शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

उदगाव गुन्हेगारीच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:00 AM

संतोष बामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले २२ हजार लोकसंख्येचे उदगाव हे गाव आहे. कृष्णा नदीच्या पलीकडे सांगली जिल्हा असून, उदगाव, जयसिंगपूर परिसरातील गुन्हेगारांना सांगली जिल्ह्यात अगदी एक किलोमीटरमध्ये आश्रय मिळतो. त्यामुळे उदगाव गुन्हेगारीच्या विळख्यात अडकले आहे. उदगाव येथे झालेल्या जबरी दरोड्यामुळे गाव भीतीच्या छायेखाली असून, दरोडेखोरांना ...

संतोष बामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले २२ हजार लोकसंख्येचे उदगाव हे गाव आहे. कृष्णा नदीच्या पलीकडे सांगली जिल्हा असून, उदगाव, जयसिंगपूर परिसरातील गुन्हेगारांना सांगली जिल्ह्यात अगदी एक किलोमीटरमध्ये आश्रय मिळतो. त्यामुळे उदगाव गुन्हेगारीच्या विळख्यात अडकले आहे. उदगाव येथे झालेल्या जबरी दरोड्यामुळे गाव भीतीच्या छायेखाली असून, दरोडेखोरांना गजाआड करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे उदगावमध्ये पोलीस आऊटपोस्ट गरजेचे आहे.कलेचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाºया उदगावमध्ये औद्योगिक वसाहती, सांगली-कोल्हापूर महामार्ग, रेल्वे लोहमार्ग असून, सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांतील आंदोलने, अपघाताचे क्षेत्र, जोगणी यात्रा येथे सातत्याने होत असतात. यामुळे जयसिंगपूर पोलिसांना वारंवार उदगावमध्ये बंदोबस्त ठेवावा लागतो. अशातच रविवारी मध्यरात्री निवृत्त प्रा. बाबूराव निकम यांच्या घरी सशस्त्र दरोडा घालून त्यांची पत्नी अरुणा निकम यांना ठार करून २५ तोळे सोने व ५० हजारांची रोकड लंपास केली होती. या घटनेमुळे उदगाव परिसर भीतीच्या छायेखाली आहे.उदगाव-जयसिंगपूर परिसरात एखादी घटना घडली तर तो गुन्हेगार सांगली जिल्ह्याच्या आश्रयाला जातो. त्यामुळे कोल्हापूर व सांगली पोलिसांना शोधमोहिमेसाठी अडचणीचे ठरते. फक्त एक किलोमीटरवर असलेल्या सांगली जिल्ह्यामुळे गुन्हेगारीला वाव मिळत आहे. यातच उदगावमध्ये वाळू, वीट, माती व्यवसायासह बेकायदा सावकारकी जोमात आहे. अवैध धंद्याचे कनेक्शन उदगावकरांना डोकेदुखी बनले आहे. अशातच येथे गुन्ह्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी या बाबींचा आढावा घेऊन तत्काळ उदगावला पोलीस आऊटपोस्ट मंजूर करावे, अशी मागणी गावातून जोर धरत आहे.कुटुंब धास्तावलेनिकम कुटुंबीय हे सर्वसामान्य जनतेत मिसळून वागणारे आहे. हुपरी येथून बाबूराव निकम हे दोन वर्षांपासून निवृत्त झाल्यापासून ज्येष्ठ सेवासंघ व शेतीमध्ये लक्ष घालून त्यांचा दिनक्रम सुरू होता. अशातच दरोडेखोरांनी रेकी करून निकम यांच्या घरी दरोडा टाकला. यामध्ये अरुणा निकम या जागीच ठार झाल्या, तर बाबूराव निकम यांच्यावर मिरज येथील मिशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची दोन मुले व मुलगीला जबरी धक्का बसला असून, निकम कुटुंबीय धास्तावले आहेत.