शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
3
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
4
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
5
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
6
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
7
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
8
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
9
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

ग्रामीण भागात वडापचाच आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:18 IST

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे १५ एप्रिल २०२१ पासून पुन्हा राज्यात सरकारने प्रथम आठ दिवसांचा लाॅकडाऊन आणि त्यानंतर कडक निर्बंध ...

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे १५ एप्रिल २०२१ पासून पुन्हा राज्यात सरकारने प्रथम आठ दिवसांचा लाॅकडाऊन आणि त्यानंतर कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यात कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाची वाढती संख्या आणि वाढता मृत्यूदरामुळे जिल्ह्याची गणना वर्गवारीनुसार शासनाने चौथ्या क्रमांकाची केली आहे. यात वाढती संख्या आणि रोजचे मृत्यू कमी आले तर तिसऱ्या वर्गवारीत जिल्ह्याला स्थान मिळणार आहे. त्यामुळे काहीअंशी निर्बंध कमी होतील. त्याचा फायदा एस. टी. महामंडळाच्या बसना होईल. या बस पूर्ण क्षमतेने आंतर ग्रामीण भागात नियमित प्रवासी सेवा देतील. रुग्ण संख्या आणि मृत्यू दर वाढता राहीला तर ही सेवा पन्नास टक्के क्षमतेनेच सुरू राहणार आहे. याकाळात सर्वसामान्यांना एस. टी. बस मार्गावर नसल्याने वडाप अर्थात सहा आसनी रिक्षा, तीन आसनी रिक्षा आदींची प्रवासासाठी मदत घ्यावी लागत आहे. अनेकांची इच्छा नसतानाही केवळ प्रवासासाठी पर्याय नसल्याने वडापसह खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागत आहे.

या गावांना अद्यापही बससेवा सुरू नाही

जिल्ह्याच्या बारा तालुक्यांमध्ये एस. टी. महामंडळाचे आगार आहे. यात कागल, आजरा, चंदगड, गडहिंग्लज, शाहूवाडी, शिरोळ, इचलकरंजी, राधानगरी, गारगोटी, मुरगुड, कुरुंदवाड, मलकापूर या आगाराअंतर्गत येणाऱ्या तालुक्यांमधील अंतर्गत ग्रामीण भागातील सर्व गावांमध्ये एस. टी. ची बससेवा कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे बंद आहे. ही सेवा राज्य शासनाने निर्बंध कमी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बससेवा सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतरच सुरु होणार आहे. सध्या केवळ तालुका ते कोल्हापूरातील मध्यवर्ती बसस्थानक आणि पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, मुंबई या जिल्ह्यातील प्रमुख बसस्थानकांवरच बस जात आहेत.

प्रवाशांना वडापसह खासगी वाहनांचा आधार

एसटीच्या बसेस केवळ जिल्हा ते तालुका आणि तालुका ते जिल्हा या मार्गावरच सुरु आहेत. त्यामुळे आंतर ग्रामीण भागातील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे प्रवाशांना खासगी प्रवासी वाहनांसह वडापचा आधार प्रवासासाठी घ्यावा लागत आहे.

सध्या सुरु असलेल्या बसची संख्या - ३५५

आगारात उभी असलेल्या बस संख्या - ३४५

एकूण कर्मचारी

चालक - १५००

वाहक -१५००

सध्या कामावर असलेले कर्मचारी

चालक - ७१०

वाहक -७१०

प्रतिक्रिया

आंतरग्रामीण भागात अद्यापही बस सेवा सुरु नसल्याने वडापचा आधार घ्यावा लागत आहे. एस.टी. बस सुरु झाल्यातर प्रवास सुखकर आणि सुरक्षित होतो.

पाेपट पाटील, करनूर, कागल

प्रतिक्रिया

एस.टी. बस सर्वसामान्यांचा आधार आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे ती बंद आहे. या काळात सर्वसामान्यांचा ग्रामीण भागात खासगी वाहनांचाच आधार आहे.

- सागर पाटील, निगवे