शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
4
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
5
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
6
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
7
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
8
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
9
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
10
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
12
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
13
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
14
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
15
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
16
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
17
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
18
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

ग्रामीण भागात वडापचाच आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:18 IST

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे १५ एप्रिल २०२१ पासून पुन्हा राज्यात सरकारने प्रथम आठ दिवसांचा लाॅकडाऊन आणि त्यानंतर कडक निर्बंध ...

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे १५ एप्रिल २०२१ पासून पुन्हा राज्यात सरकारने प्रथम आठ दिवसांचा लाॅकडाऊन आणि त्यानंतर कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यात कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाची वाढती संख्या आणि वाढता मृत्यूदरामुळे जिल्ह्याची गणना वर्गवारीनुसार शासनाने चौथ्या क्रमांकाची केली आहे. यात वाढती संख्या आणि रोजचे मृत्यू कमी आले तर तिसऱ्या वर्गवारीत जिल्ह्याला स्थान मिळणार आहे. त्यामुळे काहीअंशी निर्बंध कमी होतील. त्याचा फायदा एस. टी. महामंडळाच्या बसना होईल. या बस पूर्ण क्षमतेने आंतर ग्रामीण भागात नियमित प्रवासी सेवा देतील. रुग्ण संख्या आणि मृत्यू दर वाढता राहीला तर ही सेवा पन्नास टक्के क्षमतेनेच सुरू राहणार आहे. याकाळात सर्वसामान्यांना एस. टी. बस मार्गावर नसल्याने वडाप अर्थात सहा आसनी रिक्षा, तीन आसनी रिक्षा आदींची प्रवासासाठी मदत घ्यावी लागत आहे. अनेकांची इच्छा नसतानाही केवळ प्रवासासाठी पर्याय नसल्याने वडापसह खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागत आहे.

या गावांना अद्यापही बससेवा सुरू नाही

जिल्ह्याच्या बारा तालुक्यांमध्ये एस. टी. महामंडळाचे आगार आहे. यात कागल, आजरा, चंदगड, गडहिंग्लज, शाहूवाडी, शिरोळ, इचलकरंजी, राधानगरी, गारगोटी, मुरगुड, कुरुंदवाड, मलकापूर या आगाराअंतर्गत येणाऱ्या तालुक्यांमधील अंतर्गत ग्रामीण भागातील सर्व गावांमध्ये एस. टी. ची बससेवा कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे बंद आहे. ही सेवा राज्य शासनाने निर्बंध कमी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बससेवा सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतरच सुरु होणार आहे. सध्या केवळ तालुका ते कोल्हापूरातील मध्यवर्ती बसस्थानक आणि पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, मुंबई या जिल्ह्यातील प्रमुख बसस्थानकांवरच बस जात आहेत.

प्रवाशांना वडापसह खासगी वाहनांचा आधार

एसटीच्या बसेस केवळ जिल्हा ते तालुका आणि तालुका ते जिल्हा या मार्गावरच सुरु आहेत. त्यामुळे आंतर ग्रामीण भागातील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे प्रवाशांना खासगी प्रवासी वाहनांसह वडापचा आधार प्रवासासाठी घ्यावा लागत आहे.

सध्या सुरु असलेल्या बसची संख्या - ३५५

आगारात उभी असलेल्या बस संख्या - ३४५

एकूण कर्मचारी

चालक - १५००

वाहक -१५००

सध्या कामावर असलेले कर्मचारी

चालक - ७१०

वाहक -७१०

प्रतिक्रिया

आंतरग्रामीण भागात अद्यापही बस सेवा सुरु नसल्याने वडापचा आधार घ्यावा लागत आहे. एस.टी. बस सुरु झाल्यातर प्रवास सुखकर आणि सुरक्षित होतो.

पाेपट पाटील, करनूर, कागल

प्रतिक्रिया

एस.टी. बस सर्वसामान्यांचा आधार आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे ती बंद आहे. या काळात सर्वसामान्यांचा ग्रामीण भागात खासगी वाहनांचाच आधार आहे.

- सागर पाटील, निगवे