शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
5
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
6
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
7
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
8
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
9
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
10
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
11
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
12
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
13
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
14
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
15
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
16
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
17
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
18
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
20
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...

ग्रामीण भागात वडापचाच आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:18 IST

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे १५ एप्रिल २०२१ पासून पुन्हा राज्यात सरकारने प्रथम आठ दिवसांचा लाॅकडाऊन आणि त्यानंतर कडक निर्बंध ...

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे १५ एप्रिल २०२१ पासून पुन्हा राज्यात सरकारने प्रथम आठ दिवसांचा लाॅकडाऊन आणि त्यानंतर कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यात कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाची वाढती संख्या आणि वाढता मृत्यूदरामुळे जिल्ह्याची गणना वर्गवारीनुसार शासनाने चौथ्या क्रमांकाची केली आहे. यात वाढती संख्या आणि रोजचे मृत्यू कमी आले तर तिसऱ्या वर्गवारीत जिल्ह्याला स्थान मिळणार आहे. त्यामुळे काहीअंशी निर्बंध कमी होतील. त्याचा फायदा एस. टी. महामंडळाच्या बसना होईल. या बस पूर्ण क्षमतेने आंतर ग्रामीण भागात नियमित प्रवासी सेवा देतील. रुग्ण संख्या आणि मृत्यू दर वाढता राहीला तर ही सेवा पन्नास टक्के क्षमतेनेच सुरू राहणार आहे. याकाळात सर्वसामान्यांना एस. टी. बस मार्गावर नसल्याने वडाप अर्थात सहा आसनी रिक्षा, तीन आसनी रिक्षा आदींची प्रवासासाठी मदत घ्यावी लागत आहे. अनेकांची इच्छा नसतानाही केवळ प्रवासासाठी पर्याय नसल्याने वडापसह खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागत आहे.

या गावांना अद्यापही बससेवा सुरू नाही

जिल्ह्याच्या बारा तालुक्यांमध्ये एस. टी. महामंडळाचे आगार आहे. यात कागल, आजरा, चंदगड, गडहिंग्लज, शाहूवाडी, शिरोळ, इचलकरंजी, राधानगरी, गारगोटी, मुरगुड, कुरुंदवाड, मलकापूर या आगाराअंतर्गत येणाऱ्या तालुक्यांमधील अंतर्गत ग्रामीण भागातील सर्व गावांमध्ये एस. टी. ची बससेवा कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे बंद आहे. ही सेवा राज्य शासनाने निर्बंध कमी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बससेवा सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतरच सुरु होणार आहे. सध्या केवळ तालुका ते कोल्हापूरातील मध्यवर्ती बसस्थानक आणि पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, मुंबई या जिल्ह्यातील प्रमुख बसस्थानकांवरच बस जात आहेत.

प्रवाशांना वडापसह खासगी वाहनांचा आधार

एसटीच्या बसेस केवळ जिल्हा ते तालुका आणि तालुका ते जिल्हा या मार्गावरच सुरु आहेत. त्यामुळे आंतर ग्रामीण भागातील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे प्रवाशांना खासगी प्रवासी वाहनांसह वडापचा आधार प्रवासासाठी घ्यावा लागत आहे.

सध्या सुरु असलेल्या बसची संख्या - ३५५

आगारात उभी असलेल्या बस संख्या - ३४५

एकूण कर्मचारी

चालक - १५००

वाहक -१५००

सध्या कामावर असलेले कर्मचारी

चालक - ७१०

वाहक -७१०

प्रतिक्रिया

आंतरग्रामीण भागात अद्यापही बस सेवा सुरु नसल्याने वडापचा आधार घ्यावा लागत आहे. एस.टी. बस सुरु झाल्यातर प्रवास सुखकर आणि सुरक्षित होतो.

पाेपट पाटील, करनूर, कागल

प्रतिक्रिया

एस.टी. बस सर्वसामान्यांचा आधार आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे ती बंद आहे. या काळात सर्वसामान्यांचा ग्रामीण भागात खासगी वाहनांचाच आधार आहे.

- सागर पाटील, निगवे