शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
4
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
5
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
6
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
7
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
8
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
9
दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
10
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
11
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
12
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
13
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
14
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
15
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
16
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
17
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
18
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
19
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
20
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ

राधानगरी धरणातील पाणी सोडण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 14:55 IST

पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर राधानगरी धरणातील पाणीसाठा कमी होण्यासाठी कालपासून धरणाच्या मुख्य दरवाजातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. धरणात सद्या ०२:२३ टिएमसी पाणीसाठा आहे. पावसाला सुरुवात होईपर्यंत मागणीनुसार ह्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देराधानगरी धरणातील पाणी सोडण्यास सुरुवात

राधानगरी : पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर राधानगरी धरणातील पाणीसाठा कमी होण्यासाठी कालपासून धरणाच्या मुख्य दरवाजातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. धरणात सद्या ०२:२३ टिएमसी पाणीसाठा आहे. पावसाला सुरुवात होईपर्यंत मागणीनुसार ह्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.गतवर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने महापुराच्या संकटाला सामोरे जावे लागले होते. धरणातील शिल्लक पाणीसाठा, मोठ्या पाणलोट परिसरामुळे लवकर भरणारे धरण व पावसाचा उच्चांक या कारणामुळे ऑगस्ट महिन्यात महापुराचा कहर झाला होता.    उशिरापर्यंत झालेल्या पावसामुळे यावर्षी धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिला आहे. साडेआठ टीएमसी साठवण क्षमता असणाऱ्या या धरणात एप्रिलच्या सुरुवातीला ४.६५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता.

दोन महिन्यात सुरु असलेल्या लॉक डाऊन मुळे सर्व औद्योगिक व अन्य कारखाने बंद आहेत. त्यामुळे केवळ शेती आणि पिण्यासाठीच पाण्याचा  वापर सुरु  आहे. परिणामी पाण्याचा वापर कमी होता. 

येथील पाण्याचा विसर्ग जल विद्युतनिर्मिती केंद्राद्वारे केला जातो. गेल्या दीड महिन्यात यातून अडीच टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे  उन्हाळ्यातही भोगावती नदी दुथडी भरून वाहत आहे.

बुधवारी धरणातील पाणीसाठा दोन ०२:२३ टीएमसी व पाणी पातळी २९६ फुटावर आली. या पातळीवर जलविद्युत निर्मिती केंद्राचा पाणी पुरवठा बंद होतो. त्यामुळे धरणाच्या मुख्य दरवाजातून प्रतिसेकंद ९०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.     

सध्या मुख्य दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उपलब्ध असलेला पाणीसाठा व कोल्हापूर, इचलकरंजी येथील गरज व मागणी पाहून हा विसर्ग करण्यात येईल. पावसाचा अंदाज पाहूनच धरण रिकामे करण्याबाबत निर्णय येणार आहे. विवेक सुतार, शाखा अभियंता,राधानगरी

टॅग्स :radhanagari-acराधानगरीWaterपाणीkolhapurकोल्हापूरriverनदी