शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
2
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
3
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
4
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
5
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
6
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
7
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
8
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
9
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
10
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
11
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
12
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
13
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
14
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
15
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
16
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
17
'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
थ्रिलर फिल्मपेक्षाही भयंकर! जावयासोबत सासूचं सूत जुळलं, अडसर ठरणाऱ्या नवऱ्यालाच संपवलं
19
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...
20
गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं, तीन दिवसंपासून घसरतोय हा शेअर; आजही 5.58% आपटला, काय म्हणतात एक्सपर्ट?
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता आम्ही केला... पाव्हणं, आता या घराकडं ! कुंभोजला रस्ता लोकवर्गणीतून अतिक्रमणमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:58 IST

कुंभोज : हॅलो.... पाव्हणं, आमच्याकडं यायला नीट रस्ता नसल्यानं तुम्ही यायचंच टाळलंय. आता आमचा रस्ता आम्ही केला. गाडी थेट घरापर्यंत येतेय.

ठळक मुद्देपाणंदीने तुटलेली शेतं आणि दुभंगलेली माणसंही पुन्हा जोडली

कुंभोज : हॅलो.... पाव्हणं, आमच्याकडं यायला नीट रस्ता नसल्यानं तुम्ही यायचंच टाळलंय. आता आमचा रस्ता आम्ही केला. गाडी थेट घरापर्यंत येतेय. आतातरी या आमच्याकडं... कुंभोज (ता. हातकणंगले) येथील भोकरे मळ्यातील शेतकरी आदिनाथ भोकरे यांनी मोबाईलवरून पाहुण्यांना केलेली ही विनवणी. अतिक्रमणामुळे गायब झालेला पाणंद रस्ता लोकवर्गणीतून अतिक्रमणमुक्त केल्यानंतर यापूर्वी पायवाटेलाही मुकलेल्या भोकरे कुटुंबाच्या प्रमुखांनी आनंदाप्रीत्यर्थ पैै-पाहुण्यांना बोलावून घेऊन नवीन रस्ता दाखविला. इतकेच नव्हे, तर या पाणंदीने तुटलेली शेतं आणि दुभंगलेली माणसंही पुन्हा जोडली. आपलाच रस्ता आपण करणाऱ्या शेतकºयांचे या निमित्ताने गावात मोठे कौतुकही होत आ.कुंभोज-दानोळी रस्त्यापासून दक्षिणेस डोंगर पायथ्यापर्यंत जाणारी सुमारे दोन कि. मी. अंतराची भोकरे पाणंद ३५-४० वर्षांपूर्वी अस्तित्वात होती. तथापि, शेतकºयांनी केलेले अतिक्रमण, दोन्ही कडेने वाढलेली झाडवेली यामुळे पाणंद रस्ता पायवाटेपुरताही मोकळा राहिला नाही. परिणामी, उसासह अन्य शेतमालाची वाहतूक करणे शेतकºयांना कष्टाचे आणि खर्चिक होऊ लागले. रस्त्यासाठी एकमेकांकडून होणाºया अडवणुकीमुळे भोकरे कुटुंबीयांनी एक एकर शेती विकली, तर अनेकांनी ऊस पीक घेणे बंद केले. सतत चाळीस वर्षांपासूनच्या या समस्येवर वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील, विनायक पोतदार यांनी शेतकºयांना बळ देऊन रस्ता बनविण्यासाठी प्रवृत्त केले.एकरी पाच हजार रुपये वर्गणी काढून सुमारे दोन लाख रुपये खर्चून पाणंद अतिक्रमणमुक्त करण्यात आली. आपल्या वाटेसाठी शेतकºयांनीच पदरमोड करून रस्त्याचा प्रश्न सोडविला. सुमारे दोन कि.मी. पाणंद वाहतुकीस खुली झाल्याने भोकरे मळ्यात वास्तव्यास असणारी चार कुटुंबे सुखावली.रस्ता करण्यासाठी पुढाकार घेणारे अनिल भोकरे, रामा खोत, चंदू स्वामी, राजू भगत, सागर खोत, संजय भोरे, प्रकाश भोसे, रतन कोळी, प्रियदर्शन पाटील-नरंदेकर यांच्यासोबत शंभराहून अधिक शेतकºयांची रस्त्याच्या निमित्ताने एकजूट झाली आणि पाणंदीच्या रुंदीकरणाला विरोध करणारे एकमेकांच्या नुकसानीस आजवर कारण ठरलेले या भागातील शेतकºयांची शेतं वाटेमुळे पुन्हा जोडली गेली आणि रस्त्यासाठी झालेल्या वादविवादातून एकमेकांपासून दुभंगलेले शेतकरी कित्येक वर्षांनंतर हातात हात घालून या पाणंदीतूनच ये-जा करू लागले आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग