शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
2
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
3
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
4
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
5
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
6
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
7
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
8
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
9
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
10
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
11
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
12
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
13
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
14
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
15
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
16
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
17
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
18
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
19
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
20
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता आम्ही केला... पाव्हणं, आता या घराकडं ! कुंभोजला रस्ता लोकवर्गणीतून अतिक्रमणमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:58 IST

कुंभोज : हॅलो.... पाव्हणं, आमच्याकडं यायला नीट रस्ता नसल्यानं तुम्ही यायचंच टाळलंय. आता आमचा रस्ता आम्ही केला. गाडी थेट घरापर्यंत येतेय.

ठळक मुद्देपाणंदीने तुटलेली शेतं आणि दुभंगलेली माणसंही पुन्हा जोडली

कुंभोज : हॅलो.... पाव्हणं, आमच्याकडं यायला नीट रस्ता नसल्यानं तुम्ही यायचंच टाळलंय. आता आमचा रस्ता आम्ही केला. गाडी थेट घरापर्यंत येतेय. आतातरी या आमच्याकडं... कुंभोज (ता. हातकणंगले) येथील भोकरे मळ्यातील शेतकरी आदिनाथ भोकरे यांनी मोबाईलवरून पाहुण्यांना केलेली ही विनवणी. अतिक्रमणामुळे गायब झालेला पाणंद रस्ता लोकवर्गणीतून अतिक्रमणमुक्त केल्यानंतर यापूर्वी पायवाटेलाही मुकलेल्या भोकरे कुटुंबाच्या प्रमुखांनी आनंदाप्रीत्यर्थ पैै-पाहुण्यांना बोलावून घेऊन नवीन रस्ता दाखविला. इतकेच नव्हे, तर या पाणंदीने तुटलेली शेतं आणि दुभंगलेली माणसंही पुन्हा जोडली. आपलाच रस्ता आपण करणाऱ्या शेतकºयांचे या निमित्ताने गावात मोठे कौतुकही होत आ.कुंभोज-दानोळी रस्त्यापासून दक्षिणेस डोंगर पायथ्यापर्यंत जाणारी सुमारे दोन कि. मी. अंतराची भोकरे पाणंद ३५-४० वर्षांपूर्वी अस्तित्वात होती. तथापि, शेतकºयांनी केलेले अतिक्रमण, दोन्ही कडेने वाढलेली झाडवेली यामुळे पाणंद रस्ता पायवाटेपुरताही मोकळा राहिला नाही. परिणामी, उसासह अन्य शेतमालाची वाहतूक करणे शेतकºयांना कष्टाचे आणि खर्चिक होऊ लागले. रस्त्यासाठी एकमेकांकडून होणाºया अडवणुकीमुळे भोकरे कुटुंबीयांनी एक एकर शेती विकली, तर अनेकांनी ऊस पीक घेणे बंद केले. सतत चाळीस वर्षांपासूनच्या या समस्येवर वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील, विनायक पोतदार यांनी शेतकºयांना बळ देऊन रस्ता बनविण्यासाठी प्रवृत्त केले.एकरी पाच हजार रुपये वर्गणी काढून सुमारे दोन लाख रुपये खर्चून पाणंद अतिक्रमणमुक्त करण्यात आली. आपल्या वाटेसाठी शेतकºयांनीच पदरमोड करून रस्त्याचा प्रश्न सोडविला. सुमारे दोन कि.मी. पाणंद वाहतुकीस खुली झाल्याने भोकरे मळ्यात वास्तव्यास असणारी चार कुटुंबे सुखावली.रस्ता करण्यासाठी पुढाकार घेणारे अनिल भोकरे, रामा खोत, चंदू स्वामी, राजू भगत, सागर खोत, संजय भोरे, प्रकाश भोसे, रतन कोळी, प्रियदर्शन पाटील-नरंदेकर यांच्यासोबत शंभराहून अधिक शेतकºयांची रस्त्याच्या निमित्ताने एकजूट झाली आणि पाणंदीच्या रुंदीकरणाला विरोध करणारे एकमेकांच्या नुकसानीस आजवर कारण ठरलेले या भागातील शेतकºयांची शेतं वाटेमुळे पुन्हा जोडली गेली आणि रस्त्यासाठी झालेल्या वादविवादातून एकमेकांपासून दुभंगलेले शेतकरी कित्येक वर्षांनंतर हातात हात घालून या पाणंदीतूनच ये-जा करू लागले आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग