शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

अठरा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

By admin | Updated: June 28, 2014 00:47 IST

जिल्हाधिकारी : मुख्यमंत्र्यांनी ‘व्हीसी’वरून घेतला आढावा

कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या ६ टी.एम.सी. इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. यापैकी ३ टी.एम.सी. पाणी १५ जुलैपर्यंत शेती आणि पिण्यासाठी वापरले जाऊ शकते. जुलै महिन्यातही पावसाने दडी मारल्यास उर्वरित पाणी फक्त पिण्यासाठी वापरले जाऊ शकते, अशी माहिती जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी आज, शुक्रवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिली. त्यामुळे पाण्याची काटकसर करण्याची गरज असून नागरिकांनी गांभीर्याने पाहण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाणीसाठ्याचा व पीक परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य त्या सूचना दिल्या. पावसाने मारलेली दडी लक्षात घेता, मुख्यमंत्र्यांनी ही बाब चांगलीच गांभीर्याने घेतली आहे. आज राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला.जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यातील उसाची परिस्थिती चांगली आहे; परंतु भाताची पिके अडचणीत आहेत. सध्या ३३ टक्के इतक्याच पेरण्या झाल्या आहेत. भात पिकाच्या ३२ हजार हेक्टर क्षेत्राच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गतवर्षी या काळात ९० हजार हेक्टरमध्ये पेरण्या झाल्या होत्या. सोयाबीनच्या ६ हजार हेक्टरपर्यंत पेरण्या झाल्या असून गतवर्षी त्या या काळात ४५ हजार हेक्टरपर्यंत झाल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांवर पेरणीचे संकट ओढविण्याची शक्यता आहे. तृणधान्याची पेरणी अद्याप झालेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर पिके वाचविण्यासाठी तातडीने उपाययोजना करा. बंधाऱ्यांना बरगे घालून पाणी आडवा, अशा महत्त्वपूर्ण सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. (प्रतिनिधी)पालकमंत्र्यांच्या छायाचित्रास काळे फासलेटोलविरोधी कृती समितीचे आंदोलन : शाहूप्रेमींचे आवाहन धुडकावून कोल्हापूरला आल्याने संतापकोल्हापूर : कोल्हापूरचा टोल प्रश्न सोडविण्यास शासन अपयशी ठरले. राज्य शासनाचे प्रतिनिधी असलेले पालकमंत्री हर्षवर्धन पाटील हे निष्क्रिय आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांनी शाहू जयंतीला उपस्थित राहू नये, असे शाहूप्रेमींनी आवाहन केले होते तरीही पालकमंत्री कोल्हापुरात आले. त्याचा निषेध म्हणून टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आज, शुक्रवारी दसरा चौकात त्यांच्या छायाचित्रास काळे फासले. त्यांच्या विरोधात बोंब मारून निषेधाच्या घोषणा दिल्या.कोल्हापूरकर गेली चार वर्षे टोलविरोधी आंदोलन करत असूनही राज्य शासन ठोस निर्णयाप्रत पोहोचत नाही. राज्य शासनाने प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री हर्षवर्धन पाटील सपशेल अपयशी ठरले आहेत. राजर्षी शाहू जयंतीच्या अगोदर दोन दिवस शाहूप्रेमींनी पालकमंत्र्यांना कोल्हापुरात न येण्याचे आवाहन केले होते तरीही पालकमंत्र्यांनी शाहू जयंतीला उपस्थिती दर्शविली. ‘कोल्हापूरच्या प्रश्नांची जाण नसणाऱ्या पालकमंत्र्यांचा धिक्कार असो’ असे म्हणत दसरा चौकात कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाने बोंबही मारली.तत्पूर्वी महिला कार्यकर्त्या दीपाताई पाटील, वैशाली महाडिक, सुजित चव्हाण, विजया फुले यांनी शाहू पुतळा परिसर झाडून साफ केला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडून परिसर पवित्र केला. पुतळ्यास फुले वाहून अभिवादन केले. त्यानंतर पुतळ्याच्या समोर पालकमंत्र्यांच्या छायाचित्रास कार्यकर्त्यांनी काळी शाई लावली.पालकमंत्री इशारे देऊनही हजर राहिले. शाहू जयंतीला गालबोट नको म्हणून यादिवशी कार्यकर्ते शांत राहिले. अपमानजनक परिणामाची जबाबदारी पालकमंत्र्यांची राहील, असे यापूर्वीच बजावले होते तरीही ते हजर राहिले. निष्क्रिय पालकमंत्र्यांचा आम्ही निषेध करतो, अशी प्रतिक्रिया टोलविरोधी कृती समितीचे सदस्य अशोक पोवार यांनी दिली.यावेळी संभाजी जगदाळे, रामभाऊ चव्हाण, बाबा पार्टे, सतीशचंद्र कांबळे, जी. एस. पाटील, रघु कांबळे, गणी आजरेकर, जयकुमार शिंदे, दिलीप पवार, किशोर घाटगे, गौरव लांडगे यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)