शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

Kolhapur: शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय शिवसेना मागे हटणार नाही - बानगुडे पाटील; कर्जमुक्ती दिंडीला प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 12:15 IST

सरकारने बड्या उद्योगपतींची कर्जे माफ केली; मात्र जगाच्या पोशिंद्याला मात्र दुर्लक्षितच ठेवले

चंदगड : सत्तेच्या सारीपाटात फक्त निवडणुका आल्या की शेतकरी राजा होतो. महायुती सरकारने बड्या उद्योगपतींची कर्जे माफ केली; मात्र जगाच्या पोशिंद्याला मात्र दुर्लक्षितच ठेवले. राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था आज बिकट आहे. त्यामुळे या विरोधात शेतकरी कर्जमुक्ती दिंडीच्या माध्यमातून रान उठवल्याशिवाय या सरकारला पाझर फुटणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही, तोपर्यंत शिवसेना मागे हटणार नाही, असे प्रतिपादन उद्धवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे-पाटील यांनी केले. येथील रवळनाथ मंदिरातून शेतकरी कर्जमुक्ती दिंडीचा प्रारंभ करून ते बोलत होते.यावेळी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते संजय पवार, जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, रविकिरण इंगवले, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, रियाज शमनजी, राजू रेडेकर, विष्णू गावडे, महेश पाटील, महादेव गुरव, शांता जाधव उपस्थित होते.पाटील म्हणाले, सहा महिन्यांत ७६३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगत शेतकऱ्यांची जाण नसणाऱ्या अशा या सरकारला या दिंडीच्या माध्यमातून जाग आणण्याची गरज आहे. संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी सरकारला जाग आणण्यासाठी ही दिंडीची मशाल पेटविल्याचे सांगितले.आम्ही गप्प बसणार नाहीशेतकरी भरडला जात असताना कृषिमंत्री मात्र रमी खेळण्यात गुंततात ही बाब दुर्दैवी आहे. शेतकरी कर्जमाफीऐवजी हे सरकार शक्तिपीठ महामार्ग करण्यात धन्यता मानत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नरडीवर पाय ठेवून हा उद्योग हे सरकार करत असेल तर आम्ही कदापि शांत बसणार नसल्याचा इशारा जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांनी दिला. तत्पूर्वी दिंडी रथाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून रवळनाथला साकडे घालून कर्जमुक्तीची सद्बुद्धी सरकारला येवो असे मागणे घालण्यात आले. त्यानंतर शिवसैनिकांनी दिंडी शहरातील प्रमुख मार्गावरून आणली.