शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Atal Bihari Vajpayee : वाजपेयी हे दुर्मिळ व्यक्तिमत्व  : चंद्रकांत पाटील, कोल्हापूर भाजपतर्फे श्रध्दांजली सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 17:52 IST

केवळ आणि केवळ समाजाच्या भल्याचे ध्येय ज्यांनी आयुष्यामध्ये ठेवले. ज्यांच्याबद्दल एकही वाद निर्माण झाला नाही असे अटलबिहारी वाजपेयी हे एक दुर्मिळ व्यक्तिमत्व होते अशा शब्दात राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली वाहिली.

ठळक मुद्देवाजपेयी हे दुर्मिळ व्यक्तिमत्व  : चंद्रकांत पाटील, कोल्हापूर भाजपतर्फे श्रध्दांजली सभा

कोल्हापूर : केवळ आणि केवळ समाजाच्या भल्याचे ध्येय ज्यांनी आयुष्यामध्ये ठेवले. ज्यांच्याबद्दल एकही वाद निर्माण झाला नाही असे अटलबिहारी वाजपेयी हे एक दुर्मिळ व्यक्तिमत्व होते अशा शब्दात राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली वाहिली.भाजपच्या कार्यालयामध्ये शुक्रवारी दुपारी वाजपेयी यांनाश्रध्दांजली वाहण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री पाटील बोलत होते. वाजपेयी यांच्या आठवणी जागवत पाटील म्हणाले, सच्चा कार्यकर्ता कसा असावा याचे जिवंत उदाहरण म्हणजे वाजपेयी. सातत्याने समाजाचा, देशाचा आणि विश्वकल्याणाचा विचार त्यांच्या मनामध्ये असे.पंचगंगा बँकेचे चेअरमन राजाराम शिपुगडे म्हणाले, समरसता परिषदेसाठी आलेल्या वाजपेयी यांना कोल्हापुरात विरोध झाला. मात्र त्याच सभेत त्यांनी इंदिरा गांधी यांचा गौरव करता पक्षीय मतभेत बाजुला ठेवून राष्ट्रहिताला प्राधान्य दिले.

आमदार अमल महाडिक म्हणाले, त्यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी प्रयत्न करणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली आहे. सुभाष वोरा म्हणाले, तरूण, तडफदार वाजपेयी आम्ही पाहिले आहेत. त्यांना श्रध्दांजली वाहणे ही दुर्देवी वेळ आहे. कोणताही बडेजाव नसणारा असा हा नेता प्रेरणादायी होता.यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, प्र. द. गणपुले, महापालिकेतील गटनेते विजय सुर्यवंशी, भाजप महानगर अध्यक्ष संदीप देसाई यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष आशिष ढवळे, आर. डी. पाटील, माणिक पाटील, जयश्री जाधव,राहूल चिकोडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हेमंत आराध्ये यांनी सूत्रसंचालन केले.

चंद्रकांत यह तो मयनगरी हैपालकमंत्री पाटील म्हणाले, आजच जम्मू काश्मिरमध्ये झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सभेचा फोटो मला पाठवण्यात आला आहे. मी अखिल भारतीय संघटन मंत्री असल्याने वाजपेयी यांच्यासोबत व्यासपीठावर होतो. यानंतर बऱ्याच वर्षांनी मुंबईजवळच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या उद्घाटनासाठी आलेल्या वाजपेयी यांनी प्रबोधिनी फिरून पाहिल्यानंतर, ‘चंद्रकांत, यह तो मयनगरी है’ असे उद्गार काढले होते अशी आठवण पाटील यांनी सांगितली.

दोन महिन्यांपूर्वी घेतली होती भेटमी आणि मुख्यमंत्री दोन महिन्यांपूवीं दिल्लीला गेलो होतो. तेव्हा वाजपेयी यांना भेटण्यासाठी गेलो होते. त्यावेळी त्यांच्या कानात परिचितांनी सांगितले की, गंगाधरपंत का चिरंजीव आया है, अब सीएम बन गए है. चंद्रकांत आए है. परंतू दुर्देवाने अटलजींना यातील काहीही कळत नव्हते अशी आठवणही पाटील यांनी सांगितली.

 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीkolhapurकोल्हापूरChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटील