिक भ्रष्टाचार होतो, मंदिरांचे रंगकाम, लाईटींग, मंडप, प्रसाद अशा लहान-सहान कामासाठी शासकीय नियमानुसार लाखोंची निविदा काढावी लागते, पण खर्च तेवढा नसतो, यातच खाबुगिरी होते, मंदिराच्या नावाखाली व्यापारीकरण होते. त्यामुळे बांधकामाशी संबंधित कामे वगळता अन्य सर्व कामे टेंडर प्रक्रिया राबवण्याऐवजी भाविकांच्या सहकार्यातून सेवारूपाने केली जाणार आहेत.

माहिती अधिकारात अर्ज मागण्याची गरज नाही!

माहिती अधिकारातून कोणत्याही नागरिकांनी माहिती मागितली की समितीकडून ती देण्यास टाळाटाळ केली जायची. विशेषत: सामाजिक कार्यकर्त्यांना काही तरी कारणे सांगून, त्याची माहितीच दिली जात नसे. दिलीच तर महिनाभर वाट पाहावी लागत असे. आता कागदपत्रेच वेबसाईटवर दिसणार असल्याने माहिती अधिकारात अर्ज मागण्याची गरज असणार नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर