शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

रस्ता आम्ही केला... पाव्हणं, आता या घराकडं ! कुंभोजला रस्ता लोकवर्गणीतून अतिक्रमणमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:58 IST

कुंभोज : हॅलो.... पाव्हणं, आमच्याकडं यायला नीट रस्ता नसल्यानं तुम्ही यायचंच टाळलंय. आता आमचा रस्ता आम्ही केला. गाडी थेट घरापर्यंत येतेय.

ठळक मुद्देपाणंदीने तुटलेली शेतं आणि दुभंगलेली माणसंही पुन्हा जोडली

कुंभोज : हॅलो.... पाव्हणं, आमच्याकडं यायला नीट रस्ता नसल्यानं तुम्ही यायचंच टाळलंय. आता आमचा रस्ता आम्ही केला. गाडी थेट घरापर्यंत येतेय. आतातरी या आमच्याकडं... कुंभोज (ता. हातकणंगले) येथील भोकरे मळ्यातील शेतकरी आदिनाथ भोकरे यांनी मोबाईलवरून पाहुण्यांना केलेली ही विनवणी. अतिक्रमणामुळे गायब झालेला पाणंद रस्ता लोकवर्गणीतून अतिक्रमणमुक्त केल्यानंतर यापूर्वी पायवाटेलाही मुकलेल्या भोकरे कुटुंबाच्या प्रमुखांनी आनंदाप्रीत्यर्थ पैै-पाहुण्यांना बोलावून घेऊन नवीन रस्ता दाखविला. इतकेच नव्हे, तर या पाणंदीने तुटलेली शेतं आणि दुभंगलेली माणसंही पुन्हा जोडली. आपलाच रस्ता आपण करणाऱ्या शेतकºयांचे या निमित्ताने गावात मोठे कौतुकही होत आ.कुंभोज-दानोळी रस्त्यापासून दक्षिणेस डोंगर पायथ्यापर्यंत जाणारी सुमारे दोन कि. मी. अंतराची भोकरे पाणंद ३५-४० वर्षांपूर्वी अस्तित्वात होती. तथापि, शेतकºयांनी केलेले अतिक्रमण, दोन्ही कडेने वाढलेली झाडवेली यामुळे पाणंद रस्ता पायवाटेपुरताही मोकळा राहिला नाही. परिणामी, उसासह अन्य शेतमालाची वाहतूक करणे शेतकºयांना कष्टाचे आणि खर्चिक होऊ लागले. रस्त्यासाठी एकमेकांकडून होणाºया अडवणुकीमुळे भोकरे कुटुंबीयांनी एक एकर शेती विकली, तर अनेकांनी ऊस पीक घेणे बंद केले. सतत चाळीस वर्षांपासूनच्या या समस्येवर वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील, विनायक पोतदार यांनी शेतकºयांना बळ देऊन रस्ता बनविण्यासाठी प्रवृत्त केले.एकरी पाच हजार रुपये वर्गणी काढून सुमारे दोन लाख रुपये खर्चून पाणंद अतिक्रमणमुक्त करण्यात आली. आपल्या वाटेसाठी शेतकºयांनीच पदरमोड करून रस्त्याचा प्रश्न सोडविला. सुमारे दोन कि.मी. पाणंद वाहतुकीस खुली झाल्याने भोकरे मळ्यात वास्तव्यास असणारी चार कुटुंबे सुखावली.रस्ता करण्यासाठी पुढाकार घेणारे अनिल भोकरे, रामा खोत, चंदू स्वामी, राजू भगत, सागर खोत, संजय भोरे, प्रकाश भोसे, रतन कोळी, प्रियदर्शन पाटील-नरंदेकर यांच्यासोबत शंभराहून अधिक शेतकºयांची रस्त्याच्या निमित्ताने एकजूट झाली आणि पाणंदीच्या रुंदीकरणाला विरोध करणारे एकमेकांच्या नुकसानीस आजवर कारण ठरलेले या भागातील शेतकºयांची शेतं वाटेमुळे पुन्हा जोडली गेली आणि रस्त्यासाठी झालेल्या वादविवादातून एकमेकांपासून दुभंगलेले शेतकरी कित्येक वर्षांनंतर हातात हात घालून या पाणंदीतूनच ये-जा करू लागले आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग