शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

विशाळगड कात टाकतोय बुरुज, कमानींची उभारणी : शिवकालीन साक्षीदारांची पुनर्बांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 11:32 PM

स्वराज्यातील जाज्वल्य इतिहास आणि सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या किल्ले विशाळगडावरील शिवकालीन साक्षीदारांची पुनर्बांधणी होत आहे. शासनाच्या पर्यटन विकास निधीतून पाच कोटी रुपये बुरुजांच्या व दक्षिण कमानीच्या उभारणीसाठी उपलब्ध आहेत. गडाच्या प्रथमदर्शनीच्या बुरुजांची काळाच्या ओघात पडझड

ठळक मुद्देदर्गा कमानी व भगवा चौक बहरला. यातून ऐतिहासिक वास्तूचे वैभव खुलले आहे

आंबा : स्वराज्यातील जाज्वल्य इतिहास आणि सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या किल्ले विशाळगडावरील शिवकालीन साक्षीदारांची पुनर्बांधणी होत आहे. शासनाच्या पर्यटन विकास निधीतून पाच कोटी रुपये बुरुजांच्या व दक्षिण कमानीच्या उभारणीसाठी उपलब्ध आहेत. गडाच्या प्रथमदर्शनीच्या बुरुजांची काळाच्या ओघात पडझड झाली होती. बुरुजांचे घडीव दगड कोसळत होते. पावसाळ्यात बुरुजाखालून जाणे जीवघेणे ठरले होते.

कमानीही निखळल्या होत्या. त्यामुळे गडाचा तोंडावळा गायब झाला होता. सध्या या बुरुजांची बांधणी अंतिम टप्प्यात आल्याने गडाचा बाज साकारला आहे. तीन वर्षांपूर्वी प्रथमदर्शनीचा मुंडा दरवाजा व त्याला सलग्न असलेले दोन बुरूज बांधले गेले. शेजारी बेवारस अवस्थेत पडलेल्या तोफेला चौथरा करून ती सुरक्षित ठेवली आहे. यामुळे रणमंडळ टेकडीचा बाज बहरला आहे. गडावर जाणाऱ्या अरुंद सिडीच्या रस्त्याला पर्याय म्हणून उजव्या बाजूने पायºयांचा रुंद रस्ता, खंदकावरील सिमेंटचा पूल, भगवंतेश्वर मंदिराकडे जाणाºया मार्गाची दुरुस्ती झाली. गडावरील भगवंतेशवर मंदिरासह राममंदिर, भावकाई मंदिर, गणेश मंदिर, मलिक रेहान बाबांचा दर्गा यांचा जीर्णोद्धार झाला. अमृतेश्वर मंदिरासमोरील पाण्याचे टाके पुनर्जीवित केले. बाजीप्रभू व फुलाजींची समाधिस्थळे सुशोभित केली आहेत.

दर्गा कमानी व भगवा चौक बहरला. यातून ऐतिहासिक वास्तूचे वैभव खुलले आहे. गड आणि पायथ्यावर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बाजीप्रभू जलाशयातून (गजापूर) वाढीव पाणीपुरवठा योजनेला ग्रामपंचायतीने मंजुरी आणली आहे. त्याला निधी मिळून ती तातडीने होण्याची गरज आहे. अनेक दशके केंबुर्णेवाडी ते विशाळगड हा रस्ता निधीअभावी धुळीत होता. गेल्या वर्षी रस्ता डांबरीकरण होऊन पावनखिंडीकडून येणारा रस्ता व घाट यांचे दीड वर्षात बांधकाम गतिमान झाले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दुरावलेला पर्यटक पुन्हा इकडे वळू लागला आहे.

गेल्या पाच वर्षांपासून विशाळगडसह पावनखिंडीच्या विकासाला शासकीय निधी मिळू लागल्याने गडाचे व खिंडीचे अस्तित्व पुन्हा नजरेत भरू लागले आहे. पावनखिंडीतही पार्किंगसह नरवीर बाजीप्रभंूच्या पराक्रमांची साक्ष देणारे स्मारक, खिंडीत उतरण्यास दगडी पायºया, तसेच सुरक्षिततेसाठी कठडे उभारले आहेत. खिंडीकडे वळणाºया रस्त्यावरच दगडी निशाण चबुतरा, अर्धगोलाकार स्वागत कठडे उभारल्याने पावनखिंडीकडेपर्यटकांचे पाय वळत आहेत. येथे सर्वत्र पाण्याचे झरे आहेत. पाऊसही मोठा होतो. या परिसरात बंधाºयाचे बांधकाम करण्यासाठी सर्वेक्षण झाले आहे. वृक्षलागवड, जलाशय, बगीचा, पदभ्रमंतीतील धारकºयांना निवास व्यवस्था, सभागृह व स्वच्छतागृह यांच्या बांधकामाचेही प्रस्ताव झाले आहेत.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेनुसार राबलेले ‘आडवाटेवरचे पर्यटन’ यामध्ये पांढरेपाणी व पावनखिंड यांचा समावेश केला आहे. आता येथील प्रलंबित प्रस्तावांना निधी देण्याचे पालकत्व सांभाळावे, असा येथील भूमिपुत्रांचा आग्रह आहे.राजवाडा अर्धवटच...गडावरील भगवंतेश्वर मंदिरामागील पंतप्रतिनिधीचा राजवाडा हे गडाचे वैभव होते. हा वाडा भुईसपाट झाला होता. त्याला लागूनच पाण्याचा हौद व चंद्रकोर विहीर ही शिवकालीन पाण्याचे मोठे स्रोत आहेत; पण याकडे सर्वांचेच दुर्लक्ष आहे. राजवाडा पूर्ण झाला तर येथील हे पाणीस्रोत जपले जातील. प्राचीन बांधकामाचे हे दोन स्रोत ठेवाच आहे. मुंढा दरवाजाच्या बांधकामाबरोबर राजवाड्याचे बांधकाम सुरू झाले. चौथरे उभारले गेले; पण पुन्हा या बांधकामाला ‘खो’ बसला. या बांधकामास निधी मिळावा, अशी मागणी शिवाजी तरुण मंडळ व विशाळगडवासीयांनी केली आहे.

टॅग्स :Fortगडkolhapurकोल्हापूर