शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
2
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
3
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
4
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
5
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
6
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
7
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
8
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
9
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
10
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
11
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
12
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
13
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
14
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
15
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
16
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
17
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
18
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

Kolhapur: "हे राम ते जय श्रीराम"पर्यंतचा प्रवास समजून घ्या - बी. जी. कोळसे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 18:23 IST

'करकरेंच्या खुनाचा कट गांधींजींपेक्षा भयंकर'

कोल्हापूर : सत्ताधाऱ्यांचा हे राम ते जय श्रीरामपर्यंतचा प्रवास समजून घेतला पाहिजे, आज जर आमच्या हाती लेखणी दिली तर आम्ही संविधान लिहूया, तलवार दिलीत तर भीमा कोरेगाव करूया अशाही संतप्त भावना माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी गुरुवारी येथे व्यक्त केल्या.भाकप, श्रमिक प्रतिष्ठान आणि आयटकतर्फे शहीद गोविंद पानसरे शहीद दिनानिमित्त शाहू स्मारकमध्ये ''पानसरेंना न्याय कधी'' या विषयावर ते बोलत होते. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. अशोक चौसाळकर अध्यक्षस्थानी होते. पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे यांची प्रमुख उपस्थिती होती.कोळसे-पाटील म्हणाले, गोविंद पानसरे हे ज्ञानेश्वरांच्या भाषेत समजावून सांगतात आम्ही तुकोबांच्या. परंतु सत्ताधाऱ्यांचे षड्यंत्र समजावून सांगण्यात आमची हयात जात आहे. विचाराला विचाराने उत्तर द्या हे अण्णांचे सांगणे होते. गोळवलकर, सावरकर, टिळक वाचा, त्यातील लिखाण विषारी आहे. महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा खून हे त्याचे द्योतक आहे. खून, दंगली, मशिदी पाडणे हे त्यांच्या या विषारी प्रसाराचे दाखले आहेत. यात देशातील सर्व संवैधानिक संस्थांना हाताशी धरले. स्मिता पानसरे म्हणाल्या, आम्ही सारे पानसरे म्हणून अभिनिवेश बाजूला ठेवून अण्णांनी मांडलेला शत्रू मित्र विवेक जोपासला पाहिजे. प्रा. डॉ. चौसाळकर म्हणाले, पानसरे यांचा खून होऊन १० वर्षे झाली, तरी गुन्हेगारांना शिक्षा झालेली नाही. आपली न्यायव्यवस्था त्यांना योग्य न्याय देऊ शकत नाही. पानसरे यांनी जनतेची चळवळ उभी केली, ती पुढे नेली पाहिजे. मानवजातीच्या मुक्तीसाठी संघर्ष करा.

करकरेंच्या खुनाचा कट गांधींजींपेक्षा भयंकरकरकरे यांच्या खुनामागेही हीच शक्ती होती. गांधींना मारण्याचा कट रचला त्यापेक्षाही अक्कलहुशारीने त्यांनी एकविसाव्या शतकात करकरे यांना मारण्याचा कट रचला. हा भयंकर कट पानसरे व्याख्यानातून उलगडत होते, म्हणूनच त्यांची हत्या झाली असे कोळसे-पाटील यांनी सांगितले.

घाबरून घरी मरण्यापेक्षा लढत मरावयाच्या ४७ व्या वर्षीच मी घाबरणार नाही अशी शपथ घेतली होती. त्यामुळे देशाची सर्वांत मोठा शत्रू आरएसएस, विषारी विचारांची प्रेरणा देणारा ब्राह्मणवाद, त्याला घाबरून घरी राहून एसीत मरायचे की रस्त्यावर उतरून लढत लढत मरायचे याचा निर्णय घ्यायची वेळ आली आहे असा सल्ला कोळसे-पाटील यांनी दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovind Pansareगोविंद पानसरे