शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

अठरा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

By admin | Updated: June 28, 2014 00:47 IST

जिल्हाधिकारी : मुख्यमंत्र्यांनी ‘व्हीसी’वरून घेतला आढावा

कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या ६ टी.एम.सी. इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. यापैकी ३ टी.एम.सी. पाणी १५ जुलैपर्यंत शेती आणि पिण्यासाठी वापरले जाऊ शकते. जुलै महिन्यातही पावसाने दडी मारल्यास उर्वरित पाणी फक्त पिण्यासाठी वापरले जाऊ शकते, अशी माहिती जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी आज, शुक्रवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिली. त्यामुळे पाण्याची काटकसर करण्याची गरज असून नागरिकांनी गांभीर्याने पाहण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाणीसाठ्याचा व पीक परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य त्या सूचना दिल्या. पावसाने मारलेली दडी लक्षात घेता, मुख्यमंत्र्यांनी ही बाब चांगलीच गांभीर्याने घेतली आहे. आज राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला.जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यातील उसाची परिस्थिती चांगली आहे; परंतु भाताची पिके अडचणीत आहेत. सध्या ३३ टक्के इतक्याच पेरण्या झाल्या आहेत. भात पिकाच्या ३२ हजार हेक्टर क्षेत्राच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गतवर्षी या काळात ९० हजार हेक्टरमध्ये पेरण्या झाल्या होत्या. सोयाबीनच्या ६ हजार हेक्टरपर्यंत पेरण्या झाल्या असून गतवर्षी त्या या काळात ४५ हजार हेक्टरपर्यंत झाल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांवर पेरणीचे संकट ओढविण्याची शक्यता आहे. तृणधान्याची पेरणी अद्याप झालेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर पिके वाचविण्यासाठी तातडीने उपाययोजना करा. बंधाऱ्यांना बरगे घालून पाणी आडवा, अशा महत्त्वपूर्ण सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. (प्रतिनिधी)पालकमंत्र्यांच्या छायाचित्रास काळे फासलेटोलविरोधी कृती समितीचे आंदोलन : शाहूप्रेमींचे आवाहन धुडकावून कोल्हापूरला आल्याने संतापकोल्हापूर : कोल्हापूरचा टोल प्रश्न सोडविण्यास शासन अपयशी ठरले. राज्य शासनाचे प्रतिनिधी असलेले पालकमंत्री हर्षवर्धन पाटील हे निष्क्रिय आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांनी शाहू जयंतीला उपस्थित राहू नये, असे शाहूप्रेमींनी आवाहन केले होते तरीही पालकमंत्री कोल्हापुरात आले. त्याचा निषेध म्हणून टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आज, शुक्रवारी दसरा चौकात त्यांच्या छायाचित्रास काळे फासले. त्यांच्या विरोधात बोंब मारून निषेधाच्या घोषणा दिल्या.कोल्हापूरकर गेली चार वर्षे टोलविरोधी आंदोलन करत असूनही राज्य शासन ठोस निर्णयाप्रत पोहोचत नाही. राज्य शासनाने प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री हर्षवर्धन पाटील सपशेल अपयशी ठरले आहेत. राजर्षी शाहू जयंतीच्या अगोदर दोन दिवस शाहूप्रेमींनी पालकमंत्र्यांना कोल्हापुरात न येण्याचे आवाहन केले होते तरीही पालकमंत्र्यांनी शाहू जयंतीला उपस्थिती दर्शविली. ‘कोल्हापूरच्या प्रश्नांची जाण नसणाऱ्या पालकमंत्र्यांचा धिक्कार असो’ असे म्हणत दसरा चौकात कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाने बोंबही मारली.तत्पूर्वी महिला कार्यकर्त्या दीपाताई पाटील, वैशाली महाडिक, सुजित चव्हाण, विजया फुले यांनी शाहू पुतळा परिसर झाडून साफ केला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडून परिसर पवित्र केला. पुतळ्यास फुले वाहून अभिवादन केले. त्यानंतर पुतळ्याच्या समोर पालकमंत्र्यांच्या छायाचित्रास कार्यकर्त्यांनी काळी शाई लावली.पालकमंत्री इशारे देऊनही हजर राहिले. शाहू जयंतीला गालबोट नको म्हणून यादिवशी कार्यकर्ते शांत राहिले. अपमानजनक परिणामाची जबाबदारी पालकमंत्र्यांची राहील, असे यापूर्वीच बजावले होते तरीही ते हजर राहिले. निष्क्रिय पालकमंत्र्यांचा आम्ही निषेध करतो, अशी प्रतिक्रिया टोलविरोधी कृती समितीचे सदस्य अशोक पोवार यांनी दिली.यावेळी संभाजी जगदाळे, रामभाऊ चव्हाण, बाबा पार्टे, सतीशचंद्र कांबळे, जी. एस. पाटील, रघु कांबळे, गणी आजरेकर, जयकुमार शिंदे, दिलीप पवार, किशोर घाटगे, गौरव लांडगे यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)