शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

उद्धव ठाकरेंकडून २०१८ लाच लोकशाहीची विटंबना, मंत्री दीपक केसरकर यांची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 13:17 IST

बाळासाहेबांचे नातू म्हणून सोडतोय

कोल्हापूर : लोकशाही धोक्यात आहे म्हणून गळा काढणाऱ्या उध्दव ठाकरे यांनी २०१८ साली शिवसेनेच्या घटनेत दुरूस्ती करून सर्व नियुक्तीचे अधिकार स्वत:कडे घेतले. ती लोकशाहीला धरून नव्हती. ही दुरूस्ती त्यांना अंगलट येणार असल्याने निवडणूक आयोगालाही पाठवली नाही. त्यामुळे ठाकरे यांनीच त्यावेळी लोकशाहीची विटंबना केली, असा घणाघाती आरोप शिवसेनेचे प्रवक्ते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी येथे केला.निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. खासदार धैर्यशील माने, जिल्हाप्रमुख रवींद्र माने यावेळी उपस्थित होते. म्हणाले, निवडणूक आयोगाचा निकाल मी वाचला आहे. आयोगाने याबाबत निर्णय घेऊ नये म्हणून ठाकरे सर्वोच्च न्यायालयात गेले होते. परंतु, विविध प्रकरणांचा अभ्यास करून हा निर्णय दिला गेला. खोटी सहानुभूती मिळवण्यासाठी सध्या राज्यभर शिव्याशाप देत दौरे काढले जात आहेत. आम्ही केवळ बाळासाहेबांच्या विचारांवर चालायचे म्हणून आम्ही आमदार आणि मंत्रिपदे पणाला लावली.२०१८ची ही लोकशाहीविरोधी पक्षाची घटनादुरूस्ती सर्वोच्च न्यायालयासमोर मांडली जाईल तेव्हा हे पूर्ण उघडे पडतील. तुम्ही स्वत: लोकशाही मानत नाही आणि लोकशाहीची भाषा करता. हे तुम्हाला शोभत नाही.

बाळासाहेबांचे नातू म्हणून सोडतोयउध्दव ठाकरेंबद्दल आम्हाला आदर आहे. म्हणून त्यांच्या उलट बोलत नाही, तर आदित्य हे बाळासाहेबांचे नातू आहेत म्हणून त्यांना सोडतोय. त्यांच्यापेक्षाही वाईट पण योग्य आम्ही बोलू शकतो. त्यामुळे आदित्य यांनी खोटे बोलत फिरायचे बंद करावे, असेही पालकमंत्री केसरकर यांनी बजावले.इतिहासात पहिल्यांदाचवडील मुख्यमंत्री आणि मुलगा मंत्री हे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले. ही चूक त्यांना कोणी करायला लावली, हे माहिती नाही. परंतु यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये याचा चुकीचा संदेश गेला, असेही पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeepak Kesarkarदीपक केसरकर Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना