शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

खासगी कर्मचाऱ्यांचा ‘मुद्रांक’मध्ये वापर

By admin | Updated: January 18, 2017 00:59 IST

करार संपला : अधिकाऱ्यांशी मिलीभगत; परंतु भवितव्य अधांतरी

विश्वास पाटील ल्ल कोल्हापूरराज्यभरातील मुद्रांकसह व दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा जुलै २०१५ पासून करार संपला असला तरी आजही हे कर्मचारी या कार्यालयांत काम करीत आहेत. राज्यात अशा प्रकारची ५१० कार्यालये आहेत. हे कर्मचारी सरकारी कार्यालयांत काम करतात; परंतु त्यांचा या कार्यालयाशी तसा अर्थाअर्थी आता काहीच संबंध राहिलेला नाही. दस्तामागे नागरिकांकडून पैसे घेऊन हे मुद्रांक विभागाचे काम करतात, हे जास्त गंभीर आहे.या संदर्भात राज्याचे नोंदणी महानिरीक्षक सी. बी. भुरकुंडे यांच्याशी पुण्यातील कार्यालयात संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘अशा पद्धतीने सेवा घेणे बेकायदेशीर आणि चुकीचे आहे. तसे निदर्शनास आल्यास कारवाई करू.’ तुमच्या राज्यभरातील कार्यालयांत २०१५ पासून अशी सेवा घेतली जाते, ते तुम्हाला माहीत नाही का? आणि या तरुणांना बाजूला केल्यानंतर ही कामे करणार कोण? तुमच्याकडे इतका कर्मचारी वर्गच नाही, हे निदर्शनास आणून दिल्यावर त्यांचा फोन बंद झाला.या विभागातील डाटा फीडिंगचे काम सरकारनेच सन २००२ मध्ये अहमदनगरच्या एस. एम. कॉम्प्युटर्ससह अन्य काही खासगी कंपन्यांना दिले. त्यांनी राज्यभरातील तरुण-तरुणींची भरती केली व ही सेवा सुरू झाली. संबंधित कंपनी त्यांना त्यावेळी मानधनाच्या स्वरूपात दरमहा अडीच हजार रुपये देत असे. एस. एम. कॉम्प्युटर्ससह सर्वच कंपन्यांचा करार २००७ पर्यंत होता. परत तो वाढवून देण्यात आला. पुढे त्याच कंपनीला स्टेशनरी पुरविण्याचे काम दिले. त्यानंतर सरकारने हे काम खासगी संस्थेकडून करून घेण्याचे बंद करून दि. ७ जुलै २०१५ रोजी कंपनीबरोबरचा करार संपुष्टात आणला. शासन स्वत: ही सेवा पुरविणार असल्याचे सांगण्यात आले; परंतु त्या खासगी कंपनीने नेमलेल्या तरुण-तरुणींची सेवा आजही घेतली जात आहे. त्यांना ‘तुमची नियुक्ती सेतू केंद्राकडून होणार असून, तुमच्या पगाराची अडचण नाही, काम सुरू ठेवा,’ असे आश्वासन तत्कालीन अधिकाऱ्यांकडून दिले गेले. त्यामुळे त्या आशेवर हे कर्मचारी काम करतात. सरकारी कार्यालयांत अत्यंत जबाबदारीचे हे काम हेच तरुण करत आहेत; परंतु सरकारच्या लेखी त्यांची कुठेच नोंद नाही. हे कर्मचारी सरकारी नसल्याने त्यांना सरकारने पगार देण्याचा प्रश्नच येत नाही; परंतु त्याच वेळेला त्यांचा करार संपला असताना त्यांना या कार्यालयांत कामच कसे करू दिले जाते, हाच कळीचा मुद्दा आहे. लोकांकडून थेट दस्तामागे पैसे घेऊन या तरुणांचा उदरनिर्वाह चालतो. प्रामाणिकपणे काम करूनही आम्ही लोकांकडून लाच घेऊन असे किती दिवस जगायचे, अशी भावना त्यांतील अनेक तरुणांची आहे. त्यामुळे सरकारने दरमहा आम्हाला रोजंदारीच्या स्वरूपात का असेना, निश्चित पगार द्यावा, अशी मागणी त्यांच्यातून पुढे आली आहे.महत्त्वाची कामे त्यांच्याकडूनसुमारे अडीच हजार लोक हे काम करतात. मुख्यत: तुम्ही कोणत्याही मुद्रांक सहनिबंधक कार्यालयात गेल्यानंतर डाटा फीडिंग, फोटो घेणे, पावती देणे अशा स्वरूपाची मुख्य कामे या रोजंदारीवरील तरुणांकडून करून घेतली जातात.त्याशिवाय व्यवहार झाला की, साहेबांबरोबरच त्यांनाही ठरलेली रक्कम मिळते. या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले तर या कार्यालयाचे काम ठप्प होईल, अशी राज्यभरातील स्थिती असल्याचे याच विभागाशी संबंधित जबाबदार अधिकाऱ्याने सांगितले.