शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

उद्धव ठाकरेंकडून २०१८ लाच लोकशाहीची विटंबना, मंत्री दीपक केसरकर यांची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 13:17 IST

बाळासाहेबांचे नातू म्हणून सोडतोय

कोल्हापूर : लोकशाही धोक्यात आहे म्हणून गळा काढणाऱ्या उध्दव ठाकरे यांनी २०१८ साली शिवसेनेच्या घटनेत दुरूस्ती करून सर्व नियुक्तीचे अधिकार स्वत:कडे घेतले. ती लोकशाहीला धरून नव्हती. ही दुरूस्ती त्यांना अंगलट येणार असल्याने निवडणूक आयोगालाही पाठवली नाही. त्यामुळे ठाकरे यांनीच त्यावेळी लोकशाहीची विटंबना केली, असा घणाघाती आरोप शिवसेनेचे प्रवक्ते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी येथे केला.निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. खासदार धैर्यशील माने, जिल्हाप्रमुख रवींद्र माने यावेळी उपस्थित होते. म्हणाले, निवडणूक आयोगाचा निकाल मी वाचला आहे. आयोगाने याबाबत निर्णय घेऊ नये म्हणून ठाकरे सर्वोच्च न्यायालयात गेले होते. परंतु, विविध प्रकरणांचा अभ्यास करून हा निर्णय दिला गेला. खोटी सहानुभूती मिळवण्यासाठी सध्या राज्यभर शिव्याशाप देत दौरे काढले जात आहेत. आम्ही केवळ बाळासाहेबांच्या विचारांवर चालायचे म्हणून आम्ही आमदार आणि मंत्रिपदे पणाला लावली.२०१८ची ही लोकशाहीविरोधी पक्षाची घटनादुरूस्ती सर्वोच्च न्यायालयासमोर मांडली जाईल तेव्हा हे पूर्ण उघडे पडतील. तुम्ही स्वत: लोकशाही मानत नाही आणि लोकशाहीची भाषा करता. हे तुम्हाला शोभत नाही.

बाळासाहेबांचे नातू म्हणून सोडतोयउध्दव ठाकरेंबद्दल आम्हाला आदर आहे. म्हणून त्यांच्या उलट बोलत नाही, तर आदित्य हे बाळासाहेबांचे नातू आहेत म्हणून त्यांना सोडतोय. त्यांच्यापेक्षाही वाईट पण योग्य आम्ही बोलू शकतो. त्यामुळे आदित्य यांनी खोटे बोलत फिरायचे बंद करावे, असेही पालकमंत्री केसरकर यांनी बजावले.इतिहासात पहिल्यांदाचवडील मुख्यमंत्री आणि मुलगा मंत्री हे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले. ही चूक त्यांना कोणी करायला लावली, हे माहिती नाही. परंतु यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये याचा चुकीचा संदेश गेला, असेही पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeepak Kesarkarदीपक केसरकर Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना