शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोल्हापूरकरांची समजूत काढू, पण शक्तिपीठ होणार; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 15:38 IST

कृती समितीकडून निषेध

कोल्हापूर : मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना गोवा ते नागपूर हा शक्तिपीठ महामार्ग होणारच असे सांगितले. या महामार्गास नागपूरपासून सांगलीपर्यंत विरोध नाही. पण कोल्हापूरचा विरोध आहे. कोल्हापुरातील शेतकऱ्यांची चर्चा करून पर्यायी मार्ग काढू असे वक्तव्य केले. याचा शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्यावतीने निषेध करण्यात आला आहे.कृती समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, यवतमाळ व वर्धा सोडून इतर दहा जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी २०२४ पासून गेले दहा महिने आंदोलने शेतकरी व नागरिक करत आहेत. फडणवीस हे गृहमंत्री होते. त्यांना या सर्व आंदोलनाची खडानखडा माहिती असेल. महाराष्ट्रातील जनतेसमोर त्यांनी खोटे बोलू नये. गेले दहा महिने शेतकऱ्यांशी कोणतीही चर्चा त्यांनी केली नाही.कोल्हापूरमधील सहा तालुके वगळण्याचा आदेश महायुती सरकारने काढला होता. याचा साधा उल्लेख त्यांनी आपल्या वक्तव्यात केला नाही. शक्तिपीठ महामार्ग अनावश्यक, करदात्या जनतेचा पैशाचा चुराडा करणारा तर आहेच पण त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे व तो पर्यावरणविरोधी आहे. त्यामुळे तो शेतकरी व नागरिक रद्द केल्याशिवाय शांत बसणार नाहीत असा इशारा पत्रकात दिला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस