शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
5
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
6
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
7
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
8
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
9
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
10
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
11
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
12
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
13
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
14
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
15
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
16
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
17
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
18
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
19
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या

वसुंधरा चित्रपट महोत्सवांर्तगत वसुंधरा गौरव, वसुंधरा मित्र पुरस्कार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 12:46 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांनी शौर्याबरोबरच निसर्ग व गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची पावले उचलली होती. त्यांचा वारसा राजर्षी शाहू महाराजांनी पुढे चालविला. त्यावेळी राजे होते, आता प्रशासन आहे. निसर्ग संवर्धनाची जबाबदारी केवळ प्रशासनाची नाही. त्यासाठी सर्वांच्या कृतिशील पुढाकाराची गरज आहे, असे प्रतिपादन गुरुवारी संयोगिताराजे छत्रपती यांनी केले.

ठळक मुद्देवसुंधरा चित्रपट महोत्सवांर्तगत वसुंधरा गौरव, वसुंधरा मित्र पुरस्कार वितरणपर्यावरण संवर्धनासाठी सर्वांच्या पुढाकाराची गरज : संयोगिताराजे छत्रपती

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांनी शौर्याबरोबरच निसर्ग व गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची पावले उचलली होती. त्यांचा वारसा राजर्षी शाहू महाराजांनी पुढे चालविला. त्यावेळी राजे होते, आता प्रशासन आहे. निसर्ग संवर्धनाची जबाबदारी केवळ प्रशासनाची नाही. त्यासाठी सर्वांच्या कृतिशील पुढाकाराची गरज आहे, असे प्रतिपादन गुरुवारी संयोगिताराजे छत्रपती यांनी केले.शाहू स्मारक भवनात आयोजित १० व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांर्तगत वसुंधरा गौरव व वसुंधरा मित्र पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. व्यासपीठावर आर. आर. देशपांडे, वीरेंद्र चित्राव, धीरज जाधव, शुभम चेचर, ऋतू काशीद उपस्थित होत्या.

यावेळी डॉ. एस. व्ही. शिरोळ, डॉ. दीपक भोसले, महादेव नरके यांना वसुंधरा गौरव व छायाचित्रकार तय्यब अली, चिदंबर चिमणे व रॉबिनहूड आर्मी या संस्थेला वसुंधरा मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला.संयोगिताराजे म्हणाल्या, संस्थानकाळात राजेंचा शब्द प्रमाण मानून नागरिकांनी निसर्ग संवर्धनासाठीचे नियम पाळले. आता मात्र वर्षानुवर्षे प्रबोधन केले तरी अपेक्षित परिणाम होत नाही. त्यामुळेच काही वेळा कठोर पावले उचलावी लागतात. विशाळगडाजवळ आम्ही शिवारण्य नावाचं जंगल वसवलं आहे. एकेकाळी एकच झाड असलेल्या जमिनीवर आता दाट वनराई आहे. सर्व प्रकारचे वन्यजीव येथे येतात. प्लास्टिकच्या पिशव्यांना आम्ही कापडी पिशव्यांचा पर्याय दिला. आमच्या पातळीवर अनेक लहान-मोठी पावलं उचलत आहोत. त्याला सर्वांच्या साथीची आवश्यकता आहे.महादेव नरके, चिदंबर चिमणे यांनी मनोगत व्यक्त केले. उदय गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, महोत्सवात गुरुवारी सकाळी कात्यायनी मंदिर परिसरात हेरिटेज वॉक करण्यात आला.

 

 

टॅग्स :environmentपर्यावरणkolhapurकोल्हापूर