शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

राधानगरी धरणातील पाणी सोडण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 14:55 IST

पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर राधानगरी धरणातील पाणीसाठा कमी होण्यासाठी कालपासून धरणाच्या मुख्य दरवाजातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. धरणात सद्या ०२:२३ टिएमसी पाणीसाठा आहे. पावसाला सुरुवात होईपर्यंत मागणीनुसार ह्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देराधानगरी धरणातील पाणी सोडण्यास सुरुवात

राधानगरी : पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर राधानगरी धरणातील पाणीसाठा कमी होण्यासाठी कालपासून धरणाच्या मुख्य दरवाजातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. धरणात सद्या ०२:२३ टिएमसी पाणीसाठा आहे. पावसाला सुरुवात होईपर्यंत मागणीनुसार ह्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.गतवर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने महापुराच्या संकटाला सामोरे जावे लागले होते. धरणातील शिल्लक पाणीसाठा, मोठ्या पाणलोट परिसरामुळे लवकर भरणारे धरण व पावसाचा उच्चांक या कारणामुळे ऑगस्ट महिन्यात महापुराचा कहर झाला होता.    उशिरापर्यंत झालेल्या पावसामुळे यावर्षी धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिला आहे. साडेआठ टीएमसी साठवण क्षमता असणाऱ्या या धरणात एप्रिलच्या सुरुवातीला ४.६५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता.

दोन महिन्यात सुरु असलेल्या लॉक डाऊन मुळे सर्व औद्योगिक व अन्य कारखाने बंद आहेत. त्यामुळे केवळ शेती आणि पिण्यासाठीच पाण्याचा  वापर सुरु  आहे. परिणामी पाण्याचा वापर कमी होता. 

येथील पाण्याचा विसर्ग जल विद्युतनिर्मिती केंद्राद्वारे केला जातो. गेल्या दीड महिन्यात यातून अडीच टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे  उन्हाळ्यातही भोगावती नदी दुथडी भरून वाहत आहे.

बुधवारी धरणातील पाणीसाठा दोन ०२:२३ टीएमसी व पाणी पातळी २९६ फुटावर आली. या पातळीवर जलविद्युत निर्मिती केंद्राचा पाणी पुरवठा बंद होतो. त्यामुळे धरणाच्या मुख्य दरवाजातून प्रतिसेकंद ९०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.     

सध्या मुख्य दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उपलब्ध असलेला पाणीसाठा व कोल्हापूर, इचलकरंजी येथील गरज व मागणी पाहून हा विसर्ग करण्यात येईल. पावसाचा अंदाज पाहूनच धरण रिकामे करण्याबाबत निर्णय येणार आहे. विवेक सुतार, शाखा अभियंता,राधानगरी

टॅग्स :radhanagari-acराधानगरीWaterपाणीkolhapurकोल्हापूरriverनदी