शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

Kolhapur: कळंबा तलावातील पाणीसाठ्याने तळ गाठला, ऐतिहासिक शाहूकालीन विहीर उघडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 18:20 IST

ऐन उन्हाळ्याच्या सुरवातीला पाणीप्रश्न ऐरणीवर 

अमर पाटीलकळंबा : यंदा प्रथमच मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अर्थात उन्हाळ्याच्या सुरुवातीला कळंबा तलावातील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. तलाव पात्रातील ऐतिहासिक शाहू कालीन विहीर उडली पडायला सुरुवात झाली आहे. या शाहू कालीन विहिरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कळंबा तलाव प्रदूषित होऊ नये म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी तलावानजीकची बालिंगा व कळंबा गावे तलाव पात्रापासून दूर वसवली. शिवाय संपूर्ण तलाव कोरडा पडला तरी ग्रामस्थांचे आणि मूक जनावरांचे पाण्याविना हाल होऊ नये म्हणून तलाव पात्रात भव्य विहीरीची उभारणी केली होती. आजमितीला कळंबा तलावात निव्वळ आठ फूट पाणीसाठा शिल्लक असून जलचरांच्या अस्तित्वासाठी हा पाणीसाठा पावसाळ्याच्या सुरवातीपर्यंत ठेवणे प्रशासनास क्रमप्राप्तच आहे. पावसाळ्यास अद्यापही अडीच महिन्याचा कालावधी आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगात होत असून डेड वॉटर शिल्लक राहिले तरी पाणीउपसा बंद करण्यात आला नसल्याने २०१६ नंतर पुन्हा यंदा तलाव कोरडा ठणठणीत पडणार हे निश्चित. त्यामुळे कळंबा ग्रामपंचायतीपुढे जैवविविधता कायम राखत पाणीप्रश्नाची भीषणता कमी करण्याचे मोठे आव्हान आहे. प्रशासनाने तलावाचा जीव घोटला गेल्या साठ वर्षात यशवंतग्राम निर्मलग्राम पुरस्कार विजेत्या कळंबा ग्रामपंचायतीला ग्रामस्थांसाठी स्वतःची पाणीपुरवठा योजना उभारता आली नाही. शिवाय पालिका मालिकीच्या तलावाचे पाणी ग्रामपंचायतिला हवे पण सत्तर लाखांची पाणीपट्टी भरण्याच्या प्रश्नी हात वर. तलावाच्या पाणलोट क्षेत्रात बिल्डर लॉबीने धुमाकूळ घातला असून त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणे सुरू झाले आहे. तर पालिका मालकीच्या तलावावर एकही कर्मचारी नियुक्त करण्यात आला नसल्याने तलावाची गटारगंगा होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी