शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

राज्यात आणखी दोन भारत राखीव बटालियन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 5:54 AM

भारत राखीव बटालियन ४ व ५ आणि हातनूर-वरणगाव जळगाव येथे राज्य राखीव पोलीस दल क्रमांक १९ ची नव्याने उभारणी करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली

दीपक जाधव कोल्हापूर : कोर्टी मोक्ता (चंद्रपूर) आणि शिसा उदेगाव अकोला येथे भारत राखीव बटालियन ४ व ५ आणि हातनूर-वरणगाव जळगाव येथे राज्य राखीव पोलीस दल क्रमांक १९ ची नव्याने उभारणी करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून त्यासाठी २९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती करण्यात येणार आहे.महाराष्ट्रात सध्या औरंगाबाद, गोंदिया, कोल्हापूर येथे भारत राखीव बटालियन आहेत. या बटालियनसाठी केंद्र शासनाकडून निधी पुरविण्यात येतो. कायदा व सुव्यवस्था आणखी प्रभावीपणे सांभाळण्यास या बटालियनची मदत होते, हे लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यात आणखी दोन भारत राखीव बटालियन व एक राज्य राखीव पोलीस बल उभारण्यास मान्यता दिली. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्णातील बल्लारपूर तालुक्यातील मौजे कोर्टी मोक्ता येथे भारत राखीव बटालियन क्रमांक ४ आणि अकोला जिल्ह्यातील मौजे शिसा उदेगाव व हिंगाणा शिवार येथे भारत राखीव बटालियन क्रमांक ५ ची स्थापना करण्यात येत आहे.जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हातनूर-वरणगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १९ स्थापन करण्यात येत आहे. यामध्ये समादेशक ते बिनतारी संदेश विभागातील पदे ही कायमस्वरूपी, तर प्रमुख लिपिक ते वर्ग चारपर्यंतची सर्व पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत.१३८० पदे भरणार..उच्चस्तरीय सचिव समितीने केलेल्या शिफारसीनुसार पहिल्या टप्प्यात प्रत्येक बटालियनसाठी आवश्यक असलेल्या पदांच्या (१३८४) एक तृतीयांश म्हणजेच ४६० अशी तीन बटालियनसाठी एकूण १३८० पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली. राहिलेली पदे भारत राखीव बटालियन व राज्य राखीव पोलीस गट प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर समितीच्या मान्यतेने निर्माण करण्यात येणार आहेत.