शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
5
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
6
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
7
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
8
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
10
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
11
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
12
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
13
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
14
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
15
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
16
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
17
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
18
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
19
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
20
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
Daily Top 2Weekly Top 5

अभूतपूर्व यश : महिनाभरातील टेन्शन दूर; आता महाविद्यालयाचे वेध

By admin | Updated: June 9, 2015 01:17 IST

वडिलांचा स्क्रॅपचा व्यवसाय पाहत ‘साबिया’ने मिळविले ७४ टक्के

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सोमवारी दुपारी ‘आॅनलाईन’ निकाल जाहीर झाला अन् गेले महिनाभर टेन्शनमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या छटा उमटल्या. कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल तब्बल ९५.५६ टक्के जाहीर झाला. अनेक विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळविलेले यश हे धवलच म्हणावे लागेल. विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून दिवसभर मोलमजुरी करणाऱ्या माता-पित्याची तसेच ुुशिक्षकांची स्वप्नपूर्ती केली. त्यांच्या कष्टाला अखेर यशाची झालर मिळाली.कोल्हापूर : वडिलांचा स्क्रॅपचा व्यवसाय सांभाळत साबिया मेहबूब इनामदार हिने दहावीच्या परीक्षेत ७४ टक्के गुण मिळविले आहेत. तिच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदर बाजार येथील कोरगावकर हायस्कूलची ती विद्यार्थिनी आहे. नियमित सकाळी दोन तास अभ्यास करणे व दिवसभरात वेळ मिळेल तेव्हाच अभ्यास करणे हे तिच्या दहावीच्या अभ्यासाचे वेळपत्रक बनले होते. वडील आजारी असल्याने शाळा सुटल्यानंतर भावासोबत स्क्रॅपचा व्यवसाय सांभाळत तिने अभ्यास केला. दहावीच्या परीक्षेच्या वेळाला मोठ्या बहिणीचे लग्न ठरल्याने घरच्या सर्व कामांत मदत करीतच तिने दहावीची परीक्षा दिली व हे यश मिळविले. वडिलांच्या स्क्रॅपच्या दुकानात आलेली जुनी मेहंदीची पुस्तके पाहून तिला मेहंदी काढण्याची आवड निर्माण झाली. लग्नसोहळ्यात मेहंदी काढून ती घरखर्चाला हातभार लावत आहे. कोणतीही खासगी शिकवणी न लावता फक्त शाळेत शिक्षकांनी शिकविलेल्या अभ्यासाचा मला फायदा झाला. मला नेहमी माझे वडील, आई, आजी, दोन बहिणींसह भावासह भारत रसाळे सरांनी दिलेल्या प्रोत्साहनाने मी हे यश मिळविले आहे. मला आता वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, असे साबियाने सांगितले. तस्लिमा बारगीर नेहरू हायस्कूलमध्ये प्रथमरिक्षाचालकाच्या कन्येचे लख्ख यशकोल्हापूर : दहावीसाठी कोणत्याही विषयाची खासगी शिकवणी नाही. फक्त शाळेतील शिक्षकांनी शिकविलेल्या अभ्यासावर राजेंद्रनगर येथील तस्लिमा अस्लम बारगीरने नेहरू हायस्कूलमध्ये मराठी माध्यम शाखेत प्रथम क्रमांक पटकाविला. तस्लिमांचे वडील रिक्षा व्यावसायिक आहेत. राजेंद्रनगर शाहू पार्क येथे राहणाऱ्या तस्लिमाने जिद्द व चिकाटीच्या जोरावर ही यशस्वी वाटचाल करून अनेकांना थक्क केले आहे. तस्लिमांच्या दोन्ही बहिणींनी दहावी व बारावीमध्ये चांगले गुण मिळविले होते. दहावी म्हटले की, प्रत्येक विषयाला खासगी शिकवणी लावण्याची फॅशनच, पण या सर्व गोष्टींना तस्लिमाने फाटा दिली. दहावीला कोणत्याही विषयांची शिकवणी न लावता शाळेतील शिक्षकांनी शिकविलेल्या अभ्यासाची उजळणी दररोज घरी करायची. घरच्या कामात आईला मदत करीत परीक्षा जवळ आल्यानंतर तिने नियमित पाच ते सहा तास अभ्यास करण्याचे नियोजन केले होते. अभ्यासाच्या या नियोजनामुळेच तिने नेहरू हायस्कूलमध्ये मराठी माध्यम शाखेत ६८.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. तिला शिक्षक व्हायचे असल्यानेच हीच जिद्द मनाशी बाळगून ती अभ्यास करीत आहे. तिला यासाठी तिचे वडील, आई, बहीण यांचे प्रोत्साहन मिळत आहे. प्रत्येक विषयात ३५ गुण!अर्जुनवाडच्या इंद्रजित मोरे याचे अनोखे यशकोल्हापूर : प्रत्येक विषयात उत्तीर्ण होण्यासाठी लागणारे नेमके ३५च गुण पाडण्याची पैज लावली जात होती; पण पैज लावूनसुद्धा कोणालाही सर्व विषयांत ३५ गुण मिळवता येत नव्हते. मात्र, अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील दत्ताजीराव कदम हायस्कूलचा विद्यार्थी इंद्रजित वसंत मोरे यास दहावीच्या परीक्षेत सर्व विषयांत ३५ टक्के गुण मिळाले. या आश्चर्यकारक गुणांमुळे अर्जुनवाडसह कुरुंदवाड, जयसिंगपूर, घालवाड, दत्तवाड, आदी पंचक्रोशीत चर्चा होत आहे. एस.एस.सी. परीक्षेत चांगल्या गुणांनी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते. यामध्ये ९५ टक्क्यांच्यावरती गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंतांची चर्चा नेहमीच होत असते. मात्र, नापास आणि पासच्या काठावर उभ्या असणाऱ्या विद्यार्थ्यांची चर्चा होताना कमी दिसते. सर्व विषयांत पास होण्यासाठी साधारणत: १०० पैकी नेमके ३५ गुण पाडणे शक्य नसते. कारण आपण केवळ ३५ गुणांचेच लिहित नाही; तर पास होण्यासाठी १०० गुणांची सर्व प्रश्नपत्रिका सोडवली जाते. यात जे गुण पडतात, ते ठरवून अथवा तितके लिहिले म्हणून पडत नाहीत. मात्र, लाखात एक अपवाद म्हणून नेमक्या सर्व विषयांत ३५ गुण कसे मिळतात, याचे आश्चर्य सर्वांना आहे. याचा प्रत्यय सोमवारी अर्जुनवाडमधील इंद्रजित मोरे या विद्यार्थ्यास आला. त्याला पडलेल्या सर्व विषयांतील ३५ टक्के गुणांमुळे आपण नापास होता होता वाचलो, याचा आनंद आहे. मात्र, एवढे कमी गुण कसे मिळाले, याचेही त्याला आश्चर्य वाटत आहे. त्याला खरंच सर्व विषयांत ३५ गुण पडलेत का? असा सवाल सर्वजण त्याच्या वडिलांना फोनवरून विचारत आहेत. इंद्रजित हा अर्जुनवाड येथील बाबर स्पोर्टस् क्लबचा कबड्डीपटू आहे. इंद्रजित यास प्रतिक्रिया विचारली असता तो म्हणाला, मी ३५ पेक्षा अधिक गुणांचा पेपर लिहिला होता. परंतु, मला आश्चर्यकारकरीत्या पास होण्यासाठी लागणारे किमान गुण ३५ च पडले. त्यामुळे माझ्यासह घरातील सर्वांना आश्चर्य वाटते. जशी ही बातमी समजेल, तशी मला व वडिलांना विचारणा होत आहे. यावर अनेकजणांनी तर ‘अरे मोजून ३५च गुण पाडणे एवढे सोपे काम नाही’, अशी प्रतिक्रिया दिली! यापुढे याहीपेक्षा चांगला अभ्यास करून बारावी परीक्षेत अधिक गुण मिळवून दाखवणार आहे.